शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

दीक्षाभूमीला प्रेरणाभूमी बनविणारे ‘दादासाहेब’

By admin | Updated: July 26, 2015 02:59 IST

अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन करून भारतभूमीला बुद्ध धम्म दिला.

बौद्ध जगताला मिळाली अनुपम भेट आनंद डेकाटे नागपूरअडीच हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन करून भारतभूमीला बुद्ध धम्म दिला. तथागत बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी पहिल्यांदा डोळे उघडले, ती तथागत गौतम बुद्धांची पहिली दीक्षाभूमी.सम्राट अशोकाने जगभर या धम्माचा प्रचार- प्रसार करून त्याला गतिमान केले. १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक रक्तविहीन धम्मक्रांतीचा जयघोष केला ती दुसरी दीक्षाभूमी. बुद्धाचा विज्ञानवादी धम्म नव्या आयामातून बाबासाहेबांनी लक्षावधी अस्पृश्यांना देताना नागपूरची जागा निवडली, तीच दीक्षाभूमी आज समस्त बौद्धांची प्रेरणाभूमी ठरली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित ही प्रेरणाभूमी उभारण्यात रा.सू. उपाख्य दादासाहेब गवर्इं यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे सातत्य आणि दूरदृष्टीमुळेच दीक्षाभूमीवरील जागतिक दर्जाच्या स्मारकाची अनुमप भेट बौद्ध जगताला मिळाली आहे. डॉ. आंबेडकरांनी तथागतांचा धम्म दिल्यानंतर अल्पावधीतच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. परंतु त्यांच्या अस्थिधातून दीक्षाभूमीवर आजही बाबासाहेबांचे प्रतिबिंब दिसते. यामुळेच लाखोंचा जनसमुदाय अशोक विजयादशमीच्या पर्वावर दीक्षाभूमीची माती कपाळाला लावण्यासाठी येतो. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली त्या ठिकाणी सध्या जागतिक दर्जाचे भव्य स्तुप उभे आहे. आधुनिक आणि पारंपरिक शिल्पकलेचा ती उत्त्कृष्ट अशी वास्तू ठरली. १२० फूट व्यासाचा हा स्तुप आतून पोकळ आहे. रा.सू. गवई यांची दूरदृष्टीनागपूर : जगभरातील सर्व स्तुपांमध्ये पोकळ स्तुप म्हणून दीक्षाभूमीचे वेगळेच महत्त्व आहे. इंटरलॉकिंग पद्धतीने घुमट तयार करण्याचे काम आव्हानात्मक होते. २११ बाय २११ च्या चौरस बांधकामामध्ये पहिला मुख्य घुमट आहे.फ्लोरिंंगसाठी राजस्थानी संगमरवर वापरण्यात आले आहे. स्तुपाच्या चारही दरवाजांवर सांचीच्या शैलीतील देखण्या कमानी आहेत. त्यावरील धम्मचक्र, घोडे, हत्ती, शिंग यांचे शिल्प कोरल्याने त्याला प्राचीन बाज मिळाला आहे. जुलै १९७८ मध्ये दीक्षाभूमीचा पायाभरणी सोहळा पार पडला. सांचीच्या जगप्रसिद्ध स्तुपावरून दीक्षाभूमीचा आराखडा तयार करण्यात आला. यासाठी आपल्या नागपूरच्याच वास्तुविशारद शिवदानमल यांची निवड करण्यात आली. ती मुळातच दादासाहेबांमुळेच. रा.सू. गवई यांची चिकाटी आणि दूरदृष्टीमुळेच दीक्षाभूमीची नाळ बौद्ध जगताशी जोडल्या गेली आहे. म्युरल्सचे स्वप्न अजूनही अपूर्णच दीक्षाभूमी हे बुद्धिस्ट सेमिनरी व्हावी, असे दादासाहेबांचे स्वप्न होते. त्यादिशेने ते शासनाच्या मदतीतून एकेक पाऊल टाकत होते. दीक्षाभूमीच्या परिसरात मध्यवर्ती स्मारक झाले. सभागृहाचे बांधकामही जवळपास पूर्ण झाले. यात्री निवास तयार झाले आहे. २२ प्रतिज्ञांचा स्तंभ आणि संविधान प्रास्ताविकतेचा शिलालेखसुद्धा उभारले गेले. परंतु यासोबतच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांचे जीवनचरित्र ‘म्युरल्स’च्या माध्यमातून दीभाभूमीतील भव्य स्तुपात उभारण्याचा त्यांचा संकल्प होता. स्मारक समितीच्या बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा झाली होती. त्याबाबत गवई यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्या म्युरल्सच्या कामाला अजूनही सुरुवात होऊ शकली नाही. संविधान प्रास्ताविकेचा शिलालेख सध्या देशात जातीवाद, प्रांतवाद आणि भाषावाद प्रचंड उफाळलेला दिसून येतो. स्वत:ला राष्ट्रीय नेते म्हणवणारे लोकही राष्ट्रहितापेक्षा प्रांत आणि भाषेला अधिक महत्त्व देतात. ते भारतीय संविधानाला महत्त्व देत नाही. परंतु अशा वेळी न कळतच ‘मी प्रथम भारतीय आणि नंतरही भारतीयच’ अशी स्वत:ची ठामपणे ओळख करून देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते. राष्ट्रीयत्वाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांसाठीसुद्धा राष्ट्रीय हित हेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच दीक्षाभूमीवर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेचा शिलालेख कोरण्यात आला. देशाच्या संविधान प्रास्ताविकतेचा शिलालेख कोरणारे दीक्षाभूमी हे देशातील एकमेव स्मारक ठरले आहे. या शिलालेखाची संकल्पनाच रा.सू. गवई यांची होती. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा शिलालेखही दीक्षाभूमीच्या परिसरात दिमाखात उभा आहे.