शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

लोकशाही गंभीर संकटात, जेपींच्या जनआंदोलनाची गरज : ज्ञानेंद्र कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 23:42 IST

आपल्या देशाची लोकशाही सध्या गंभीर संकटात आली असून ती वाचविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित जनआंदोलन तातडीने उभे करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जेपी आंदोलनाचे जानकार ज्ञानेंद्र कुमार यांनी केले.

ठळक मुद्देजयप्रकाश नारायण जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षात देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक लाभ देणाऱ्या संस्थांचे खासगीकरण केले जात असून शासकीय संस्थांची स्वायत्तता संपविण्यात येत आहे. राज्य व स्वराज्य संस्थांचे अधिकार कमी करून सर्वांना केंद्राच्या हातचे बाहुले करण्यात येत आहे. विरोधी पक्षाला संपविण्यात येत आहे. नावापुरती मतदान प्रक्रिया आहे, पण नागरिकांचे मतदानाचे स्वातंत्र्यच हिरावले जात आहे. आपल्या देशाची लोकशाही सध्या गंभीर संकटात आली असून ती वाचविण्यासाठी जयप्रकाश नारायण यांना अपेक्षित जनआंदोलन तातडीने उभे करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जेपी आंदोलनाचे जानकार ज्ञानेंद्र कुमार यांनी केले.लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीचे औचित्य साधून विनोबा विचार केंद्रातर्फे सर्वोदय आश्रम, धरमपेठ येथे ‘आजची लोकशाही आणि जयप्रकाश’ या विषयावर आयोजित व्याख्यानाचे वक्ता म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी सर्वोदय आश्रमाचे अध्यक्ष प्रा. सुरेश पांढरीपांडे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक, आश्रमाचे ट्रस्टी अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कुमार पुढे म्हणाले, केंद्र सरकारने स्वत:ला माहितीच्या अधिकारातून वगळले. सरकारचा तोटा कमी करण्यासाठी आरबीआयकडून १.६७ लाख कोटी रुपये काढण्यात आले. आता माहितीचा अधिकारच निरस्त करण्यात आल्याने आरबीआयकडून घेतलेला पैसा कुठे खर्च केला, याची माहितीही लागणार नाही. मत मागण्यासाठी जाती धर्माचा खुलेआम उपयोग केला जात आहे. प्रचंड बहुमताचे सरकार केंद्रात आहे व विरोधी पक्षाला संपविण्यात आले असून विरोधी सरकारे पाडली जात आहेत. निवडणूक आयोग, न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक संस्था, विरोधी पक्ष, न्यायपालिका व नागरिकांना माहीत न करता संसदेत ४० विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आली. बीएसएनएल, रेल्वे अशा मजबूत सार्वजनिक संस्था बंद पाडून खासगी हातात दिल्या जात आहे. हे सर्व धोक्याचे संकेत आहेत.जयप्रकाश यांना सामुदायिक लोकशाही व पंचायत अधिकार महत्त्वाचे होते व ते सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे पुरस्कर्ते होते. मात्र सरकारद्वारे संपूर्ण सत्ता केंद्राकडे एकवटण्याचे काम करीत आहे. अर्थव्यवस्था बुडत आहे व बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. संघीय व्यवस्था कमजोर करून विघटनाची स्थिती वाढवली जात आहे. विषमता वाढली आहे. सर्व माध्यमे उद्योगपतीच्या हातचे खेळणे झाले आहे.म्हणूनच ही अराजकता चालली असताना जनउपयोगी मुद्दे सोडून सरकारचे महिमामंडन करीत काश्मीर आणि पाकिस्तानकडेच लक्ष विचलित केले जात आहे. ही स्थिती ताबडतोब बदलणे आवश्यक आहे. जेपींच्या अपेक्षेनुसार नागरिकांमध्ये क्षमता व सत्यासाठी चिंता निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी जेपी, गांधी आणि आंबेडकरी विचाराचे एकत्रित जनआंदोलन उभे राहण्याची नितांत गरज असल्याचे मनोगत ज्ञानेंद्र कुमार यांनी व्यक्त केले. संचालन संदेश सिंगलकर यांनी तर वंदन गडकरी यांनी आभार मानले.

टॅग्स :nagpurनागपूर