शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही गंभीर संकटात, जेपींच्या जनआंदोलनाची गरज : ज्ञानेंद्र कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:42 IST

आपल्या देशाची लोकशाही सध्या गंभीर संकटात आली असून ती वाचविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित जनआंदोलन तातडीने उभे करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जेपी आंदोलनाचे जानकार ज्ञानेंद्र कुमार यांनी केले.

ठळक मुद्देजयप्रकाश नारायण जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षात देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक लाभ देणाऱ्या संस्थांचे खासगीकरण केले जात असून शासकीय संस्थांची स्वायत्तता संपविण्यात येत आहे. राज्य व स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी करून सर्वांना केंद्राच्या हातचे बाहुले करण्यात येत आहे. विरोधी पक्षाला संपविण्यात येत आहे. नावापुरती मतदान प्रक्रिया आहे, पण नागरिकांचे मतदानाचे स्वातंत्र्यच हिरावले जात आहे. आपल्या देशाची लोकशाही सध्या गंभीर संकटात आली असून ती वाचविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित जनआंदोलन तातडीने उभे करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जेपी आंदोलनाचे जानकार ज्ञानेंद्र कुमार यांनी केले.लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनोबा विचार केंद्रातर्फे सर्वोदय आश्रम, धरमपेठ येथे ‘आजची लोकशाही आणि जयप्रकाश’ या विषयावर आयोजित व्याख्यानाचे वक्ता म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सर्वोदय आश्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरेश पांढरीपांडे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, आश्रमाचे ट्रस्टी अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कुमार पुढे म्हणाले, केंद्र सरकारने स्वत:ला माहितीच्या अधिकारातून वगळले. सरकारचा तोटा कमी करण्यासाठी आरबीआयकडून १.६७ लाख कोटी रुपये काढण्यात आले. आता माहितीचा अधिकारच निरस्त करण्यात आल्याने आरबीआयकडून घेतलेला पैसा कुठे खर्च केला, याची माहितीही लागणार नाही. मत मागण्यासाठी जाती धर्माचा खुलेआम उपयोग केला जात आहे. प्रचंड बहुमताचे सरकार केंद्रात आहे व विरोधी पक्षाला संपविण्यात आले असून विरोधी सरकारे पाडली जात आहेत. निवडणूक आयोग, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक संस्था, विरोधी पक्ष, न्यायपालिका व नागरिकांना माहीत न करता संसदेत ४० विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आली. बीएसएनएल, रेल्वे अशा मजबूत सार्वजनिक संस्था बंद पाडून खासगी हातात दिल्या जात आहे. हे सर्व धोक्याचे संकेत आहेत.जयप्रकाश यांना सामुदायिक लोकशाही व पंचायत अधिकार महत्त्वाचे होते व ते सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे पुरस्कर्ते होते. मात्र सरकारद्वारे संपूर्ण सत्ता केंद्राकडे एकवटण्याचे काम करीत आहे. अर्थव्यवस्था बुडत आहे व बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. संघीय व्यवस्था कमजोर करून विघटनाची स्थिती वाढवली जात आहे. विषमता वाढली आहे. सर्व माध्यमे उद्योगपतीच्या हातचे खेळणे झाले आहे.म्हणूनच ही अराजकता चालली असताना जनउपयोगी मुद्दे सोडून सरकारचे महिमामंडन करीत काश्मीर आणि पाकिस्तानकडेच लक्ष विचलित केले जात आहे. ही स्थिती ताबडतोब बदलणे आवश्यक आहे. जेपींच्या अपेक्षेनुसार नागरिकांमध्ये क्षमता व सत्यासाठी चिंता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी जेपी, गांधी आणि आंबेडकरी विचाराचे एकत्रित जनआंदोलन उभे राहण्याची नितांत गरज असल्याचे मनोगत ज्ञानेंद्र कुमार यांनी व्यक्त केले. संचालन संदेश सिंगलकर यांनी तर वंदन गडकरी यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर