शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्रांसोबत शाळेच्या छतावर खेळत असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा इमारतीजवळून गेलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा (तांडा) येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. तक्रार करूनही तारा हटविण्यात न आल्याने ही घटना घडल्याचा आरोप करीत ...

ठळक मुद्देदाभा येथील घटना : मृतदेह उचलण्यास नागरिकांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्रांसोबत शाळेच्या छतावर खेळत असलेल्या ११ वर्षीय विद्यार्थ्याचा इमारतीजवळून गेलेल्या विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाभा (तांडा) येथे मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. तक्रार करूनही तारा हटविण्यात न आल्याने ही घटना घडल्याचा आरोप करीत कुटुंबीयांसह नागरिकांनी पोलिसांना मृतदेह उचलण्यास विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. मात्र, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांनी नागरिकांची समजूत काढत शांत करण्याचा प्रयत्न केला.आदित्य वासुदेव राठोड (११, रा. तांडा-दाभा, ता. हिंगणा) असे दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे. आदित्य हा दाभा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी होता. या शाळेच्या इमारतीजवळून विजेच्या तारा गेल्या आहेत. विशेष म्हणजे, त्या उघड्या आहेत. आदित्य शाळा सुटल्यानंतर त्याच्या दोन मित्रांसोबत या शाळेच्या छतावर खेळत होता. खेळताना त्याचा तोल गेला आणि जवळच असलेल्या विजेच्या तारेला त्याचा स्पर्श झाला. विद्युत धक्क्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.त्यातच त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ गोळा झाले. सदर घटनेची माहिती लगेच हिंगणा पोलीस व महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उचलण्याचा प्रयत्न करताच नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली. वारंवार मागणी करूनही महावितरण कंपनीने विजेच्या तारा न हटविल्याने ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबीयांसह नागरिकांनी केला. शिवाय, आदित्यच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणीही रेटून धरल्याने घटनास्थळी तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते.मात्र, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नागरिक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने रात्री उशिरापर्यंत पेच कायम होता.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज