शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

सायबर कम्प्लेंट सेल सुरू

By admin | Updated: May 21, 2017 02:25 IST

सायबर गुन्हेगारीला आळा घालून पीडित नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी नागपुरात स्वतंत्र सायबर तक्रार निवारण केंद्र (सायबर कम्प्लेंट सेल) सुरू केले आहे.

पीडितांना मिळणार तातडीने दिलासा : सायबर गुन्हेगारी रोखण्याचे प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सायबर गुन्हेगारीला आळा घालून पीडित नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी नागपुरात स्वतंत्र सायबर तक्रार निवारण केंद्र (सायबर कम्प्लेंट सेल) सुरू केले आहे. या केंद्रातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याचे कसोशीने प्रयत्न केले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे उपस्थित होते. नोटबंदीनंतर कॅशलेस प्रक्रिया वेगवान झाली. आॅनलाईन शॉपिंग, आर्थिक व्यवहारासोबतच विविध कारणांमुळे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे सायबर गुन्हेगारीही वाढली आहे. काही आरोपी वेगवेगळे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. लॉटरी लागल्याची, एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची बतावणी करून फसवणूक केली जात आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून महिला-मुलींबाबत लज्जास्पद छायाचित्रे आणि मजकूर प्रसारित केले जात असून, त्यांना सामाजिक जीवनातून उठविण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकरणातील पीडित व्यक्ती तक्रार करण्याचे धाडस दाखवत नाहीत. धाडस केले तरी आधी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करा, नंतर तेथून ही तक्रार सायबर सेलकडे पाठविली जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यातून पीडित व्यक्तींना अधिक मनस्ताप होतो. ही बाब लक्षात घेता पीडितांना तातडीने दिलासा मिळावा, त्यांना तक्रार करण्यासाठी इकडून तिकडे चकरा माराव्या लागू नये, म्हणून पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी सायबर कम्प्लेंट सेलची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासंबंधीच्या सूचना केल्या. त्यानुसार, प्रशासकीय इमारतीतील चौथ्या माळ्यावर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेल्या १५ आॅगस्ट २०१६ ला अत्याधुनिक सायबर सेल सुरू करण्यात आला होता. याच ठिकाणी ‘सी-३ सायबर कम्प्लेंट सेल’ सुरू करण्यात आला. सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक निरीक्षक विशाल माने हे या सेलचे प्रमुख आहेत. तक्रारकर्त्यांना न्याय देण्यासोबतच सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी पत्रकारांना दिली. यावेळी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, एसीपी पाटील, एपीआय माने उपस्थित होते. तज्ज्ञांची मदत घेणार या संबंधाने उपस्थित प्रश्नांची उत्तरे देताना पोलीस आयुक्त म्हणाले, येथे तज्ज्ञांची संख्या कमी आहे, हे मान्य. मात्र, गुन्ह्यांचे स्वरूप पाहून बाहेरच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. किती तक्रारी आल्या अन् काय कारवाई झाली, त्याबाबतही वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी एन कॉप्समध्ये संबंधितांच्या नियमित बैठका घातल्या जाईल. या बैठकीत कामकाजाचे विश्लेषणही करण्यात येईल. तक्रारी प्रलंबित राहू नये, तातडीने निपटारा केला जावा, यावरही भर देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. इकडे सायबर सेलची सुरुवात झाली असतानाच तिकडे परिमंडळ तीन मधील सायबर सेलमध्ये कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती आली. त्या संबंधाने प्रश्न उपस्थित झाला असता, वाईट प्रवृत्तीचे निष्कासन झालेच पाहिजे. पोलीस दलात वाईट आणि लाचखोर प्रवृत्तीला थारा नसल्याचेही पोलीस आयुक्तांनी म्हटले.