शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

नोकरीच्या नावाखाली सायबर गुलामगिरी : शिक्षित तरुणांवर गंडा!

By योगेश पांडे | Updated: August 11, 2025 15:42 IST

Nagpur : मोठ्या पॅकेजच्या नावाखाली अनेक तरुण सायबरच्या दलदलीत

डॉ. योगेश पांडेनागपूर : सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मागील काही काळापासून प्रचंड प्रमाणात वाढले असून, अगदी दिल्लीपासून ते गल्लीपर्यत आरोपी 'टार्गेट' शोधत असतात. बरेचसे रॅकेट हे विदेशातून 'ऑपरेट' होत असून, तंत्रज्ञानाचा यात मोठ्या प्रमाणावर वापर होतो. 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चे युग असले तरी प्रत्यक्ष 'टार्गेट' शी संपर्क साधण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. यासाठी सायबर गुन्हेगारांच्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांकडून उच्च शिक्षित तरुणांना 'टार्गेट' करण्यात येत आहे. चांगल्या पॅकेजच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांना तीन ते चार देशांत पाठविले जाते. 

तेथे तरुण गेले की त्यांचे दस्तावेज ताब्यात घेत या टोळ्यांकडून त्यांना अक्षरशः 'सायबर गुलाम' बनविण्यात येते. त्यानंतर त्यांनाच ऑनलाइन माध्यमातून सायबर गुन्हे करायला भाग पाडले जाते. देशातील अनेक शहरांमधील तरुणांसोबत हे प्रकार घडले असून, अनेक जण तर बदनामीच्या व शिक्षा होईल या भीतीपोटी सायबर गुन्हेगारांची छळवणूक सहन करत असल्याचे दिसून येत आहे. सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सर्वसाधारणतः चीन, कंबोडिया, म्यानमार, लाओस येथून काम करतात. त्यांचे नेटवर्क अगदी स्थानिक पातळीपर्यंत असते. विविध कामांसाठी ज्याप्रमाणे एजंट असतात, त्याचप्रमाणे 'टार्गेट' सोबत संपर्क साधण्यासाठी टेक्नोसॅव्ही तरुणांचादेखील ते शोध घेत असतात. या तीन ते चार देशांमध्ये चांगल्या पगाराचे आमिष दाखवून अशा तरुणांना या टोळ्या जाळ्यात फसवितात. तरुण तेथे पोहोचले की कंपनीच्या प्रोटोकॉलचे कारण देत त्यांच्याकडून पासपोर्ट व इतर महत्त्वाचे दस्तावेज घेतले जातात.

ऑनलाइन'च करतात जाहिरातसायबर गुन्हेगारांच्या टोळ्या 'सायबर गुलाम' शोधण्यासाठी टीअर-२ व टीअर-३ शहरांमधील तरुणांवर जास्त भर देतात. या शहरांमध्ये अनेकांना हवा तसा रोजगार मिळत नाही. त्यामुळे तेथील उच्च शिक्षित व टेक्नोसॅव्ही तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. सायबर गुन्हेगार एखाद्या तथाकथित कंपनीच्या नावाखाली ऑनलाइन किंवा सोशल माध्यमांची मदत घेत जाहिरात करतात. बाहेरील देशात नोकरीची ऑफर मिळत असल्याने तरुणदेखील या जाळ्यात अलगद अडकतात. संबंधित कंपनीची योग्य शहानिशा केली नाही तर भविष्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

टॅग्स :nagpurनागपूरcyber crimeसायबर क्राइम