शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पत्नीची गळा कापून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:48 IST

प्रेमविवाहाच्या सहा महिन्यानंतरच माहेरी परतलेल्या पत्नीची युवकाने गळा कापून हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली.

ठळक मुद्देवर्षभरातच प्रेमविवाहाचा करुण अंत : मानकापूर पोलीस ठाण्याजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रेमविवाहाच्या सहा महिन्यानंतरच माहेरी परतलेल्या पत्नीची युवकाने गळा कापून हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली. रक्ताने माखलेला पती पोलिसांच्या हाती लागल्यावर प्रकरण उघडकीस आले. वसीम ताज मोहम्मद पठाण (२४) रा. भवानीमातानगर पारडी असे आरोपी पतीचे नाव आहे तर कोमल ऊर्फ महिमा महादेव विठोले (२०) रा. संत गजानननगर असे मृताचे नाव आहे.असीम आणि महिमा यांचे दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात वाद होऊ लागले. कोमल वसीमला सोडून माहेरी परत आली होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. हा वाद अनेकदा मानकापूर पोलीस ठाण्यातही पोहोचला. कौटुंबिक वाद असल्याने पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. कोमलची इतरांशीही मैत्री असल्याचा असीमला संशय होता.सूत्रानुसार वसीम सोमवारी रात्री ९ वाजता महिमाच्या घराजवळ आला. त्याने महिमाला चर्चा करण्याच्या बहाण्याने संत गजानननगरच्या गल्लीत बोलावले. ही जागा मानकापूर पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ आहे. महिमा त्याला भेटण्यासाठी आली. तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वसीम तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने महिमावर हल्ला केला. चाकूने तिच्या गळ्यावर व छातीवर अनेक वार केले. गळा कापून तिची हत्या केली. गल्लीत अंधार असल्याने कुणालाही कळले नाही. वसीम गल्लीत चाकू फेकून तिथून निघन गेला. महिमाची हत्या करून वसीम पायी जात होता. त्याचवेळी मानकापूर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे ज्ञानेश्वर शेंडे, राजेश वरठी, जितेंद्र पारकुंडे, अंकलुश राठोड, रवी भुजाडे आणि अजय पाटील हे ठाण्यातून बाहेर पडले. त्यांची वसीमवर नजर गेली. त्याचे हात रक्ताने माखले होते. त्याला कुणी मारहाण केली असावी, असा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला थांबवत तुला कुणी मारले असे विचारले असता, त्याने महिमाला मारल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस गेले तेव्हा महिमाचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर