शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
6
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
7
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
11
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
12
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
13
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
14
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
15
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
16
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
17
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
18
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
19
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
20
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’

नागपूर शहरातील मृत्यूंची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:33 IST

लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वर्दळ थांबली आहे. अपघात घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामुळे नागपूर शहरात मृत्यूचे प्रमाण घटले आहे. दररोच विविध कारणांनी ६० ते ६२ लोकांचा मृत्यू होतो. परंतु मागील २५ दिवसात यात घट झालेली आहे. दररोज ४५ ते ४७ लोकांचा मृत्यू होत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे अपघात कमी झाले : मनपाच्या घाटांवरील नोंदीवरून स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे रस्त्यांवरील वर्दळ थांबली आहे. अपघात घडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. यामुळे नागपूर शहरात मृत्यूचे प्रमाण घटले आहे. दररोच विविध कारणांनी ६० ते ६२ लोकांचा मृत्यू होतो. परंतु मागील २५ दिवसात यात घट झालेली आहे. दररोज ४५ ते ४७ लोकांचा मृत्यू होत आहे. शहरातील महापालिकेच्या घाटावरील अंतिम संस्काराची आकडेवारी बघता गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या मार्च महिन्यातील मृत्यूचे प्रमाणात कमी झाले आहे. मार्च २०१९ मध्ये नागपूर शहरात १८२५ लोकांचा मृत्यू झाला होता. यातील १६३८ जणांवर अंतिम संस्कार करण्यात आले तर १८७ जणांना दफन करण्यात आले. मार्च २०२० मध्ये नागपूर शहरात १४१५ मृत्यूंची नोंद करण्यात आली. यातील १२८६ जणांवर अंतिम संस्कार करण्यात आले तर १२९ जणांचा दफनविधी करण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात मृत्युसंख्या ४१० ने कमी झालेली आहे. एप्रिल महिन्याच्या १५ तारखेपर्यंत मृत्यूचा आकडा गेल्या वर्षाच्या तुलेनत घटला आहे. लॉकडाऊ नच्या कालावधीत मनपाच्या दहनघाटावरील अंतिम संस्कार गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात कमी झाल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. नागपुरातील बाधित रुग्णांचा आकडा ५६ पर्यंत पोहचला आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. सर्व नागरिक कोरोनाच्या दहशतीत आहेत. असे असतानाच शहरातील मृत्यूंचा आकडा कमी होणे ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.वाहन अपघात कमी झालेनागपूर शहरात दररोज लहान-मोठे १५ ते २० वाहन अपघात होतात. अनेकदा अशा अपघातात बळी जातात. परंतु लॉकडाऊ नमुळे शहरातील रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ थांबली आहे. अत्यावश्यक सेवेची १० ते १५ टक्केच वाहने धावत आहेत. यामुळे महिनाभरात वाहनांचे अपघात जवळपास शून्यावर आले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर