शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वीज पुरवठ्यासाठीदेखील ग्राहकांना मिळणार मोबाईलसारखे ‘प्लॅन्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2022 19:47 IST

Nagpur News भविष्यात वीजपुरवठ्याच्या क्षेत्रातही ग्राहकांना टेलिकॉम क्षेत्रासारख्या प्लॅन्स निवडीच्या संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केले.

ठळक मुद्दे मार्च २०२३ पर्यंत शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील कृषीपंप जोडण्या

नागपूर : सध्या टेलिकॉम क्षेत्रात मोठी चढाओढ आहे. या स्पर्धेमुळे ग्राहकांना सर्वच कंपन्या विविध प्लॅन्स देऊ करतात. ग्राहक त्यातील सगळ्यात स्वस्त व परवडणारे प्लॅन्स निवडतात. भविष्यात वीजपुरवठ्याच्या क्षेत्रातही ग्राहकांना अशीच संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केले. विदर्भातील शेतकऱ्यांना कृषिपंप मिळण्यास विलंब होत असल्याबाबत प्रवीण दटके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरील चर्चेत ते बोलत होते.

सध्या मुंबईत टाटा, अदानी आणि महावितरण असे तीन पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत. भविष्यात ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे मोबाइलमधील कार्डांसाठी विविध टेलिकॉम कंपन्या ज्या प्रकारे कमी दरात विविध प्लॅन्स देतात तसेच वीज कंपन्यासुद्धा देतील. विदर्भातील शेतकऱ्यांना नवीन कृषिपंप आणि विद्युत जोडणी देण्याचे काम प्राधान्याने सुरू आहे. त्यात पहिल्या टप्प्यात पैसे भरून प्रलंबित असलेल्या जोडण्या मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजनेच्या ‘अ’, ‘ब’, ‘क’ मध्ये काम सुरू असून पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. राज्यात फिडर सोलरायझेशनला गती देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी ही योजना आहे. सौर प्रकल्पासाठी जमीन भाडेपट्टीवर देऊन उत्पन्न मिळवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा होईल. २०२१-२२ मध्ये विदर्भातील २६ हजार ५०७ कृषिपंपांना तर २०२२-२३ मध्ये नोव्हेंबर २०२२ अखेर १५ हजार कृषिपंप वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

ग्राहकांना अखंडित, दर्जेदार, विश्वसनीय व परवडणारा वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ‘आरडीएसएस’ हा कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले आहे. या योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने ३९ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत, असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस