शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘त्यांच्या’ नशिबी जगण्याच्या उमेदीला प्रतीक्षेचा अभिशाप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:18 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयात असे १२८ बरे झालेले रुग्ण आहेत जे मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याच्या इच्छेसाठी आसुसले आहेत.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालयात १२८ मनोरुग्ण बरे होऊनही स्वकियांपासून दूर

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्यांचे अर्धे आयुष्य मनोरुग्णालयात नियतीशी झगडण्यात गेले. अनेक वर्षांच्या उपचारानंतर ते बरे झाले. आता आपले कुटुंबीय येतील, हात धरून घरी नेतील आणि उर्वरित जीवन कुटुंबीयांसह सुखासमाधानात आनंदाने जगायला मिळेल, अशी स्वप्नेही त्यांनी रंगविली. मात्र, समजदारांच्या मतलबी दुनियेचे वास्तव दुसऱ्याच क्षणाला त्यांच्या लक्षात आले. बरे झाल्यावर कुणीही त्यांना घरी नेण्यास तयार नाहीत. यासाठी समोर केल्या जाणाऱ्या कारणांनी बसणारे झटके त्यांना शॉकपेक्षाही वेदना देणारे आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयात असे १२८ बरे झालेले रुग्ण आहेत जे मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याच्या इच्छेसाठी आसुसले आहेत.औषधोपचारांच्या क्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाली. असंख्य जीवघेण्या आजारांवर मानवाने मात केली. मात्र, मनोरुग्णांच्या दुर्दैवाचे दशावतार दूर करण्याला शासन आणि समाजाला यश मिळत नसल्याचे वास्तव आहे. ठाणे, पुणे, नागपूर आणि रत्नागिरी या चारही ठिकाणच्या मनोरुग्णालयाची परिस्थिती थोड्याफार फरकाने सारखीच आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच त्यांच्या उर्वरित भविष्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. यातही नागपूरचे प्रादेशिक मनोरुग्णालय आपल्यापरीने परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारच्या अपुºया निधीतूनही बरे झालेल्यांना स्वयंरोजगाराचे धडे देत आहेत, परंतु त्यांनाही मर्यादा आहेत. बऱ्या झालेल्या १२८ मनोरुग्णामध्ये ८२ रुग्णांना आपले पत्तेच माहीत नाही, तर ४६ रुग्णांच्या पत्त्यावर रुग्ण बरा झाल्याचे सांगूनही नातेवाईकांनी त्यांना घरी नेण्यास चक्क नकार दिला आहे. मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून आता सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याची त्यांची इच्छा असतानाही त्यांना मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीत जगावे लागत आहे. जगण्याची उमेद गवसलेल्या या सर्वांना आजही स्वकियांचा शोध आहे.२५ वर्षांपासून स्वकियांची प्रतिक्षाप्रादेशिक मनोरुग्णालयातील उपचारानंतर बरे झालेल्या १२८ रुग्णांमध्ये ४४ महिला तर ८४ पुरुषांचा समावेश आहे. यातील काही रुग्ण १५ ते २५ वर्षांपूर्वीच बरे झालेले आहेत. परंतु अनेकांना आपला पत्ताच आठवत नाही. तर कुणाला तो नीट सांगता येत नाही. यातील अनेकांचे वय ५० ते ६६ च्या दरम्यान आहे. यामुळे उतरत्या वयात स्वकियांची प्रतीक्षा तीव्र झाली आहे. रुग्णालयाच्या भल्या मोठ्या लोखंडी प्रवेशद्वाराकडे त्यांची नजर लागली आहे. कुणी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल या प्रतीक्षेत रोजचा दिवस ढकलत आहे.

टॅग्स :Government mental hospital nagpurप्रादेशिक मनोरुग्णालयnagpurनागपूर