शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कुश कटारिया व पिंटू शिर्के हत्याकांडावर आज फैसला

By admin | Updated: June 22, 2015 02:55 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित कुश कटारिया व पिंटू शिर्के हत्याकांडातील अपिलांवर उद्या (सोमवारी) फैसला होणार आहे.

हायकोर्ट : उपराजधानीत दहशत पसरविणाऱ्या घटनानागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित कुश कटारिया व पिंटू शिर्के हत्याकांडातील अपिलांवर उद्या (सोमवारी) फैसला होणार आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख हे दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करतील. २२ एप्रिल रोजी पिंटू शिर्के तर, ५ मे रोजी कुश कटारिया हत्याकांडातील अपिलांवर अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. या दोन्ही घटनांनी उपराजधानीत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशी आहे प्रकरणांची सद्यस्थितीकुश कटारिया हत्याकांडनागपूर सत्र न्यायालयाने कुश कटारिया हत्याकांडातील मुख्य आरोपी आयुष निर्मल पुगलियाला भादंविच्या कलम ३०२(हत्या)अंतर्गत आजन्म सश्रम कारावास, कलम ३६४(अपहरण)अंतर्गत आजन्म सश्रम कारावास आणि कलम २०१ अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. परंतु त्याला कलम ३६४-अ(खंडणीसाठी अपहरण)मधून दोषमुक्त करण्यात आले आहे. आयुषने त्याच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. याशिवाय शासनाच्या दोन अपील आहेत. एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील भादंविच्या कलम ३६४(अ)मधून सुटकेला आव्हान देणारे आहे. या तिन्ही अपिलांवर उच्च न्यायालयात एकत्र सुनावणी झाली. शासनातर्फे विशेष सरकारी वकील राजेंद्र डागा तर, आरोपीतर्फे अ‍ॅड. ए.एम. रिझवी यांनी बाजू मांडली. स्वत:चे दावे सिद्ध करण्यासाठी अ‍ॅड. डागा यांनी सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे सुमारे २० निर्णय सादर केले असून, बचाव पक्षातर्फे ६ निर्णय सादर करण्यात आले आहेत. घटना११ आॅक्टोबर रोजी दुपारी २ च्या सुमारास कुश हा शुभम बैद व रिद्म पुरिया या दोन मित्रांसोबत घरात खेळत होता. दरम्यान, आरोपी आयुषने चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला स्वत:कडे बोलावले. कुणालाही दिसू नये म्हणून तो कुश गॅलरीतून खाली उतरतपर्यंत पुढे निघून गेला. कुश त्याच्या मागे धावत आला. यानंतर आयुष कुशला दुचाकीवर बसवून परिसरातून निघून गेला. सायंकाळी ६ च्या सुमारास त्याने खंडणीसाठी कटारियांच्या घरी दूरध्वनी केला. ‘दोन कोटी रुपये द्या अन्यथा कुशला ठार मारेन, पोलिसांना माहिती दिल्यास खबरदार’, अशी धमकी त्याने दिली. कुशचे अपहरण झाल्याचे पुढे आल्यावर गुन्हे शाखा पोलिसांसह संपूर्ण यंत्रणेने कुशचा शोध घेतला, पण काहीच फायदा झाला नाही. कुश आयुषच्या मागे गेला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर आयुषला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आयुषने हत्येची कबुली दिली. आयुषने कुशची सूर्यनगरातील एका निर्माणाधीन इमारतीत नेऊन अत्यंत निर्घृण हत्या केली होती. आयुषने आधी कुशच्या डोक्यावर विटेने जोरदार प्रहार केला. कुश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यावर आरोपीने कटरने कुशचा गळा कापला. यानंतर तो कुशचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून घटनास्थळावरून निघून गेला.पिंटू शिर्के हत्याकांडनागपूर सत्र न्यायालयाने पिंटू शिर्के हत्याकांडातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, सात आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली आहे. विजय किसनराव मते, उमेश संपतराव डहाके, रितेश हिरामणजी गावंडे, किरण उमरावजी कैथे, कमलेश सीताराम निंबर्ते, दिनेश देवीदास गायकी, राजू विठ्ठलराव भद्रे आणि अयुब अमीर खान अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये मंगेश शिवाजीराव चव्हाण, मयूर ऊर्फ बंटी शिवाजीराव चव्हाण, पांडुरंग मोतीरामजी इंजेवार, राजेश दयारामजी कडू, महेश दामोदर बांते, संदीप नीळकंठराव सणस व मारोती ऊर्फ नव्वा संतोषराव वलके यांचा समावेश आहे. मते, भद्रे व अयुब यांनी स्वतंत्रपणे तर, कैथे व गायकी आणि डहाके, गावंडे व निंबर्ते यांनी मिळून त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. राज्य शासन व विजया शिर्के यांनी सात आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला अपीलद्वारे आव्हान दिले आहे. तसेच विजया शिर्के यांनी जन्मठेप झालेल्या आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्यासाठी वेगळे अपील दाखल केले आहे. या सर्व आठ अपिलांवर एकत्र सुनावणी झाली. घटना१८ जुलै २००१ रोजी विजय मतेवर त्याच्या रघुजीनगर येथील घरी देशीकट्ट्यातून गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पिंटू शिर्के आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या माळ्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एम. सईद यांच्यासमक्ष सुनावणी सुरू होती. १९ जून २००२ रोजी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजताच्या सुमारास पिंटू शिर्के, सहआरोपी सागर जैन, हितेश उके, पप्पू ऊर्फ नरेंद्र मालवीय आणि इतरांना पोलीस संरक्षणात सईद यांच्या न्यायालयात आणण्यात आले होते. पोलीस कॉन्स्टेबल दीपक त्रिवेदी हा पिंटू शिर्के आणि मालवीय यांना घेऊन होता. प्रकरण दुपारी १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान लागणार असल्याचे न्यायालय लिपिकाने सांगितल्यानंतर पोलिसांनी शिर्के आणि मालवीयला न्यायालयाच्या बाहेर आणले. दरम्यान, विजय मते व त्याच्या १४-१५ साथीदारांनी शिर्केवर गुप्ती, चाकू, कुकरी आणि भाल्याच्या पात्याने हल्ला केला. यानंतर आरोपी पळून गेले. शिर्केचा मेयो रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. त्याच्या देहाची अक्षरश: चाळण करण्यात आली होती. (प्रतिनिधी)