शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

By admin | Updated: October 28, 2016 02:40 IST

रात्रीच्या वेळी पिकांचे ओलित करण्यासाठी शेतात जात असलेल्या दोन तरुणांना मार्गातील नाला ओलांडताना जोरदार विजेचा धक्का लागला.

गोंडी मोहगाव शिवारातील घटना : नाल्यातील पाण्यात वीजप्रवाह प्रवाहितकाटोल : रात्रीच्या वेळी पिकांचे ओलित करण्यासाठी शेतात जात असलेल्या दोन तरुणांना मार्गातील नाला ओलांडताना जोरदार विजेचा धक्का लागला. त्यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, या नाल्यातील पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित होता. ही घटना काटोल तालुक्यातील गोंडी मोहगाव शिवारात बुधवारी रात्री घडली. मृतांचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी दोघांचेही मृतदेह काटोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले होते. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. सुमित केशव मारबते (२१) व महेंद्र मनोहर मारबते (२३) दोघेही रा. मोहगाव (भदाडे) ता. नरखेड अशी मृत तरुणांची नावे आहेत. मारबते कुटुंबीयांची काटोल तालुक्यातील गोंडी मोहगाव शिवारात शेती आहे. हल्ली ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात असल्याने तसेच दिवसा थ्री फेज वीजपुरवठा बंद केला जात असल्याने दोन्ही तरुण बुधवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेतात जाण्यासाठी घरून पायी निघाले. त्यांचे शेत गावापासून तीन कि.मी. अंतरावर आहे. शेताच्या वाटेवर नाला असल्याने ते नाला ओलांडत होते. नाल्यातील पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित असल्याने दोघांनाही विजेचा जोरदार धक्का लागला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोघेही गुरुवारी सकाळी घरी परत न आल्याने सुमितचे वडील त्यांना बोलावण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी दोघांचेही मृतदेह नाल्यात पडले असल्याचे आढळून आले. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच ग्रामस्थ गोळा झाले. माहिती मिळताच काटोल पोलिसांनी घटनास्थळ गाळून दोन्ही मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले. त्यातच अंदाजे ३०० ते ३५० ग्रामस्थ तसेच मृतांचे नातेवाईक काटोल येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष ग्रामीण रुग्णालयात येऊन आर्थिक मदतीचे आश्वासन द्यावे, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यावर पालकमंत्र्यांनी कुटुंबीयांना मोहगाव (भदाडे) येथे जाण्याची सूचना केल्यानंतरही ग्रामस्थ व नातेवाईकांनी दोन्ही मृतदेह उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणले. त्यावेळी कार्यालयात अधिकारी नव्हते. शिवाय, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे व महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी ग्रामस्थांना दाद दिली नाही. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कार्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी रात्री मोहगाव (भदाडे) येथे जावून मृतांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. (तालुका प्रतिनिधी)नाल्यात टाकला अर्थिंगनाल्याच्या काठावर नरेंद्र वसंतराव मदनकर यांची शेती आहे. त्यांनी ओलितासाठी या नाल्यावर मोटरपंप बसविला असून, त्यासाठी विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजप्रवाह घेतला होता. या तारांचा अर्थिंग मात्र नाल्यातील पाण्यात टाकण्यात आला होता. त्यामुळे पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत राहणार असल्याची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली होती. परंतु, थ्री फेज वीजपुरवठा दिवसभर बंद व रात्रभर सुरळीत राहत असल्याने शेतकऱ्यांना रात्री ओलितासाठी नाईलाजास्तव जावे लागते. दिवसा थ्री फेज वीजपुरवठा उपलब्ध असता तर ही घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. पालकमंत्र्यांची दिले आश्वासनमृतांचे कुटुंबीय उपविभागीय कार्यालयात ठाण मांडून बसले होते. त्यातच उपविभागीय अधिकारी (महसूल) अर्चना पाठारे या सायंकाळी ६.२० वाजताच्या सुमारास कार्यालयात पोहोचल्या. त्यांनी कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुटुंबीयांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बोलावण्याची आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे पाठारे यांनी लगेच मृतांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांशी फोनवर बोलणे करवून दिले. पालकमंत्र्यांनी मृख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन्ही मृतदेह सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास कार्यालयातून उचलण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर मोहगाव (भदाडे) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.