शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

धरणे अजूनही कोरडी पाणीकपात सुरूच राहणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:24 IST

गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. परंतु तलावांमधील पाण्याच्या साठ्यात अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे या आठवड्यातही बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पेंचशी जुळलेल्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. कन्हान नदीशी जुळलेल्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा मात्र सुरळीत राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देनागपूरकरांनो पाणी जपूनच वापरा : नवेगाव खैरीमध्ये दोन आठवड्यात केवळ ०.२४ मीटर वाढला साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात चांगला पाऊस होत आहे. परंतु तलावांमधील पाण्याच्या साठ्यात अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यामुळे या आठवड्यातही बुधवार, शुक्रवार आणि रविवारी पेंचशी जुळलेल्या परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. कन्हान नदीशी जुळलेल्या नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज आणि आसीनगर झोनमध्ये पाणी पुरवठा मात्र सुरळीत राहील, अशी माहिती देण्यात आली आहे.सोमवारी जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनोज गणवीर आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तलावांमधील पाणीसाठ्यावर चर्चा झाली. पाणीसाठ्यात कुठलीही वाढ झाली नसल्याने पाणीकपातीचा निर्णय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ ऑगस्टपर्यंत कपातीचा निर्णय अगोदरच घेण्यात आलेला आहे. परंतु दर आठवड्याला आढावा घेण्याचा पर्यायसुद्धा ठेवण्यात आला आहे. त्यानुसार आढावा घेतल्यानंतर कपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नवेगाव खैरी येथील धरणातील पाणीसाठ्याची पातळी २९ जुलै रोजी ३१८.६० मीटर इतकी होती. दोन आठवड्यापूर्वी १५ जुलै रोजी ती ३१८.३६ मीटर इतकी होती. यात केवळ ०.२४ मीटरची वाढ झाली आहे. ती समाधानकारक नाही. गेल्यावर्षी याच तारखेला धरणातील पाण्याची पातळी ३२२ मीटरपेक्षा अधिक होती. नवेगाव खैरीतून पेंचच्या माध्यमातून नागपूरच्या जलशुद्धीकरण केंद्रात दररोज ५०० एमएलडी पाणी येते. पाण्याची पातळी वाढत नसल्याने पाणीपुरवठा प्रभावित झाला.जलप्रदाय समितीचे सभापती झलके यांनी सांगितले की, शहरात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. परंतु तलाव परिसरात पाणी नसल्याने तेथील पाणीसाठ्यात फारसा फरक पडलेला नाही. नवेगाव खैरीतील तलावात पाणी नाही आणि तोतलडोह तलावातील परिस्थितीतही सुधारणा नाही. त्यामुळे पाणीकपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.पाण्याचे टँकरही बंदपाणीसंकटादरम्यान कुठल्याही टाकीतून टँकरचे संचालन होणार नाही. त्यामुळे कपातीच्या एक दिवसापूर्वीच पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा. कपातीदरम्यान पाण्याच्या टाकीतही पाणी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे टँकर चालू शकत नाही.पाणीटंचाईबाबत ‘सोशल मीडिया’तून जनतेशी संवाद : बावनकुळेसद्यस्थितीत नागपूर शहरात पाणीकपात करण्यात आली असून, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता, पाण्याचे संकट हे नैसर्गिक आपत्ती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत तोतलाडोहमध्ये पुरेसे पाणी येत नाही, तोपर्यंत नागपूर शहरात पाणीकपात सुरूच राहणार. जनतेला या संकटाची जाण आहे. लोक सुशिक्षित असून ते संयम बाळगत आहेत. ‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत संकटांची कारणे पटवून सांगू, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसची राज्यात सत्ता असताना त्यांनी चौराईविरोधात अवाक्षर काढले नाही. आता आंदोलन कसे काय करतात, असा प्रश्नदेखील त्यांनी केला.

टॅग्स :water shortageपाणीकपातnagpurनागपूर