शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

'दिल्लीतील हवा खराब, देशाची राजधानी नागपूरला करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 21:54 IST

दिल्लीतील हवा खराब आहे, त्यामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा असा सल्ला अध्यत्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी नागपूरात दिला आहे.

नागपूर - दिल्लीतील हवा खराब आहे, त्यामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा असा सल्ला आध्यत्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी नागपूरात दिला आहे. एका कार्यक्रमासाठी ते आज नागपुरात आलेले आहेत. अयोध्या मुद्यावर श्री श्री रविशंकर उद्या (शनिवारी) सरसंघचालकांची भेट घेणार आहेत.  

नागपूरला का राजधानी बनवलं जाऊ नये? नागपूर देशाच्या बरोबर मध्यभागी आहे. सर्वांना येण्या-जाण्याला बरं पडेल. आधीही विचार झाला होता. आता तर आपले पंतप्रधान डायनॅमिक आहेत. ते करु शकतात, असे श्री श्री रविशंकर म्हणाले. त्याचसोबत, नागपूरच नाही, तर नागपूरच्या बाजूलाही चालेल. एका नव्या पद्धतीने पूर्ण सृष्टी बनवावी लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. श्री श्री रविशंकर यांच्या वक्तव्यानंतर अद्याप कोणत्याही राजकीय पक्षांची प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र श्री श्री रविशंकर यांना राजकीय नेत्यांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

सद्यस्थितीत रामजन्मभूमीचा वाद सर्वोच्च न्यायालयात असून सौहार्दपूर्ण पद्धतीने तोडगा निघावा यासाठी श्री श्री रविशंकर यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी व धर्मगुरूंशी भेट घेऊन चर्चा केली. मात्र रविशंकर यांनी मध्यस्थीच्या दाखवलेल्या तयारीला आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड आणि विश्व हिंदू परिषदेनेही विरोध केलेला आहे. असवुद्दीन ओवैसी, आजम खान यासारख्या मुस्लिम नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. इतकेच काय तर हिंदुत्ववादी संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या प्रयत्नांना विरोध झाला. भाजपचे माजी खासदार राम विलास वेदांती यांनी रविशंकर यांच्यावर मोठा प्रश्नच उपस्थित केला. रविशंकर यांनी गोळा केलेल्या अमाप संपत्तीची चौकशी होऊ नये यासाठीच त्यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप वेदांती यांनी केला. या वादात मध्यस्थी करणारे रविशंकर कोण आहेत, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेतर्फे उपस्थित करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर रविशंकर यांनी शुक्रवारी लखनौ येथे ‘आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते थेट नागपूरला आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर ते शनिवारी सरसंघचालकांची भेट घेणार आहेत. संघ परिवारातील काही संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या मध्यस्थीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सरसंघचालकांसोबतच्या त्यांच्या भेटीला जास्त महत्त्व आले आहे. या भेटीमध्ये राममंदिर मुद्याचा तोडगा निघावा यासाठी नेमकी काय पावले उचलली पाहिजे, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मी सकारात्मक : श्री श्री रविशंकरदरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर श्री श्री रविशंकर अयोध्या राममंदिर मुद्याबाबत मी सकारात्मक असल्याचे सांगितले. रामजन्मभूमी वाद हा चर्चेतून सोडविल्या जाऊ शकतो. याचा तोडगा निघेल असा मला विश्वास आहे. हा वाद लवकरात लवकर दूर व्हावा, अशी माझी इच्छा असून मी सकारात्मक पद्धतीनेच याकडे पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर