शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

दलित समाजाला फुटीरतेचा शाप - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 15:26 IST

दलित पँथरचा सुवर्णमहोत्सव

नागपूर : वैचारिक वाद झाल्यामुळे नेत्यांना दलित पँथर टिकवता आली नाही. आज दलित समाजात प्रत्येकजण आपल्याला अखिल भारतीय नेता समजतो. त्यामुळे रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र यावे अशी भूमिका घेऊन ऐक्य होत नाही. दलित समाजाला फुटीरतेचा शाप लागलेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

सिव्हील लाइन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात दलित पँथरचा सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भुपेश थुलकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीप जगताप, गौतम सोनवणे, भीमराव बन्सोड, सुधाकर तायडे, दयाल बहादुरे, बाळू घरडे, दिवाकर शेजवळ उपस्थित होते.

आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्ष सत्तेवर आला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. परंतु धर्मांतरामुळे त्यांना रिपब्लिकन पक्षाची स्थापना करता आली नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. दलित पँथरला आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. रिपब्लिकन ऐक्यासाठी दलित पँथर बरखास्त करावी लागली. परंतु सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दलित पँथर पुन्हा उभी राहू शकते का याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भुपेश थुलकर यांनी दलित पँथर कुणाच्या नियंत्रणाखाली नव्हे तर स्वतंत्र बाण्याने उभी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी दयाल बहादुरे, दिवाकर शेजवळ, दिलीप जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात तुका कोचे, हरीश वंजारी, नगरसेविका उषा पायलट, चंद्रबोधी पाटील, संजय नगराळे आदी १३५ पँथरचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय आगलावे यांनी केले. संचालन राजन वाघमारे यांनी केले. आभार विनोद थूल यांनी मानले.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर