शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'त्या' बालिकेचे निधन, विमानातच हृदयविकाराचा तीव्र झटका

By मोरेश्वर मानापुरे | Updated: August 31, 2023 18:49 IST

विस्ताराचा बेंगळुरू-दिल्ली प्रवास

नागपूर : विस्तारा विमान कंपनीच्या बेंगळुरू ते दिल्ली विमानात एका १५ महिन्याच्या बालिकेला २७ ऑगस्टला रात्री १०.३० वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर विमान आपत्कालिन परिस्थितीत नागपुरात उतरविण्यात आले होते. तिच्यावर किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तीन दिवसांच्या अथक संघर्षानंतर ३१ ऑगस्टला पहाटे ३.१५ वाजता तिची प्राणज्योत मावळली.

बालिकेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली होती. त्यावेळी विमानात प्रवास करणाऱ्या दिल्ली एम्सच्या डॉ. नवदीप कौर, डॉ. दमणदीप सिंग, डॉ. रिषभ जैन, डॉ. ओशिखा आणि डॉ. अविचला तक्षक या पाच डॉक्टरांनी तिच्यावर विमानातच तब्बल ४५ मिनिटे उपचार केले होते. त्यावेळी तिचा श्वास सुरू झाला होता. विमान नागपूर विमानतळावर उतरविल्यानंतर तिला तातडीने किम्स-किंग्सवे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते.

उपचारादरम्यान तिचे मूत्रपिंड निकामी झाले होते आणि तिला अनेक विकारांनी ग्रासले होते. या बालिकेला जन्मजात हृदयविकाराचा त्रास होता. तिच्यावर बेंगळुरू येथील नारायणा हेल्थ येथे हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम्स-किंग्जवे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतरही ती वाचू शकली नाही. गुरुवारी पहाटे ३.१५ वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.