शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव विकासाला विरोध करणे हाच आहे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 20:49 IST

DCM Devendra Fadnavis Replied Uddhav Thackeray: धारावीतील लोकांना घरे मिळू नये, हीच उद्धव ठाकरेंची नीती आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

DCM Devendra Fadnavis Replied Uddhav Thackeray: धारावीकरांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे. मात्र, आम्ही संपूर्ण मुंबई अदानी-अंबानींच्या घशात घालू देणार नाही. तिथे टीडीआरची सक्ती करायला नको. तरीदेखील टीडीआर बँक बनवायची असेल तर त्याची मालकी सरकारकडे असायला हवी. अदानीकडे नाही. आमच्या काळात टेंडर निघालेले नाही हे जगजाहीर आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. हिवाळी अधिवेशन सुरू असून, नागपूर येथे मीडियाशी उद्धव ठाकरे बोलत होते. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी एकच गोष्ट सांगतो की, जे पहिले धारावीचे टेंडर होते, ते काही अदानी यांना देण्यात आलेले नव्हते. ते टेंडर रद्द करण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केले. आता जे टेंडर आहे, त्याचे नियम आणि अटी ठरवण्याचे काम कोणी केले, तेही उद्धव ठाकरे सरकारने केले. हेच उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे की, ते विकासाच्या कामांना नेहमीच विरोध करतात, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. 

उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव विकासाला विरोध करणे हाच आहे

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीतील लोकांना घरे मिळू नये, अशीच यांची नीती आहे. धारावीतील लोकांना घरे मिळाली, तर ते आमच्या पाठिशी येणार नाहीत, यांना झुंझवत ठेवा, अशा प्रकारची नीती त्यांची दिसते. त्यानुसारच त्यांचे काम चालले आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. तसेच पहिल्यांदा जी रिफायनरी होती, त्याला विरोध केला. मग उद्धव ठाकरेंनीच त्यांचे सरकार असताना पत्र पाठवले की, या ठिकाणी नको तर त्या ठिकाणी रिफायनरी करा. मग तिथे रिफायनरी करायला घेतली तर स्वतःच तिथे विरोध करायला गेले. त्यामुळे त्यांचा मूळ स्वभाव विकासाला विरोध करायचा आहे. विकासाला विरोध आहे, त्या व्यक्तीशी काय बोलायचे, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजात सहभागी झाले. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे नागपूरला अधिवेशनाला आले. आता ते किती दिवस आले, याचा हिशोब तुम्ही करा. पण ते आले, ते काय कमी आहे का, प्रत्यक्ष येऊन बसले हे कमी आहे का, त्यावर फार बोलणार नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे