शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

नोटाबंदी ही पैसा पांढरा करण्याची ‘स्कीम’; पी.चिदंबरम यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 9:35 PM

केंद्र शासनाने २०१६ केलेली नोटाबंदीचा उद्देश हा काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचविण्याचा होता. काळा पैसा पांढरा करण्याची ही एक योजनाच होती, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम यांनी केला आहे.

ठळक मुद्दे‘राफेल’ला बनविणार निवडणुकीचा मुद्दा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने २०१६ केलेली नोटाबंदीचा उद्देश हा काही विशिष्ट लोकांना फायदा पोहोचविण्याचा होता. काळा पैसा पांढरा करण्याची ही एक योजनाच होती, असा आरोप देशाचे माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम यांनी केला आहे. नागपुरात पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.देशातील भ्रष्टाचार दूर करणे, दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत तोडणे हे नोटाबंदी मागील उद्देश असल्याचे दावे करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही. उलट देशात अक्षरश: नागरिकांची धावपळ झाली. यात विशिष्ट लोकांना काळा पैसा पांढरा करण्याची संधी मिळाली. नोटाबंदीची किंमत संपूर्ण देशाला चुकवावी लागली. नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धक्का बसला. ‘जीडीपी’मध्ये १.५० टक्क्यांची घसरण झाली. लाखो लघुउद्योग बंद झाले, १५ कोटींहून अधिक कामगारांचे रोजगार गेले व ३० कोटी नागरिक उपासमारीकडे ढकलल्या गेले. नोटाबंदीच्या काळात शंभर लोकांना जीवदेखील गमवावा लागला. रिझर्व्ह बँकेने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीतून नोटाबंदी फसल्याचे स्पष्ट झाले आहे, असे चिदंबरम म्हणाले.सद्यस्थितीत विदेशी गुंतवणूकदार आपली गुंतवणूक परत घेत आहेत, महागाईचा दर आणखी वाढत आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे हे चित्र उभे झाले आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली.‘राफेल’बाबत केंद्राने उत्तरे द्यावी‘राफेल’ विमानांची खरेदी हा एक मोठा घोटाळा असल्याची शंका आता नागरिकदेखील उपस्थित करत आहेत. या विमानांची नेमकी किंमत किती, ही विमाने तातडीने खरेदी करण्याची कारणे कुठली होती, ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ला तंत्रज्ञान हस्तांतरणात का समाविष्ट करून घेण्यात आले नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कराराच्या बाबी गोपनीय ठेवण्याची आवश्यकता काय, या सर्व प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी, असे प्रतिपादन पी.चिदंबरम यांनी केले. ‘राफेल’ आणि नोटाबंदीचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा राहणार आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. २७ आॅक्टोबर २०१७ रोजी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी या करारात ‘आॅफसेट पार्टनर’च्या शक्यतेला त्यांनी फेटाळले होते. दुसऱ्याच दिवशी पार्ली यांनी नागपुरात ‘मिहान’ येथे ‘डेसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस’चे भूमिपूजन केले. यात गोपनीयता का बाळगण्यात आली व सत्य का लपविण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सत्तेवर आलो तर कंत्राटावर फेरविचार करू‘राफेल’सारखी उत्तम दर्जाची लढाऊ विमाने आपल्या सैन्याचा भाग असावी असे आम्हाला देखील वाटते. देशहितासाठी अशी अत्याधुनिक सैन्य साधने आपल्याकडे असणे गरजेचे आहे. जर आम्ही सत्तेवर आलो तर थेट हे कंत्राट रद्द करणार नाही. तर या कंत्राटाच्या अटींवर फेरविचार करून त्यात बदल करू, असे पी.चिदंबरम यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम