शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून निर्णय; कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचा विधानसभेत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 05:40 IST

वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन हस्तांतर प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत निवेदन करत सद्सद्  विवेकबुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क     

नागपूर:  वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन हस्तांतर प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी विधानसभेत निवेदन करत सद्सद्  विवेकबुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपण कोणतेही नियमबाह्य काम केले नसून न्यायालय जी शिक्षा देईल ती भोगायला तयार असल्याचेही ते म्हणाले.         वाशिम जिल्ह्यातील घोडबाभूळ गावातील ३७ एकर १९ गुंठे जमीन बेकायदा खासगी व्यक्तीला दिल्याप्रकरणी सत्तार यांच्यावर दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. नागपूर खंडपीठाने याबाबत ताशेरे ओढल्याने सोमवारी विरोधकांनी गोंधळ घालत विधानसभेचे कामकाज बंद पाडले होते. त्यातच सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटी रुपयांच्या वसुलीचे ‘कॉल रेकॉर्डिंग’ व्हायरल झाले होते. त्यावरूनही विरोधक आक्रमक झाले होते. मात्र, मंगळवार आणि बुधवारी या मुद्द्यावर विरोधकांनी नरमले होते.     

टीईटी घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी निषेध करत सभात्याग केला. ही संधी साधत सत्तार यांनी जमीन घोटाळा प्रकरणाचा खुलासा केला. दिवाणी न्यायालयाचा निकाल अधिकाऱ्यांनी माझ्या निदर्शनास आणला नाही. वारसा नोंदी आणि जमीन कसत असल्याचे पुरावे माझ्यासमोर आल्यामुळे  मी हा निर्णय घेतला, असे सत्तार म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAbdul Sattarअब्दुल सत्तार