शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

टोळधाडीमुळे आजवर नागपूर जिल्ह्यात७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:19 IST

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.आधीच कोरोनाच्या विषाणूने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी टोळातील कीटक संकटात भर टाकणारे ठरणार आहेत. नाकतोड्याच्या आकारातील लाखोंच्या संख्येने असलेले किडे गावकऱ्यांना दिसल्याने एकच खळबळ उडाली. टोळधाड मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करीत असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे आव्हान निर्माण झाले. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकºयांनी फवारणी केली, तिथे नुकसान दिसून येत नाही. टोळधाड आल्यानंतर टीन वाजविले, धूर केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होते. विभागाकडे प्राप्त नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार या टोळधाडीने भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदी फळ पिकांचे नुकसान केले असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावांत ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून येत आहे. या टोळधाडीला नष्ट करण्यासाठी रात्रीच्या वेळी त्यांचे थवे थांबल्यावर त्यांच्यावर कृषी विभागाकडून फवारणी करण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी