शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मेयोच्या डॉक्टरांवर जमावाची चाल : मृतांचे नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:01 IST

उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देडॉक्टरांना हवे पोलिसांचे संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला. संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी येथील डॉक्टरांनी केली आहे. कोरोनाची लक्षणे असताना तपासणी न करताच घरी राहून स्वत:हून औषधी घेण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, आजार वाढल्यानंतर रुग्ण रुग्णालयात येत असल्याने वाढून अचानक मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याने नातेवाईक आपला संताप डॉक्टरांवर काढत आहेत. लक्षणे नसताना रुग्ण पॉझिटिव्ह आलाच कसा, चालता-बोलता असताना मृत्यू झालाच कसा आदी प्रश्नांना उत्तरे देत मेयोतील डॉक्टर त्रासून गेले आहेत. तरीही त्यांच्याकडून समजविण्याचा प्रयत्न होतो. परंतु रुग्णाचे एकापेक्षा जास्त नातेवाईक प्रश्न विचारीत असल्याने प्रत्येकाला उत्तरे देणे डॉक्टरांना कठीण जात आहे. यातूनच वाद निर्माण होण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी असेच झाले, गेल्या चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या बजेरिया येथील ४९ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. याचदरम्यान आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच नातेवाईकांनी आपल्या इतर नातेवाईकांना बोलावून कोविड हॉस्पिटलसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात के ली. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने प्रवेशद्वारासह परिसरात जाण्याचा मार्ग रोखून धरला.नातेवाईकांच्या मते, कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना भेटणे अशक्य असते. त्यांच्या प्रकृ तीची चौकशी कु ठे करावी, हा प्रश्न असतो आणि अचानक रुग्ण गंभीर झाल्याची किंवा मृत्यूची माहिती दिली जाते. यामुळे संतापाचा भडका उडतो. तर, डॉक्टरांनुसार कोविड हॉस्पिटलमध्ये ३०० वर रुग्ण भरती आहेत. रुग्णाचा एकच नातेवाईक नाही तर चार-पाच कधी त्यापेक्षा जास्त नातेवाईक वारंवार रुग्णाच्या प्रकृ तीची विचारपूस करतात, आधीच डॉक्टरांची संख्या कमी, त्यात प्रत्येकवेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण जाते. यातच वारंवार रुग्णालयावर लोकांचा जमाव येत असल्याने डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तही राहत नाही. यामुळे एखाद्यावेळी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू