शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

धरणे अजूनही कोरडी पाणीकपात सुरूच राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:24 IST

गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. परंतु तलावांमधील पाण्याच्या साठ्यात अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे या आठवड्यातही बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पेंचशी जुळलेल्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. कन्हान नदीशी जुळलेल्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा मात्र सुरळीत राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागपूरकरांनो पाणी जपूनच वापरा : नवेगाव खैरीमध्ये दोन आठवड्यात केवळ ०.२४ मीटर वाढला साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. परंतु तलावांमधील पाण्याच्या साठ्यात अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे या आठवड्यातही बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पेंचशी जुळलेल्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. कन्हान नदीशी जुळलेल्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा मात्र सुरळीत राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.सोमवारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनोज गणवीर आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तलावांमधील पाणीसाठ्यावर चर्चा झाली. पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झाली नसल्याने पाणीकपातीचा निर्णय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ ऑगस्टपर्यंत कपातीचा निर्णय अगोदरच घेण्यात आलेला आहे. परंतु दर आठवड्याला आढावा घेण्याचा पर्यायसुद्धा ठेवण्यात आला आहे. त्यानुसार आढावा घेतल्यानंतर कपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नवेगाव खैरी येथील धरणातील पाणीसाठ्याची पातळी २९ जुलै रोजी ३१८.६० मीटर इतकी होती. दोन आठवड्यापूर्वी १५ जुलै रोजी ती ३१८.३६ मीटर इतकी होती. यात केवळ ०.२४ मीटरची वाढ झाली आहे. ती समाधानकारक नाही. गेल्यावर्षी याच तारखेला धरणातील पाण्याची पातळी ३२२ मीटरपेक्षा अधिक होती. नवेगाव खैरीतून पेंचच्या माध्यमातून नागपूरच्या जलशुद्धीकरण केंद्रात दररोज ५०० एमएलडी पाणी येते. पाण्याची पातळी वाढत नसल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला.जलप्रदाय समितीचे सभापती झलके यांनी सांगितले की, शहरात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. परंतु तलाव परिसरात पाणी नसल्याने तेथील पाणीसाठ्यात फारसा फरक पडलेला नाही. नवेगाव खैरीतील तलावात पाणी नाही आणि तोतलडोह तलावातील परिस्थितीतही सुधारणा नाही. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.पाण्याचे टँकरही बंदपाणीसंकटादरम्यान कुठल्याही टाकीतून टँकरचे संचालन होणार नाही. त्यामुळे कपातीच्या एक दिवसापूर्वीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. कपातीदरम्यान पाण्याच्या टाकीतही पाणी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे टँकर चालू शकत नाही.पाणीटंचाईबाबत ‘सोशल मीडिया’तून जनतेशी संवाद : बावनकुळेसद्यस्थितीत नागपूर शहरात पाणीकपात करण्यात आली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता, पाण्याचे संकट हे नैसर्गिक आपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत तोतलाडोहमध्ये पुरेसे पाणी येत नाही, तोपर्यंत नागपूर शहरात पाणीकपात सुरूच राहणार. जनतेला या संकटाची जाण आहे. लोक सुशिक्षित असून ते संयम बाळगत आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संकटांची कारणे पटवून सांगू, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी चौराईविरोधात अवाक्षर काढले नाही. आता आंदोलन कसे काय करतात, असा प्रश्नदेखील त्यांनी केला.

टॅग्स :water shortageपाणीकपातnagpurनागपूर