शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

सायबर टोळीचे आमिष पाच लाखांचे तर गंडा साडेआठ लाखांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 19:10 IST

पाच लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका महिलेला ८ लाख, ५२ हजारांचा गंडा घातला.

ठळक मुद्देदिल्लीहून येत होते सर्व फोनसलग तीन वर्ष गंडवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका महिलेला ८ लाख, ५२ हजारांचा गंडा घातला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०१४ ते २०१७ या कालावधीत ही फसवणुकीची घटना घडली. प्रमोदिता अजय रामटेके (वय ५२) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या सेमिनरी हिल्समधील गजानन प्रसाद सोसायटीत राहतात. २१ डिसेंबर २०१४ ला दुपारी १२ च्या सुमारास त्यांना एका आरोपीचा फोन आला. त्याने त्याचे नाव संजयसिंग (दिल्ली) सांगितले.९८९११ २९६९१ या मोबाईल नंबरवरून बोलणाऱ्या आरोपीने रिलायन्सची पॉलिसी २९,५०० रुपयात काढल्यास तातडीने पाच लाखांचे कर्ज मिळेल. पॉलिसीचा जो अवधी राहील, तेवढ्याच अवधीत तुम्ही थोडे थोडे करून कर्जाचे हप्ते भरू शकता, असे आरोपी म्हणाले. त्यामुळे रामटेके यांनी लगेच आरोपीने सांगितलेल्या खात्यात २९,५०० रुपये जमा केले. त्याने तशी पॉलिसीची कागदपत्रे रामटेके यांना पाठविली. यानंतर कर्जासाठी अर्ज केला असता आरोपीने टॅक्स जमा करून म्हणून ४८,९९९ रुपये जमा करायला लावले. पुढे याच संजयसिंग नामक आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून ९७१८४८ ३१४८या क्रमांकावरून तर नंतर त्याचे साथीदार अजित जोशी, मनीष म्हलोत्राने ९७१८४८ ३१४८, नेहा शर्मा हिने ९६४३२७१०१८, दत्तूप्रसाद पाठक याने ९१३६२३३४८१६ शोभीत राय ८४४७५९०५८१, फजिल शर्मा ८४५९९५९६९५८, पराग राव, अभिषेक वर्मा ८४५९४८ ७३६५, अंजली मेहरा हिने ७८३६०२१८१९, ८५१०८००२६२, नागपालने ९५६०८४११०६, विजय भारद्वाजने ७८३६०३३६८९ नसिम सिद्धीकी आणि त्याचा एक साथीदार अशा एकूण १४ जणांनी (सर्व रा. दिल्ली) २०१४ ते जून २०१७ पर्यंत वेळोवेळी फोन केले. प्रत्येकवेळी ते कर्जाची रक्कम मिळविण्यासाठी वेगवेगळी सबब सांगून रक्कम जमा करायला सांगत होते. तर आपण एवढी रक्कम जमा केली. ती परत मिळेल, या आशेने रामटेके आरोपीने सांगितलेल्या खात्यात रक्कम जमा करीत होत्या. एकूण ८ लाख, ५२ हजार, ८९३ रुपये जमा करूनही आरोपी पुन्हा पैसे भरा असेच सांगत होते. अखेर रामटेकेंनी रक्कम जमा करण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला.सहा महिन्यानंतर गुन्हा दाखलआपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रामटेके नोव्हेंबर २०१७ मध्ये गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेल्या. गिट्टीखदान पोलिसांनी त्यांना सीताबर्डी ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्या सीताबर्डीत पोहचल्या. ठाणेदार हेमंत खराबे आणि त्यांचे सहकारी पीएसआय कविकांत चौधरी यांनी रामटेकेंची कैफियत ऐकून त्यांना व्यवस्थित तक्रार अर्ज लिहून देण्यास तसेच फसवणुकीचे सर्व पुरावे एकत्र जोडून देण्यास मदत केली. नंतर प्रकरण गिट्टीखदान ठाण्यात पाठविले. येथे पीएसआय मुकेश राठोड यांनी बरेच दिवस चौकशी केल्यानंतर या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम