शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सांस्कृतिक क्षेत्राला अद्याप सूट नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 20:39 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीला शिथिल करत केंद्र सरकारने अनलॉक-४ची घोषणा २ सप्टेंबरपासून केली होती. त्याअनुषंगाने ७ सप्टेंबर व २१ सप्टेंबर असे शिथिलतेचे स्लॅब पाडले होते. २१ सप्टेंबरपासून सांस्कृतिक क्षेत्राला कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी काही सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, नागपुरात तशी सवलत अद्याप मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देस्पष्ट निर्देशच नाहीत : ओपन थिएटर्सही अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीला शिथिल करत केंद्र सरकारने अनलॉक-४ची घोषणा २ सप्टेंबरपासून केली होती. त्याअनुषंगाने ७ सप्टेंबर व २१ सप्टेंबर असे शिथिलतेचे स्लॅब पाडले होते. २१ सप्टेंबरपासून सांस्कृतिक क्षेत्राला कार्यक्रमांच्या सादरीकरणासाठी काही सवलती देण्यात आल्या होत्या. मात्र, नागपुरात तशी सवलत अद्याप मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.देशात महाराष्ट्रामध्ये कोरोना संक्रमितांची संख्या जास्त आहे आणि दररोज संक्रमितांचा आकडा डोळे वटारणारा ठरत आहे. त्यामुळे, केंद्र शासनाच्या नागरिकांना द्यावयाच्या शिथिलतेच्या निर्णयात महाराष्ट्र सरकार पूर्ण सहमत नसल्याचे दिसते. नागपुरातही दररोज दिड ते दोन हजार संक्रमित आढळत आहेत. त्यामुळे, नागपुरातही स्थिती किचकट झाली आहे. अशा स्थितीत गेल्या सहा महिन्यांपासून स्तब्ध झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना मिळेल आणि रोजगाराची साधने पुन्हा सुरू होण्याची कलावंतांची आशा धुळीस मिळाली आहे. केंद्र सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओपन एअर थिएटर केवळ शंभर प्रेक्षकांसह सुरू करण्याची परवानगी अनलॉक -४च्या घोषणेत केली आहे. त्याचा आनंद महाराष्ट्रातील कलावंतांनाही झाला होता. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाने कलावंतांचा हा आनंद आभासी ठरला आहे. त्यातच ओपन थिएटर्सही नसल्यानेही समस्या होती. म्हणून सांस्कृतिक क्षेत्राला आणखी बरीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून सांस्कृतिक क्षेत्राला मोकळीक दिली असली तरी महाराष्ट्र सरकारची बंधने कायम आहेत. नागपुरात तशीही कोरोना संक्रमणाबाबतची स्थिती फारशी चांगली नाही. त्यामुळे, राज्य शासनाचा निर्णय होईस्तोवर सध्या तरी नागपुरात सांस्कृतिक कार्यक्रमांना मोकळीक नाही.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर