शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

व्हीएनआयटीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी तपासाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:12 IST

व्हीएनआयटीतील विद्यार्थी मनोज कुमार गणप्पुरमने आत्महत्या केल्यावर कुटुंबीयांना विश्वास होत नसून त्यांनी यात गडबड असल्याची शंका उपस्थित करून तपासाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देमुलाच्या आत्महत्येवर कुटुंबीयांना शंका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्हीएनआयटीतील विद्यार्थी मनोज कुमार गणप्पुरमने आत्महत्या केल्यावर कुटुंबीयांना विश्वास होत नसून त्यांनी यात गडबड असल्याची शंका उपस्थित करून तपासाची मागणी केली आहे.बुधवारी सायंकाळी आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळाली होती. मनोज कुमार बीटेक मायनिंगमध्ये पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. बुधवारी सायंकाळी वसतिगृहाचा दरवाजा तोडल्यानंतर तो खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला. शिक्षकांनी तो नापास झाल्यामुळे आत्महत्या केली असावी, अशी शंका उपस्थित केली होती. परंतु त्याच्या कुटुंबीयांनी यावर आक्षेप घेतला आहे. मनोज कुमारचे कुटुंबीय घटनेची माहिती मिळताच आज पहाटेच नागपूरला पोहोचले. त्यांच्या कुटुंबात आईवडिल, दोन बहिणी आहेत. वडिलांना पाच भाऊ आहेत. सर्वांचे संबंध चांगले आहेत. कुटुंबीयांच्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी मनोज आपल्या चुलत बहिणीच्या लग्नात आला होता. त्यावेळी त्याची बहिणींसोबत नापास झाल्याची चर्चाही झाली होती. त्याने सर्व पेपर सहज देणार असल्याचे सांगितले होते. काही दिवसानंतर त्याने दुसऱ्या बहिणीच्या लग्नात येणार असल्याचे सांगितले होते. १६ जुलैला परीक्षा आटोपली. तोपर्यंत मनोज सामान्य होता. त्याने ऑनलाईन जेवण बोलावले होते. त्यानंतर त्याचा काहीच पत्ता नव्हता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार बुधवारी चुलत बहिणीचा वाढदिवस होता. तिला शुभेच्छा देण्यासाठी मनोजचा फोन न आल्यामुळे कुटुंबीयांना चिंता वाटली. त्यांनी संपर्क केल्यानंतर काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने कुटुंबीयांनी वसतिगृहाच्या वॉर्डनसोबत संपर्क केला. त्यानंतर घटनेची माहिती मिळाली. कुटुंबीयांच्या मते त्यांना मनोजच्या आत्महत्येवर विश्वास नाही. त्याच्या खोलीत सुसाईड नोटही मिळाली नाही. मनोजचा मोबाईलही संशयास्पदरीत्या गायब आहे. पोलीसही मोबाईलची काहीच माहिती नसल्याचे सांगत आहेत. व्हीएनआयटी प्रशासनाने त्यांना वसतिगृह किंवा घटनास्थळही दाखविले नाही. त्यांना थेट शवविच्छेदनासाठी येण्यास सांगण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याStudentविद्यार्थी