शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नागपुरात  विद्यार्थ्यांच्या मारपिटीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 21:06 IST

जीएस कॉलेजमध्ये वर्गात झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारपिटीत बारावीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यावर २४ तासानंतर घटनेचा खुलासा झाला. त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करणारे पोलीस अचानक सतर्क झाले.

ठळक मुद्देजीएस कॉलेजमधील घटना : २४ तासानंतर झाला मृत्यूचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जीएस कॉलेजमध्ये वर्गात झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारपिटीत बारावीच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यावर २४ तासानंतर घटनेचा खुलासा झाला. त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करणारे पोलीस अचानक सतर्क झाले. मृत विद्यार्थी मानकापूर येथील रहिवासी १७ वर्षीय राहुल राधारमण तिवारी आहे.राहुल जीएस कॉलेजचा बारावीचा विद्यार्थी होता. त्याची लहान बहीण निशितासुद्धा जीएस कॉलेजमध्ये अकरावीला आहे. दोघेही सोबत कॉलेजला यायचे. परंतु २ आॅगस्टला एमएससीईटीची परीक्षा असल्याने निशिता कॉलेजला गेली नाही. राहुल सकाळी ११ वाजता घरून कॉलेजसाठी निघाला. दुपारी ३.४५ वाजता मनिषा चौधरी या शिक्षिकेचा क्लास संपल्यानंतर त्या बाहेर पडल्या. दुसरी शिक्षिका येण्यापूर्वी राहुलचा वर्गातील विद्यार्थ्यासोबत वाद झाला. सूत्रांच्या मते राहुलने त्या विद्यार्थ्याकडे पेन फेकला होता. त्या विद्यार्थ्याने पुन्हा राहुलकडे पेन फेकला. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. राहुलने त्याला थापड मारली. संतप्त होऊन त्या विद्यार्थ्याने सुद्धा राहुलला थापड मारली. पण राहुल जमिनीवर पडला. त्यामुळे वर्गात खळबळ माजली. राहुल पडल्याचे सांगत विद्यार्थी शिक्षकाकडे ओरडत गेले. विद्यार्थ्यांच्या मदतीने त्याला स्पोर्ट रुममध्ये पोहचविले. तिथे ग्लुकोज पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुलकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला रविनगर येथील दंदे रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णालयात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे डॉ. पिनाक दंदे यांनी सांगितले. डॉक्टरांनी स्थानिक पोलिसांना सूचना देऊन मृत विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.घटनेची माहिती मिळताच राहुलचे नातेवाईक दंदे हॉस्पिटलमध्ये पोहचले. शिक्षकांनी त्यांना राहुल पडल्याचे सांगितले. परंतु राहुलच्या कुटुंबीयांना सुरुवातीपासूनच संशय होता. घटनेच्या नंतर काही विद्यार्थी सुद्धा दंदे हॉस्पिटलमध्ये पोहचले पण आज सकाळी कुणीही पोहचले नव्हते. कॉलेज नियमित सुरू होते. राहुलचे कुटुंबीय शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह सीताबर्डी पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मृतदेह तिथेच सोडून पोलिसांसोबत जीएस कॉलेजला पोहचले. कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षिकेकडून घटनेची विचारणा केली. परंतु शिक्षिकेने वर्गात मारपीट झाल्याचे सांगितले नाही. कुटुंबीयांनी हजेरी रजिस्टर बघितले. त्यानुसार वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांकडून विचारणा करण्यात आली. यात राहुलला मारहाण झाल्याची माहिती पुढे आली.

टॅग्स :MurderखूनStudentविद्यार्थी