शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

खापरखेड्याच्या ठाणेदाराची दबंगगिरी

By admin | Updated: December 20, 2015 03:15 IST

रेतीमाफिया आणि अवैध धंदे व्यावसायिकांना अभय देणाऱ्या ठाणेदाराबाबत वृत्त प्रकाशित होताच तीळपापड होऊन पत्रकाराविरुद्धच गुन्हा दाखल केला.

पत्रकारावर गुन्हा दाखल : धमकी देणाऱ्या ठाणेदाराविरोधातही तक्रारनागपूर : रेतीमाफिया आणि अवैध धंदे व्यावसायिकांना अभय देणाऱ्या ठाणेदाराबाबत वृत्त प्रकाशित होताच तीळपापड होऊन पत्रकाराविरुद्धच गुन्हा दाखल केला. हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे घडला. येथेच ठाणेदाराचा प्रताप थांबला नाही तर सदर पत्रकाराला धमकीसुद्धा दिली. त्यामुळे याबाबत ‘त्या’ ठाणेदाराविरुद्ध त्याच्याच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ठिकठिकाणच्या पत्रकार संघाने निषेध नोंदविला आहे. सोमवारी याबाबत नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे शिष्टमंडळ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. भीमराव टेळे असे या खापरखेडा येथील ठाणेदाराचे नाव आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना अभय, अवैध दारूविक्रीला आळा न घालणे यासह इतर कारणांमुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांचा ठाणेदारावर रोष आहे. रोहणा, वलनी, बिनासंगम, गोसेवाडी यासह परिसरातील रेतीघाटांतून अवैधपणे रेती वाहतूक सुरू आहे. या रेती वाहतुकीमुळे रोहणा, भानेगाव, बिनासंगमसह इतर गावातील नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे या रेती वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली होती. याबाबत खापरखेडा पोलिसांना माहिती देत रेती वाहतुकीला लगाम घालण्याची सूचना केली होती, तरीही ही अवैध रेती वाहतूक सुरूच होती. याच कारणामुळे रोहणा येथील नागरिक संतप्त होऊन तणावाची स्थिती झाली होती. तेव्हा ठाणेदाराने रेतीमाफियांची बाजू उचलून धरत एकप्रकारे अवैध रेती वाहतूक आणि रेतीचोरीचे समर्थन केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याच दिवशी गावात आमसभा घेतली. त्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सभेत अवैध धंदे आणि रेती वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली, तरीही या भागातून खुलेआम अवैध रेती वाहतूक सुरूच आहे. दुसरीकडे सिल्लेवाडा, भानेगाव, रोहणा येथे अवैध दारूविक्री होत असल्याने महिलांची कुचंबणा होत. दारूड्यांच्या त्रासामुळे महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले. परिणामी अवैध दारूविक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी नागरिकांनी केली. त्या मागणीकडेही ठाणेदार टेळेने दुर्लक्ष केले. त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेत अवैध दारूविक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. अवैध दारूविक्री बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सिल्लेवाडा, भानेगाव, रोहणा येथील ३०० हून अधिक महिलांनी खापरखेडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला तर सिल्लेवाडासह आजूबाजूच्या गावातील महिलांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास दारू पकडली. ती दारूही पोलिसांच्या स्वाधीन केली. एवढा प्रकार होऊनही खापरखेडा पोलीस अवैध दारुविक्री बंद करण्याबासाठी एक पाऊल पुढे टाकत नाही. हा सर्व प्रकार आतापर्यंत वृत्ताच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला. त्यामुळे ठाणेदाराने वृत्त लिहिणाऱ्या पत्रकारावरच गुन्हा नोंदविला. अवैध धंदे बंद करण्याऐवजी पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार असून याबाबत नागपूर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तालुका पत्रकार संघाने निषेध नोंदविला. (जिल्हा प्रतिनिधी)ग्रामपंचायतींनीही घेतला ठरावखापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले आहे. अवैध रेती वाहतूक, रेती चोरीचे प्रकारही वाढले आहेत. मात्र त्यावर लगाम घालण्यात खापरखेडा पोलिसांना यश आले नाही. मात्र याबाबत वृत्त प्रकाशित होताच पत्रकारावरच गुन्हा दाखल करण्यासाठी हेच पोलीस पुढे आले. त्यामुळे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खापरखेडा परिसरात अवैध धंदे वाढल्याबाबत ग्रामपंचायतींनीही ठरावाद्वारे खापरखेडा पोलीस ठाण्याला सूचित करून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. सोबतच ‘ठाणेदार हटाव’चीही भूमिका अनेक ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आली.ठाणेदाराला कुणाचे अभय?गेल्या काही महिन्यांपासून ठाणेदार टेळे सतत नानाविध कारणांमुळे चर्चेत आहे. याबाबत भानेगाव येथील २०० हून अधिक नागरिकांनी आ. सुनील केदार, सरपंच रवी चिखले यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षकांच्या नावे ५ आॅक्टोबर रोजी निवेदन दिले. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या सुटीवर असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश शिंदे यांच्याकडे निवेदन सोपविले. त्यात ठाणेदाराची बदली करावी, ही मागणी त्यांनी रेटून धरली. यासोबतच भाजपच्या खापा मंडळाचे उपाध्यक्ष नितीन गोस्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही निवेदन सोपविले. त्या निवेदनाची प्रत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्याकडे पाठविली. खापरखेडा परिसरातील ग्रामपंचायतींनीही ‘ठाणेदार हटाव’ची भूमिका घेतली. मात्र अद्यापपर्यंत ठाणेदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या ठाणेदाराला अभय कुणाचे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.