शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

उपराजधानीला डेंग्यूचा डंख

By admin | Updated: November 8, 2014 02:45 IST

प्रवीण दटके यांनी महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला शिस्त लागेल. आरोग्यासह मूलभूत सुविधात सुधारणा होतील, अशी अपेक्षा होती.

नागपूर : प्रवीण दटके यांनी महापौर पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या कारभाराला शिस्त लागेल. आरोग्यासह मूलभूत सुविधात सुधारणा होतील, अशी अपेक्षा होती. परंतु शहरातील नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. घराघरांत रुग्ण आढळत असल्याने नागरिकात डेंग्यूची दहशत पसरली आहे. असे असतानाही डेंग्यू कमी झाल्याचा दावा करीत पदाधिकारी व अधिकारी आपली पाठ थोपटून घेत आहेत. महापौर हेच डेंग्यू नियंत्रण संदर्भात गंभीर नसतील तर नागरिकांनी अपेक्षा कुणाकडून बाळगावी? मनपाचा आरोग्य विभाग कामाला कसा लागणार. प्रशासन व पदाधिकारी गंभीर नसल्याने उपराजधानीत वेगाने पसरत असलेल्या डेंग्यू आजाराला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणी दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान शहरात डेंग्यू आजाराची सध्या काय स्थिती आहे आणि मनपाने त्याच्या नियंत्रणासाठी कुठले प्रभावी पाऊल उचलले आहे, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मनपाला केली आहे. मनपाच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याकडे एका जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. यावर सारवासारव म्हणून महापौर व आरोग्य समितीचे सभापती बैठकातून डेंग्यू नियंत्रणाचा आढावा घेत आहेत. परंतु दोघात समन्वय नाही. महापौरांच्या म्हणण्यानुसार डेंग्यूमुळे ७ जणांचे बळी गेले आहेत. दुसरीकडे सभापती रमेश सिंगारे ४ जणांचाच मृत्यू झाल्याचा दावा करीत आहेत. यातून डेंग्यू संदर्भात पदाधिकारी गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देत असताना भाजपची सत्ता असलेल्या नागपुरात मात्र सर्वत्र अस्वच्छता आहे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने शहरात सर्वत्र डासांचा प्रकोप वाढला आहे. डेंग्यू नियंत्रणसंदर्भात दररोज झोननिहाय माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. डेंग्यू नियंत्रणात असल्याचा दावा पदाधिकारी व प्रशासन करीत असले तरीही प्रत्यक्षात कार्यवाही संथ आहे. आरोग्य विभागाचे पथक वस्त्यात तपासणी न करताच कागदोपत्री अहवाल तयार करीत असल्याने डेंग्यूचे थैमान थांबता थांबत नसल्याचे भयाण चित्र आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही दटके मात्र सत्कार समारंभात व्यस्त असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)