शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

विदर्भात पावसाचा जाेर कमी, चंद्रपुरात कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 00:09 IST

Decreased rainfall in Vidarbha चंद्रपूर आणि गाेंदिया वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने थाेडा दिलासा दिला. नागपुरात दिवसभर आकाश ढगाने दाटले हाेते पण सायंकाळी सूर्यदर्शन घडले. शहरात सकाळपर्यंत ७१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.

ठळक मुद्देसरासरीपेक्षा ५४ टक्के अधिक नाेंद : नागपुरात विश्रांती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चंद्रपूर आणि गाेंदिया वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने थाेडा दिलासा दिला. नागपुरात दिवसभर आकाश ढगाने दाटले हाेते पण सायंकाळी सूर्यदर्शन घडले. शहरात सकाळपर्यंत ७१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र पावसाने जाेरदार तडाखा दिला तर गाेंदिया जिल्ह्यातही सकाळपर्यंत जाेरदार मुसंडी मारली. विभागातील सहा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसाच्या सरासरीपेक्षा ५४ टक्के अधिक पावसाची नाेंद करण्यात आली.

पूर्व विदर्भात दाेन दिवसांपासून पावसाने चांगलीच कृपादृष्टी केली. सहाही जिल्ह्यात सकाळपर्यंत एकूण ५२.३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली. शहरात १२१.९ मिमी तर जिल्ह्यात ८८.१ मिमी पावसाची नाेंद झाली. गाेंडपिपरी, वराेरा, सिंदेवाही, राजुरा, काेरपना, बल्लारपूर, जिवती या तालुक्यात धाेकादायक पातळीपेक्षा अधिक पावसाची नाेंद झाली. दुसरीकडे गाेंदिया जिल्ह्यात ४७.१ मिमी पावसाची नाेंद झाली. शहरात ९८.४ मिमी नाेंदविला गेला. यानंतर भंडारा २५.९ मिमी, गडचिराेली १६.६ मिमी तर वर्धा जिल्ह्यात ५४.६ मिमी पाऊस नाेंदविण्यात आला. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १०७२ मिमी पाऊस नाेंदविला जाताे. मागील वर्षी ४१८ मिमी पावसाची नाेंद झाली हाेती. यावर्षी आतापर्यंत ५१० मिमीची नाेंद झाली असून सरासरीच्या तुलनेत ११२ टक्के आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये अमरावतीत सकाळपर्यंत १९ मिमी, यवतमाळ १९ मिमी, वाशिम ५ मिमी तर अकाेला ५.४ मिमी पावसाची नाेंद झाली.

मागील वर्षीच्या तुलनेत अधिक

नागपूर विभागात २४ तासात २२० मिमी नाेंद झाली. गेल्या वर्षी २३ जुलैपर्यंत ४१८ मिमी पावसाची नाेंद झाली हाेती, जी सरासरीच्या ९१.८ टक्के हाेती. यावर्षी आतापर्यंत ५१० मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. जी सामान्यच्या तुलनेत ११२ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.२ टक्के अधिक आहे.

विदर्भातील धरणे ४८ टक्के भरली

तीन दिवसांच्या दमदार पावसाने विदर्भातील काेरडे पडलेले जलसाठे हळूहळू भरायला लागले आहेत. नागपूर व अमरावती विभाग मिळून विदर्भातील सिंचन प्रकल्पात आतापर्यंत ४७.८७ टक्के जलसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा जवळपास ८ टक्क्यांनी कमी असला तरी पावसाचा जाेर बघता लवकरच ही क्षमता गाठण्याची शक्यता आहे. विभागात एकूण १६ मोठे सिंचन प्रकल्प आहेत, ज्यामध्ये ४३०२ दलघमी पाणीसाठी करण्याची क्षमता आहे. याशिवाय मध्यम ४२ तर ३८४ लघुप्रकल्प आहेत, ज्यामध्ये १२७६ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. २३ जुलैपर्यंत माेठ्या प्रकल्पात २२७९.९२ दलघमी पाणी साठले आहे, जे ४३.५७ टक्के आहे. मागील वर्षी या काळात ५६.५ टक्के पाणी भरले हाेते. अमरावती विभागात २५ माेठे प्रकल्प आहेत, ज्यामध्ये २९५३.८८ दलघमी जलसाठा करण्याची क्षमता आहे. आतापर्यंत १८००.४३ दलघमी पाणी जमा झाले आहे, जे ५२.१७ टक्के हाेते. गेल्या वर्षी या काळापर्यंत ते ५३ टक्के हाेते. नागपूर जिल्ह्यातील ठाणा लघुसिंचन प्रकल्प गुरुवारी १०० टक्के भरला. वरोरा येथील चंदई मध्यम प्रकल्प, नागभीड येथील चिंधी लघु प्रकल्पदेखील १०० टक्के भरले आहेत. चिमूरमधील गिरगाव व गडचिरोलीतील मामा तलावदेखील पूर्ण भरले आहेत.

टॅग्स :DamधरणRainपाऊस