शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

जमीन भोगवटा परिवर्तनात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:37 IST

चिखलदरा तालुक्यातील सुमारे १००० एकर जमिनीच्या भोगवटा वर्गात २ वरून १ असा बदल करण्यात आला असून, त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : राज्य शासनाला उत्तर सादर करण्याचा आदेश

आॅनलाईन लोकमतनागपूर : चिखलदरा तालुक्यातील सुमारे १००० एकर जमिनीच्या भोगवटा वर्गात २ वरून १ असा बदल करण्यात आला असून, त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते शंकर खडके यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्याच्या महसूल विभागाचे सचिव, वन विभागाचे सचिव, अमरावती विभागीय आयुक्त, अमरावती जिल्हाधिकारी व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर सविस्तर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर आता १४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होईल.याचिकेतील माहितीनुसार, संबंधित जमीन चिखलदरा तालुक्यातील अल्लाडोह, लावदा, शहापूर, मोठा, मडकी व मसुंदी येथील नागरिकांची आहे. शासनाने या गावांतील नागरिकांच्या पूर्वजांना १९७० ते १९७७ या काळात वनजमीन शेतीसाठी लीजवर दिली होती. जमीन देताना विविध अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्यानुसार लाभार्थींना ही जमीन शासनाची परवानगी घेतल्याशिवाय तिसऱ्या व्यक्तीला विकता येत नाही, तसेच वन विभागाला आवश्यकता वाटल्यास ही जमीन विविध उद्देशांसाठी संपादित करता येते. ही जमीन भोगवटा वर्ग-२ गटात मोडते.या क्षेत्रातील सर्व नागरिक गरीब असून, त्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन अनेक बिल्डर्स अल्प दरात ही जमीन खरेदी करीत आहेत. हा व्यवहार शासनाच्या परवानगीशिवाय होत आहे. वन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत मिळून हा गैरव्यवहार केला जात आहे. जमीन खरेदी केल्यानंतर तिला अवैधरीत्या भोगवटा वर्ग-१ मध्ये परिवर्तित केले जात आहे. भोगवटा वर्ग-१ मध्ये परिवर्तित जमिनीवर फार्महाऊस बांधून ते अन्य ग्राहकांना विकले जात आहेत. आतापर्यंत सुमारे १००० एकर जमीन भोगवटा वर्ग-२ मधून वर्ग-१ गटात परिवर्तित करण्यात आली आहे. अमरावती विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून, २० फेब्रुवारी २०१४ रोजी अहवाल सादर केला होता. त्यामध्ये जमीन खरेदीदार हे वन व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत मिळून हा गैरव्यवहार करीत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता; परंतु त्यावर पुढे काहीच कारवाई झाली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.सखोल चौकशीची विनंतीया प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि चौकशीमध्ये दोषी आढळणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. जी. जी. बडे यांनी बाजू मांडली.अधिवेशनात पडसादनागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यात या विषयाचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रथमदर्शनी हा मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे दिसून आले आहे. न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे शासनाला भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर