शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

तंत्र शिक्षण संचालनालयाच्या निर्णयामुळे धावपळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 01:28 IST

तंत्र शिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र गरजेचे केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देजिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची ९५ टक्के कामे पूर्ण : दोन महिन्यात ३६०० प्रमाणपत्राचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्र शिक्षण संचालनालयाने अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र, मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र गरजेचे केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांची चिंता वाढली आहे. जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात वाढलेली गर्दी ही तंत्र शिक्षण संचालनालयाच्या निर्णयामुळे आहे. असे असले तरी समितीचे प्रमाणपत्र पडताळणीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. समितीने प्रमाणपत्र वितरणासंदर्भात मोहीम राबवून गेल्या दोन महिन्यात ३६०० पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप केले आहे. गेल्या तीन ते चार दिवसात एक हजारच्या जवळपास प्रमाणपत्राचे वितरण केले आहे. समितीचे कामे वेगाने सुरू आहे. पालक व विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, सर्वांना प्रमाणपत्र मिळतील असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य व उपायुक्त आर. डी. आत्राम यांनी केले आहे.समितीकडे यावर्षी आलेले अर्ज आणि झालेले वितरणअभियांत्रिकी, वैद्यकीय व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. यावर्षी बारावीचे १३००० अर्ज व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ५००० अर्ज समितीकडे आले होते. एप्रिल महिन्यापासून समितीने प्रमाणपत्र वितरणाचे काम हाती घेतले. त्यासाठी मोहीम राबविली. एकाच वेळी ८०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण केले. सातत्याने मोहीम राबविल्याने दोन महिन्यात ३६०० प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. तसेच वर्षभर प्रमाणपत्राचे वितरण सुरूच होते. एक हजाराच्या आसपास काही त्रृटीचे प्रस्ताव सोडल्यास जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम झाले आहे.पालकांकडून वेळीच दखल नाहीसमितीकडून सातत्याने प्रमाणपत्राचे काम सुरू आहे. ज्यांचे प्रमाणपत्र तयार झाले आहे, त्यांना एसएमएसच्या माध्यमातून कळविले आहे. दोन वेळा एसएमएसद्वारे रिमार्इंडसुद्धा केले आहे. त्यानंतर ते घेऊन गेले नाही. अशांना पोस्टाच्या माध्यमातून प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. अर्जातील त्रुटीसंदर्भातही वेळोवेळी एसएमएस करण्यात आले होते. तेव्हा पालकांनी दखल घेतली नाही. ऐन प्रवेशाची वेळ आल्यावर प्रमाणपत्रासाठी गर्दी वाढली आहे. दरवर्षी हीच अवस्था असते का?सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात ६ सप्टेंबर २०१७ ला निर्णय दिला आहे. त्याचा आधार घेत तंत्र शिक्षण संचालनालयाने अर्जासोबत पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याचा निर्णय घेतला होता. पडताळणी प्रमाणपत्राशिवाय अर्ज स्वीकारले जात नसल्याने विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे. गेल्यावर्षी महाविद्यालयांनी जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय प्रवेश दिले होते. विद्यार्थ्यांकडून ३ महिन्यात प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात अंडरटेकिंग घेतले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ झाली नाही. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने कास्ट व्हॅलिडीटी संदर्भात जो निर्णय दिला आहे, तो अनुसूचित जमातीच्या संदर्भात असल्याची माहिती आहे. परंतु संचालनालयाने यात सर्वच प्रवर्गांना समाविष्ट केले आहे. अधिकाऱ्यांवर अतिरिक्त प्रभारामुळे अडचण जाणवते का?नागपूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे महाराष्ट्रात सर्वाधिक अर्ज येतात. समितीचे अध्यक्ष हे अप्पासाहेब धुळाज आहे. सदस्य सचिव म्हणून व्ही.बी. वाकुलकर आहे. परंतु त्यांच्याकडे नागपूरबरोबर गोंदिया व वर्धेचासुद्धा प्रभार आहे. त्याचा काहीसा परिणाम कामावर होत आहे. विद्यार्थ्यांना मिळणार का प्रमाणपत्र?विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे शनिवारीसुद्धा प्रमाणपत्र वितरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळतील. पालकांनी, विद्यार्थ्यांनी गोंधळ करू नये.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीCaste certificateजात प्रमाणपत्र