शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

उपराजधानीत अवतरली राजस्थानची संस्कृती : पधारो म्हारो देस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:31 IST

राजस्थान म्हणजे कलात्मकता, संस्कृती, परंपरा यांचा संगम. याच भूमीतील मौलिक ठेवा नागपूरकरांना अ़नुभवण्याची संधी मिळावी यासाठी श्री बिकानेरी माहेश्वरी पंचायत, युवा समिती व मारवाडी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजस्थान महोत्सव-२०१८’चे शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन झाले. देशविदेशात प्रसिद्ध असलेल्या राजस्थानी संस्कृतीच्या सौंदर्याचा शुक्रवारी नागपूरकरांनी अनुभव घेतला. उपराजधानीत राजस्थानची संस्कृतीच अवतरल्याचा अनुभव यावेळी आला.

ठळक मुद्देपारंपरिक अंदाजात ‘राजस्थान महोत्सव-२०१८’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थान म्हणजे कलात्मकता, संस्कृती, परंपरा यांचा संगम. याच भूमीतील मौलिक ठेवा नागपूरकरांना अ़नुभवण्याची संधी मिळावी यासाठी श्री बिकानेरी माहेश्वरी पंचायत, युवा समिती व मारवाडी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राजस्थान महोत्सव-२०१८’चे शुक्रवारी सायंकाळी उद्घाटन झाले. देशविदेशात प्रसिद्ध असलेल्या राजस्थानी संस्कृतीच्या सौंदर्याचा शुक्रवारी नागपूरकरांनी अनुभव घेतला. उपराजधानीत राजस्थानची संस्कृतीच अवतरल्याचा अनुभव यावेळी आला. 

सिव्हील लाईन्स येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेचे सभापती श्यामसुंदर सोनी, मारवाडी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ़ गिरीश गांधी, पंचायतच्या विश्वस्त समितीचे सभापती गिरधरलाल सिंगी, सचिव सुबोध मोहता, पंचायत अध्यक्ष प्रमोद बागडी, प्रकल्प संयोजक प्रतीक बागडी, सचिव अजय मल्ल, युवा समिती अध्यक्ष शिरिष मुंधडा, सचिव दीपक मोहता, महिला समिती अध्यक्ष वंदना मुंधडा, सचिव रेखा राठी उपस्थित होते़ महेशपूजन व महेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली़ 
राजस्थानात भक्ती, शक्ती आणि शौर्याचा अनुपम संगम असून, तेथे असणारे किल्ले स्थापत्यशास्त्राचे अद्भूत नमुने आहेत़ या महोत्सवातून महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये राजस्थानबद्दलचे आकर्षण नक्कीच वाढेल. तसेच ज्या पद्धतीने समाजातील तरुण राजस्थानची संस्कृती नागपूरसह इतर शहरांपर्यंत नेत आहे, ते पाहता पर्यटनात नक्कीच वाढ होईल, असा विश्वास श्यामसुंदर सोनी यांनी व्यक्त केला़ राजस्थानला वैभवशाली वारसा लाभला आहे. त्यामुळे त्याची जपणूक झालीच पाहिजे. 
सोबतच महाराष्ट्रात राहणाऱ्या व या राज्याला कर्मभूमी बनविणाऱ्या राजस्थानी बांधवांनी राजस्थान व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा. सांस्कृतिक सन्मान व मजबुतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायला हवे, असे प्रतिपादन गिरीश गांधी यांनी केले. सुधीर बाहेती व किरण भट्टड यांनी संचालन केले तर दीपक मोहता यांनी आभार मानले.उद्घाटनाच्या अगोदर राजस्थानी समाजातील तरुणांच्या समूहाने पारंपारिक राजस्थानी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.गायन, वादन, नृत्याचे सादरीकरण 
उद्घाटन कार्यक्रमानंतर राजस्थानमधील उदयपूर येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातून आलेल्या कलाकारांनी आपल्या कलात्मक सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली. यावेळी कलाकारांनी राजस्थानी लोककलेत गायन, वादन व नृत्याचे अप्रतिम सादरीकरण केले. या महोत्सवात राजस्थानची पाककला, हस्तकला, शिल्पकला हेदेखील आकर्षणाचे केंद्र आहेत.

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकSouth Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र