शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ही तर संस्थात्मक हत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:35 IST

Deepali Chavan suicide case दीपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला. बहुजन समाजाने आजवर अशा अनेक संस्थात्मक हत्या झाल्या. या पीडितांच्या यादीमध्ये दीपालीचे नाव सामील होणे अत्यंत वेदनादायक आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये अत्यंत बेमालूमपणे जातीभेद, लिंगभेद कसा चालतोय याची जाणीव करून देणारी घटना आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमाजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा आरोप, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दीपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला. बहुजन समाजाने आजवर अशा अनेक संस्थात्मक हत्या झाल्या. या पीडितांच्या यादीमध्ये दीपालीचे नाव सामील होणे अत्यंत वेदनादायक आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये अत्यंत बेमालूमपणे जातीभेद, लिंगभेद कसा चालतोय याची जाणीव करून देणारी घटना आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोळसे पाटील म्हणाले, अत्यंत मागासलेल्या समाजातून येऊन स्वतःचे एक स्थान निर्माण करणारी दीपाली ही समाजासाठी आदर्शच होती. समाजातील अशा आदर्श म्हणून उभ्या राहणाऱ्या लोकांना अशी पावले उचलण्यासाठी सतत भाग पाडले गेले आहे. नोकरशाही मध्ये वरदहस्त नसणे, केवळ पगारावर जीवन अवलंबून असणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये हवी तशी एकी नसणे व जातीवाद्यांच्या बाजूला उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे पाठबळ असणे, या त्याला खतपाणी घालणाऱ्या काही त्रोटक बाबी आहेत.

दीपालीच्या आत्महत्येनंतर पहिले प्रथम ती कोणत्या जातीची आहे, याचाच शोध जास्त झाला. तिची जात कळल्याबरोबर ती एक महिला आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली.

रेड्डीला वाचविण्याचा प्रयत्न

रेड्डी याला वाचविण्याचा प्रयत्न उच्च पदस्थ नोकरशाह करीत आहेत. त्यांच्यावर केली जाणारी उच्च अधिकाऱ्यांमार्फतची चौकशी हा केवळ बनाव आहे. अत्यंत धूर्तपणे ही साक्षीदार आणि पुरावे बदलून प्रकरण कमजोर करतील व रेड्डीला सुटण्याचा मार्ग प्रशस्त करून देतील. दुसरा आरोपी शिवकुमार याला न्यायोचित शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यासाठीच निष्पक्ष तपास आणि दर्जेदार अभियोजन याची गरज आहे. अटकपूर्व जामीन नाकारलेला असतानादेखील रेड्डीला अटक करण्याचे टाळून राज्य सरकार व पोलीस यंत्रणेने आपला खरा रंग दाखवलेला आहे, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली. या प्रकरणात विशेष तपास पथक नेमून त्याद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग