शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

मेयोच्या डॉक्टरांवर जमावाची चाल : मृतांचे नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 20:01 IST

उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देडॉक्टरांना हवे पोलिसांचे संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला. संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी येथील डॉक्टरांनी केली आहे. कोरोनाची लक्षणे असताना तपासणी न करताच घरी राहून स्वत:हून औषधी घेण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, आजार वाढल्यानंतर रुग्ण रुग्णालयात येत असल्याने वाढून अचानक मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याने नातेवाईक आपला संताप डॉक्टरांवर काढत आहेत. लक्षणे नसताना रुग्ण पॉझिटिव्ह आलाच कसा, चालता-बोलता असताना मृत्यू झालाच कसा आदी प्रश्नांना उत्तरे देत मेयोतील डॉक्टर त्रासून गेले आहेत. तरीही त्यांच्याकडून समजविण्याचा प्रयत्न होतो. परंतु रुग्णाचे एकापेक्षा जास्त नातेवाईक प्रश्न विचारीत असल्याने प्रत्येकाला उत्तरे देणे डॉक्टरांना कठीण जात आहे. यातूनच वाद निर्माण होण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी असेच झाले, गेल्या चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या बजेरिया येथील ४९ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. याचदरम्यान आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच नातेवाईकांनी आपल्या इतर नातेवाईकांना बोलावून कोविड हॉस्पिटलसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात के ली. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने प्रवेशद्वारासह परिसरात जाण्याचा मार्ग रोखून धरला.नातेवाईकांच्या मते, कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना भेटणे अशक्य असते. त्यांच्या प्रकृ तीची चौकशी कु ठे करावी, हा प्रश्न असतो आणि अचानक रुग्ण गंभीर झाल्याची किंवा मृत्यूची माहिती दिली जाते. यामुळे संतापाचा भडका उडतो. तर, डॉक्टरांनुसार कोविड हॉस्पिटलमध्ये ३०० वर रुग्ण भरती आहेत. रुग्णाचा एकच नातेवाईक नाही तर चार-पाच कधी त्यापेक्षा जास्त नातेवाईक वारंवार रुग्णाच्या प्रकृ तीची विचारपूस करतात, आधीच डॉक्टरांची संख्या कमी, त्यात प्रत्येकवेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण जाते. यातच वारंवार रुग्णालयावर लोकांचा जमाव येत असल्याने डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तही राहत नाही. यामुळे एखाद्यावेळी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू