शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलांचा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 22:11 IST

बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठीच्या हरदासनगर येथील ७ ते ८ मुले महादेव घाट येथे पोहण्यासाठी गेले होते. यातील चार मुले पोहताना नदीच्या खोल पाण्यात गेली होती.

कामठी - शिवजयंतीची सुटी असल्याने कामठीच्या महादेव घाट येथे कन्हान नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कामठीच्या हरदासनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अजेश नितनवरे (१३) आणि प्रवेश प्रवीण नागदेवे (१४) रा. हरदासनगर, कामठी अशी मृत मुलांची नावे आहेत. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कामठीच्या हरदासनगर येथील ७ ते ८ मुले महादेव घाट येथे पोहण्यासाठी गेले होते. यातील चार मुले पोहताना नदीच्या खोल पाण्यात गेली. यातील दोघे बुडताना दिसताना अन्य दोघांनी बाहेर येत त्यांना वाचविण्यासाठी आरडाओरड केली. जलमित्र पुरुषोत्तम कावळे त्यांच्या सहकाºयांसह याच परिसरात होते. त्यांना दोन मुले बुडाल्याची माहिती मिळताच त्यांनी नदीपात्रात अजेश आणि प्रवेशचा शोध घेतला. दीड तासाच्या शोधमोहिमेनंतर या दोघांचे मृतदेह त्यांनी नदीपात्रातून बाहेर काढले. दोन दिवसापूर्वी अजेश नितनवरे याचा वाढदिवस होता. तो सेंट जेलेनी स्कूलमध्ये ७ व्या वर्गात शिक्षण घेत होता. प्रवेश नागदेवे नूतन सरस्वती हायस्कूलचा ९ व्या वर्गाचा विद्यार्थी होता.अजेशच्या वडिलांचे त्याच्या बालपणीच निधन झाले होते. त्याचे वडील डब्ल्यूसीएलमध्ये होते. वडिलांच्या जागेवर त्याच्या आईला डब्ल्यूसीएल प्लांट येथे नोकरी मिळाली होती. अजेश हरदासनगर येथील त्यांच्या आजोबाकडे शिकायला होता. दुसरा मृत प्रवेश याला दोन बहिणी आहेत. प्रवेशच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आईला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळतात हरदास नगर येथील नागरिकांनी महादेव घाटाकडे धाव घेतली. या दोघांचेही मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर