शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मनीषनगरातील अर्धवट सिमेंटीकरणामुळे जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 22:27 IST

Manishnagar , Danger to life due to partial cementation मनीषनगरातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण टाळेबंदीपूर्वीपासूनच रखडले आहे. मात्र, प्रशासनाकडून हे काम पूर्ण करण्याबाबत सुस्ती दाखवली जात आहे. या अर्धवट कामामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे एका बाजूने घसरत आहेत वाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनीषनगरातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण टाळेबंदीपूर्वीपासूनच रखडले आहे. मात्र, प्रशासनाकडून हे काम पूर्ण करण्याबाबत सुस्ती दाखवली जात आहे. या अर्धवट कामामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या एका बाजूचे सिमेंटीकरण झाले आहे. त्यामुळे, दुसरी बाजू खाली गेली आहे. त्याचा परिणाम वाहतुकीदरम्यान वाहने घसरत असल्याने अपघात होत आहेत. एवढेच नव्हे तर मनीषनगर डबलडेकर उड्डाणपुलाच्या उतारावरील सिमेंटीकरण अर्धवट असल्याने मार्ग बंद आहे. त्यामुळे येथे नियमित अपघाताची शक्यता असते. उड्डाणपुलावरून उतरताना वाहनांची गती जास्त असते आणि अचानक मार्ग बंद असल्याचे दिसल्याने चालक गोंधळून जातात. अर्धवट सिमेंटीकरणाने वाहनचालकांना रोजच समस्या भेडसावत आहे. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

वाहतूक कोंडी पुन्हा उद्भवली

मनीषनगरातील वाहतूक कोंडीची समस्या जुनी आहे. उड्डाणपुलाच्या निर्माणानंतर समस्या सुटेल, अशी आशा होती. मात्र, सिमेंटीकरणाचे काम अर्धवट असल्याने पुन्हा कोंडी निर्माण झाली आहे. एका बाजूने वाहतूक सुरू असल्याने ही कोंडी रोजचीच झाली आहे. काम वेळेत पूर्ण झाले असते तर ही समस्याच उरली नसती, अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

टिन रस्त्यावर

रस्ता खोदून काम सोडून देण्यात आले आहे. जिथे सिमेंटीकरण सुरू आहे तो भाग टिनशेडने घेरण्यात आला आहे. मात्र, इथेही बेजबाबदारीचा कळस दिसून येतो. घेऱ्यातली टिन रस्त्याच्या दुसऱ्या भागावर आले आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. अनेक जण जखमीही झाले आहेत.

अंधारात अपघातांची भीती

रात्रीच्या वेळी या मार्गावर पूर्णत: अंधार असतो. मनीषनगर रोडवर केवळ स्ट्रीट लाईट असून, अपुरा उजेड असल्याने अनेक ठिकाणी अंधकार असतो. अशा स्थितीत वाहतुकीदरम्यान वाहनचालक दुसऱ्या भागावर घसरून पडतात. जिथे घसरून पडतात, तो भाग खोलगट असल्याने जीवाचा धोका असतो.

फुटपाथही अर्धवट

सिमेंटीकरणाचे बरेच काम झाल्यानंतर फुटपाथचे निर्माण व्हायचे होते. मात्र, कंत्राटदाराने फुटपाथचे काम अपुरे सोडले आहे. त्यामुळे पायी जाणाऱ्यांना रस्त्याचा वापर करावा लागत आहे. अनेक जागी फुटपाथसाठी खोदकाम झाले आहे. यामुळे नागरिक संतापले आहेत.

गट्टू, सामग्री रस्त्यावर विखुरलेली

कामाप्रति बेजबाबदारी जागोजागी दिसून येत आहे. मनीषनगरात रस्त्यावर अनेक ठिकाणी निर्माण सामग्री रस्त्यावर विखुरली आहे. यामुळे वाहतुकीला समस्या निर्माण होत आहे. रस्त्यावर गट्टू, सामग्री पसरल्याने वाहन घसरण्याची स्थिती कायम आहे.

टॅग्स :nagpurनागपूरroad safetyरस्ते सुरक्षा