शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राज्यात डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:38 IST

२०१९ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी २०१८ सालच्या तुलनेत मृत्यूंमध्ये मात्र बरीच घट झाली आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या मात्र वाढीस : ४६ महिन्यात १७५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकनगुन्या यासारख्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात या कार्यक्रमांतर्गत २०१९ साली थोडेफार यश मिळाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी २०१८ सालच्या तुलनेत मृत्यूंमध्ये मात्र बरीच घट झाली आहे. २०१६ सालापासून ३६ महिन्यात १७५ हून अधिक रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. २०१९ साली १० महिन्यात ही संख्या १२ इतकी होती. माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.राज्यात डासांमुळे प्रसारित होणाºया रोगांसंदर्भात उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आरोग्यविभाग सहसंचालकांकडे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१६ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राज्यात डेंग्यू-हिवताप-हत्तीरोग-चिकनगुन्याचे किती रुग्ण आढळले, किती रुग्णांचा मृत्यू झाला इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत या कालावधीत राज्यात डेंग्यूचे ३५ हजार ५५८ रुग्ण आढळून आले व त्यात १८० रुग्णांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये ११ हजार ३८ रुग्ण आढळून आले होते व ७० रुग्णांना जीव गमवावा लागला तर २०१९ च्या पहिल्या दहा महिन्यात हीच संख्या ९ हजार ८९९ रुग्ण व १२ मृत्यू इतकी होती.हिवतापावर बऱ्यापैकी नियंत्रणकेंद्र, राज्य शासनाकडून हिवतापावर नियंत्रण यावे यासाठी विविध मोहीम राबविण्यात आल्या. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण २०१६, २०१७, २०१८ च्या तुलनेत कमी झाले आहे. २०१६ मध्ये २३,९८३ रुग्ण व २६ मृत्यू, २०१७ मध्ये १७,७१० रुग्ण व २० मृत्यू तर ७,१७८ रुग्ण व पाच मृत्यू अशी होती. २०१६ च्या तुलनेत रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूDeathमृत्यूRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता