शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ही तर संस्थात्मक हत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:35 IST

Deepali Chavan suicide case दीपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला. बहुजन समाजाने आजवर अशा अनेक संस्थात्मक हत्या झाल्या. या पीडितांच्या यादीमध्ये दीपालीचे नाव सामील होणे अत्यंत वेदनादायक आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये अत्यंत बेमालूमपणे जातीभेद, लिंगभेद कसा चालतोय याची जाणीव करून देणारी घटना आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमाजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा आरोप, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दीपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला. बहुजन समाजाने आजवर अशा अनेक संस्थात्मक हत्या झाल्या. या पीडितांच्या यादीमध्ये दीपालीचे नाव सामील होणे अत्यंत वेदनादायक आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये अत्यंत बेमालूमपणे जातीभेद, लिंगभेद कसा चालतोय याची जाणीव करून देणारी घटना आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोळसे पाटील म्हणाले, अत्यंत मागासलेल्या समाजातून येऊन स्वतःचे एक स्थान निर्माण करणारी दीपाली ही समाजासाठी आदर्शच होती. समाजातील अशा आदर्श म्हणून उभ्या राहणाऱ्या लोकांना अशी पावले उचलण्यासाठी सतत भाग पाडले गेले आहे. नोकरशाही मध्ये वरदहस्त नसणे, केवळ पगारावर जीवन अवलंबून असणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये हवी तशी एकी नसणे व जातीवाद्यांच्या बाजूला उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे पाठबळ असणे, या त्याला खतपाणी घालणाऱ्या काही त्रोटक बाबी आहेत.

दीपालीच्या आत्महत्येनंतर पहिले प्रथम ती कोणत्या जातीची आहे, याचाच शोध जास्त झाला. तिची जात कळल्याबरोबर ती एक महिला आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली.

रेड्डीला वाचविण्याचा प्रयत्न

रेड्डी याला वाचविण्याचा प्रयत्न उच्च पदस्थ नोकरशाह करीत आहेत. त्यांच्यावर केली जाणारी उच्च अधिकाऱ्यांमार्फतची चौकशी हा केवळ बनाव आहे. अत्यंत धूर्तपणे ही साक्षीदार आणि पुरावे बदलून प्रकरण कमजोर करतील व रेड्डीला सुटण्याचा मार्ग प्रशस्त करून देतील. दुसरा आरोपी शिवकुमार याला न्यायोचित शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यासाठीच निष्पक्ष तपास आणि दर्जेदार अभियोजन याची गरज आहे. अटकपूर्व जामीन नाकारलेला असतानादेखील रेड्डीला अटक करण्याचे टाळून राज्य सरकार व पोलीस यंत्रणेने आपला खरा रंग दाखवलेला आहे, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली. या प्रकरणात विशेष तपास पथक नेमून त्याद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग