शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपुरात डेंग्यू संशयित युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:01 IST

शहर व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शुक्रवारी डेंग्यू संशयित युवतीच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. आरोग्य विभागाच्या चमूने तिचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. उपराजधानीत डेंग्यू वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागासह, महानगरपालिका व नागरिकांकडूनही होणारे प्र्यत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देवाढदिवशीच निघाली अंत्ययात्रा : जिल्ह्यात ३२ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर व ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ झाली आहे. शुक्रवारी डेंग्यू संशयित युवतीच्या मृत्यूची नोंद झाल्याने खळबळ उडाली. आरोग्य विभागाच्या चमूने तिचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. उपराजधानीत डेंग्यू वाढत असताना त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागासह, महानगरपालिका व नागरिकांकडूनही होणारे प्र्यत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.प्राचिता चंद्रभान आंबिलडुके (१७) रा. खात असे मृताचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, प्राचिता बाराव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. गेल्या सात-आठ दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने तिला भंडारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने १५ आॅगस्ट रोजी सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचारानंतर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विशेष म्हणजे शुक्रवारी प्राचिता हिचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसादिवशीच तिची अंत्ययात्रा निघाल्याने गावात शोककळा पसरली. प्राचिताचा मृत्यू नेमका कोणत्या आजाराने झाला हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी डॉक्टरांनी लक्षणावरून संशयित डेंग्यू म्हणून नोंद केली आहे. आरोग्य विभागाच्या चमूने प्राचिताचे नमुने ताब्यात घेतले असून डेंग्यूच्या तपासणीसाठी पाठविले आहे. २४ तासानंतर अहवाल येण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागात ११ रुग्णनागपूर ग्रामीण भागात आतापर्यंत ११ रुग्णांची तर शहरात २१ असे मिळून जिल्ह्यात ३२ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने पावसाचे पाणी जागोजागी साचलेले आहे. यातच पावसाच्या उघडझापमुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे येत्या काळात डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.वाडी परिसरात डेंग्यू वाढणारप्राप्त माहितीनुसार, वाडी परिसरातील उघड्या नाल्या, खोलगट भागात साचलेले पाणी, उघड्यावरील भंगार व्यवसाय व त्यांच्याकडे टायरचा असलेला ढीग यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बहुसंख्य रुग्ण खासगीमध्ये उपचार घेत असल्याने आरोग्य विभागाकडे त्याची नोंद नाही. परंतु, सोमवारी येथील तीन रुग्ण लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यूnagpurनागपूर