शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

‘दलित’ अपमानास्पद नव्हे ऊर्जावान शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 20:28 IST

‘दलित’ हा शब्द रुढ झालेला आहे. तो वापरातच आणू नका, ही भावना बरोबर नाही. दलित हा अपमानास्पद शब्द नाही तर तो ऊर्जा वाढवणारा शब्द आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपण पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितल.

ठळक मुद्देरामदास आठवले : न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘दलित’ हा शब्द रुढ झालेला आहे. तो वापरातच आणू नका, ही भावना बरोबर नाही. दलित हा अपमानास्पद शब्द नाही तर तो ऊर्जा वाढवणारा शब्द आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध आपण पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितल.आठवले म्हणाले, दलित या शब्दाने आंबेडकरी कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते. तो शब्द अपमानास्पद आहे, असे म्हणणे बरोबर होणार नाही. दलित पॅन्थर नावाची संघटना आम्ही स्थापन केली होती. तेव्हा आमचा उद्देश हा होता की, जे सामजिक, आर्थिक आणि सर्वच दृष्टीने मागासलेला आहे तो. तेव्हा त्या शब्दाचा वापर न करणे असे म्हणणे बरोबर नाही.एससी, एसटी अ‍ॅक्टच्या विरोधात भारत बंद संबंधात ते म्हणाले की, जे अन्याय करतात त्यांच्यावरच कारवाई होईल, जे अन्याय करणार नाही, त्यांना घाबरण्याची गरज नाही. दुरुपयोग होऊ नये, याची आम्हीही काळजी घेऊ परंतु यात कायद्यात बदल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. रिपाइंच्या एकीकरणाच्या मुद्यावर त्यांना छेडले असता नेत्यांच्या ऐक्यापेक्षा जनतेचे ऐक्य महत्वाचे असल्याचे ते म्हणाले.२०१९ च्या निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वात २४० जागा जिंकू असा दावा करीत रिपाइंतर्फे लोकसभेसाठी सातारा आणि दक्षिण-मध्य मुंबई या दोन जागा मागण्यात येतील. यापैकी दक्षिण-मध्य मुंबईतून आपण स्वत: लढणार असल्याचेही आठवले यांनी जाहीर कले. साताराची जागा न मिळाल्यास विदर्भातील कुठलही एक जागा मागू, असेही ते म्हणाले.येत्या ३ आॅक्टोबरला रिपाइंचा स्थापना दिवस साजरा करण्यात येणार असून मुखयमंत्र्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.पत्रपरिषदेला प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, अनिल गोंडाणे, महेंद्र मानकर, राजन वाघमारे, बाळू घरडे, प्रा. पवन गजभिये, विनोद थुल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर