शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रूळ ओलांडताय, सावधान ! र्षात २४७ जणांचा गेला जीव, २७ गंभीर

By नरेश डोंगरे | Updated: April 12, 2024 23:20 IST

थोडासा हलगर्जीपणा बेतू शकतो जिवावर

नरेश डोंगरे नागपूर : तुमच्या जवळपास रेल्वेलाइन असेल आणि तुम्ही ती ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत असाल तर सावधान...! कारण यावेळी थोडा जरी हलगर्जीपणा झाला तर थेट तुमच्या जिवावर बेतू शकते. जीव वाचला तर जीवघेण्या जखमा होऊ शकतात. होय, अशाच निष्काळजीपणामुळे एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या वर्षभराच्या कालावधीत तब्बल २४७ जणांचा जीव गेला आहे. अलीकडे ठिकठिकाणचे रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद करून त्याच्या बदल्यात भुयारी पूल किंवा उड्डाण पूल बांधण्याचा सपाटा रेल्वे मंत्रालयाने देशभरात लावला आहे. मात्र, हे काम पूर्ण व्हायला अजून बराचसा अवधी लागणार आहे. त्यामुळे ग्रामीणच नव्हे, तर शहरी भागात अनेक ठिकाणी, शहराच्या वर्दळीच्या भागात असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेटवरूनच वाहतूक सुरू आहे.

रेल्वे गाडी येण्याच्या काही वेळेपूर्वी हे गेट बंद करून दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली जाते. मात्र, अनेक जण महत्त्वाचे काम असल्याने घाईगडबडीत गेट बंद असूनही रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचवेळी वेगात येणाऱ्या रेल्वेगाडीमुळे त्या व्यक्तीचा घात होतो. शहरात रूळ ओलांडणाऱ्यांना गेटवर असलेले अनेक जण विरोध करून थांबवितात. मात्र, ग्रामीण भागात निर्जन ठिकाणी असलेल्या रेल्वे फाटकावर आजूबाजूला कुणी नसल्याचे पाहून आणि गाडी दूर असल्याचा अंदाज बांधत काही जण रेल्वे रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात अन् स्वत:च्या जिवाशी खेळतात. ग्रामीण भागात, शेतशिवारातून जाणाऱ्या रेल्वेलाइननजीक गुराखी जनावरे चारायला नेतात. ऊन, पावसाच्या वेळी गुराखी सुरक्षित ठिकाण शोधतो. अशावेळी त्याचे दुर्लक्ष झाल्याने जनावरे रेल्वे रुळावर जातात अन् घात होतो. गेल्या वर्षभरात ठिकठिकाणी रेल्वे रूळ ओलांडण्यामुळे २४७ जणांचा वर्षभरात मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाले.गुन्हा, दंड अन् दुर्लक्ष

रेल्वे फाटक बंद असताना रूळ ओलांडणे गुन्हा आहे. हा गुन्हा केल्यास रेल्वेच्या कायद्यानुसार संबंधित व्यक्तीवर कारवाईदेखील केली जाते. मात्र, या कारवाईला अथवा कारवाईच्या इशाऱ्याला फारसे कुणी जुमानत नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरात रेल्वे रूळ ओलांडण्याच्या १३३१ घटना घडल्या. हा गुन्हा करताना पकडण्यात आलेल्या ठिकठिकाणच्या संबंधित बहाद्दरांकडून रेल्वे प्रशासनाने ६ लाख ८०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे.