शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेड्याच्या ठाणेदाराची दबंगगिरी

By admin | Updated: December 20, 2015 03:15 IST

रेतीमाफिया आणि अवैध धंदे व्यावसायिकांना अभय देणाऱ्या ठाणेदाराबाबत वृत्त प्रकाशित होताच तीळपापड होऊन पत्रकाराविरुद्धच गुन्हा दाखल केला.

पत्रकारावर गुन्हा दाखल : धमकी देणाऱ्या ठाणेदाराविरोधातही तक्रारनागपूर : रेतीमाफिया आणि अवैध धंदे व्यावसायिकांना अभय देणाऱ्या ठाणेदाराबाबत वृत्त प्रकाशित होताच तीळपापड होऊन पत्रकाराविरुद्धच गुन्हा दाखल केला. हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे घडला. येथेच ठाणेदाराचा प्रताप थांबला नाही तर सदर पत्रकाराला धमकीसुद्धा दिली. त्यामुळे याबाबत ‘त्या’ ठाणेदाराविरुद्ध त्याच्याच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ठिकठिकाणच्या पत्रकार संघाने निषेध नोंदविला आहे. सोमवारी याबाबत नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे शिष्टमंडळ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. भीमराव टेळे असे या खापरखेडा येथील ठाणेदाराचे नाव आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना अभय, अवैध दारूविक्रीला आळा न घालणे यासह इतर कारणांमुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांचा ठाणेदारावर रोष आहे. रोहणा, वलनी, बिनासंगम, गोसेवाडी यासह परिसरातील रेतीघाटांतून अवैधपणे रेती वाहतूक सुरू आहे. या रेती वाहतुकीमुळे रोहणा, भानेगाव, बिनासंगमसह इतर गावातील नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे या रेती वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली होती. याबाबत खापरखेडा पोलिसांना माहिती देत रेती वाहतुकीला लगाम घालण्याची सूचना केली होती, तरीही ही अवैध रेती वाहतूक सुरूच होती. याच कारणामुळे रोहणा येथील नागरिक संतप्त होऊन तणावाची स्थिती झाली होती. तेव्हा ठाणेदाराने रेतीमाफियांची बाजू उचलून धरत एकप्रकारे अवैध रेती वाहतूक आणि रेतीचोरीचे समर्थन केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याच दिवशी गावात आमसभा घेतली. त्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सभेत अवैध धंदे आणि रेती वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली, तरीही या भागातून खुलेआम अवैध रेती वाहतूक सुरूच आहे. दुसरीकडे सिल्लेवाडा, भानेगाव, रोहणा येथे अवैध दारूविक्री होत असल्याने महिलांची कुचंबणा होत. दारूड्यांच्या त्रासामुळे महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले. परिणामी अवैध दारूविक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी नागरिकांनी केली. त्या मागणीकडेही ठाणेदार टेळेने दुर्लक्ष केले. त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेत अवैध दारूविक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. अवैध दारूविक्री बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सिल्लेवाडा, भानेगाव, रोहणा येथील ३०० हून अधिक महिलांनी खापरखेडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला तर सिल्लेवाडासह आजूबाजूच्या गावातील महिलांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास दारू पकडली. ती दारूही पोलिसांच्या स्वाधीन केली. एवढा प्रकार होऊनही खापरखेडा पोलीस अवैध दारुविक्री बंद करण्याबासाठी एक पाऊल पुढे टाकत नाही. हा सर्व प्रकार आतापर्यंत वृत्ताच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला. त्यामुळे ठाणेदाराने वृत्त लिहिणाऱ्या पत्रकारावरच गुन्हा नोंदविला. अवैध धंदे बंद करण्याऐवजी पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार असून याबाबत नागपूर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तालुका पत्रकार संघाने निषेध नोंदविला. (जिल्हा प्रतिनिधी)ग्रामपंचायतींनीही घेतला ठरावखापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले आहे. अवैध रेती वाहतूक, रेती चोरीचे प्रकारही वाढले आहेत. मात्र त्यावर लगाम घालण्यात खापरखेडा पोलिसांना यश आले नाही. मात्र याबाबत वृत्त प्रकाशित होताच पत्रकारावरच गुन्हा दाखल करण्यासाठी हेच पोलीस पुढे आले. त्यामुळे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खापरखेडा परिसरात अवैध धंदे वाढल्याबाबत ग्रामपंचायतींनीही ठरावाद्वारे खापरखेडा पोलीस ठाण्याला सूचित करून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. सोबतच ‘ठाणेदार हटाव’चीही भूमिका अनेक ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आली.ठाणेदाराला कुणाचे अभय?गेल्या काही महिन्यांपासून ठाणेदार टेळे सतत नानाविध कारणांमुळे चर्चेत आहे. याबाबत भानेगाव येथील २०० हून अधिक नागरिकांनी आ. सुनील केदार, सरपंच रवी चिखले यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षकांच्या नावे ५ आॅक्टोबर रोजी निवेदन दिले. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या सुटीवर असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश शिंदे यांच्याकडे निवेदन सोपविले. त्यात ठाणेदाराची बदली करावी, ही मागणी त्यांनी रेटून धरली. यासोबतच भाजपच्या खापा मंडळाचे उपाध्यक्ष नितीन गोस्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही निवेदन सोपविले. त्या निवेदनाची प्रत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्याकडे पाठविली. खापरखेडा परिसरातील ग्रामपंचायतींनीही ‘ठाणेदार हटाव’ची भूमिका घेतली. मात्र अद्यापपर्यंत ठाणेदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या ठाणेदाराला अभय कुणाचे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.