शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

दलित समाजाला फुटीरतेचा शाप - रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 15:26 IST

दलित पँथरचा सुवर्णमहोत्सव

नागपूर : वैचारिक वाद झाल्यामुळे नेत्यांना दलित पँथर टिकवता आली नाही. आज दलित समाजात प्रत्येकजण आपल्याला अखिल भारतीय नेता समजतो. त्यामुळे रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र यावे अशी भूमिका घेऊन ऐक्य होत नाही. दलित समाजाला फुटीरतेचा शाप लागलेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

सिव्हील लाइन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात दलित पँथरचा सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भुपेश थुलकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीप जगताप, गौतम सोनवणे, भीमराव बन्सोड, सुधाकर तायडे, दयाल बहादुरे, बाळू घरडे, दिवाकर शेजवळ उपस्थित होते.

आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्ष सत्तेवर आला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. परंतु धर्मांतरामुळे त्यांना रिपब्लिकन पक्षाची स्थापना करता आली नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. दलित पँथरला आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. रिपब्लिकन ऐक्यासाठी दलित पँथर बरखास्त करावी लागली. परंतु सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दलित पँथर पुन्हा उभी राहू शकते का याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

भुपेश थुलकर यांनी दलित पँथर कुणाच्या नियंत्रणाखाली नव्हे तर स्वतंत्र बाण्याने उभी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी दयाल बहादुरे, दिवाकर शेजवळ, दिलीप जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात तुका कोचे, हरीश वंजारी, नगरसेविका उषा पायलट, चंद्रबोधी पाटील, संजय नगराळे आदी १३५ पँथरचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय आगलावे यांनी केले. संचालन राजन वाघमारे यांनी केले. आभार विनोद थूल यांनी मानले.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Athawaleरामदास आठवलेnagpurनागपूर