शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण ही तर संस्थात्मक हत्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:35 IST

Deepali Chavan suicide case दीपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला. बहुजन समाजाने आजवर अशा अनेक संस्थात्मक हत्या झाल्या. या पीडितांच्या यादीमध्ये दीपालीचे नाव सामील होणे अत्यंत वेदनादायक आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये अत्यंत बेमालूमपणे जातीभेद, लिंगभेद कसा चालतोय याची जाणीव करून देणारी घटना आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देमाजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांचा आरोप, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - दीपाली चव्हाण हिने केलेली आत्महत्या नसून, ती एक संस्थात्मक हत्या असल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला. बहुजन समाजाने आजवर अशा अनेक संस्थात्मक हत्या झाल्या. या पीडितांच्या यादीमध्ये दीपालीचे नाव सामील होणे अत्यंत वेदनादायक आहे. वेगवेगळ्या संस्थांमध्ये अत्यंत बेमालूमपणे जातीभेद, लिंगभेद कसा चालतोय याची जाणीव करून देणारी घटना आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोळसे पाटील म्हणाले, अत्यंत मागासलेल्या समाजातून येऊन स्वतःचे एक स्थान निर्माण करणारी दीपाली ही समाजासाठी आदर्शच होती. समाजातील अशा आदर्श म्हणून उभ्या राहणाऱ्या लोकांना अशी पावले उचलण्यासाठी सतत भाग पाडले गेले आहे. नोकरशाही मध्ये वरदहस्त नसणे, केवळ पगारावर जीवन अवलंबून असणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये हवी तशी एकी नसणे व जातीवाद्यांच्या बाजूला उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे, मंत्र्यांचे पाठबळ असणे, या त्याला खतपाणी घालणाऱ्या काही त्रोटक बाबी आहेत.

दीपालीच्या आत्महत्येनंतर पहिले प्रथम ती कोणत्या जातीची आहे, याचाच शोध जास्त झाला. तिची जात कळल्याबरोबर ती एक महिला आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष केले गेले, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली.

रेड्डीला वाचविण्याचा प्रयत्न

रेड्डी याला वाचविण्याचा प्रयत्न उच्च पदस्थ नोकरशाह करीत आहेत. त्यांच्यावर केली जाणारी उच्च अधिकाऱ्यांमार्फतची चौकशी हा केवळ बनाव आहे. अत्यंत धूर्तपणे ही साक्षीदार आणि पुरावे बदलून प्रकरण कमजोर करतील व रेड्डीला सुटण्याचा मार्ग प्रशस्त करून देतील. दुसरा आरोपी शिवकुमार याला न्यायोचित शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यासाठीच निष्पक्ष तपास आणि दर्जेदार अभियोजन याची गरज आहे. अटकपूर्व जामीन नाकारलेला असतानादेखील रेड्डीला अटक करण्याचे टाळून राज्य सरकार व पोलीस यंत्रणेने आपला खरा रंग दाखवलेला आहे, अशी टीका कोळसे पाटील यांनी केली. या प्रकरणात विशेष तपास पथक नेमून त्याद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग