शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

टोळधाडीमुळे आजवर नागपूर जिल्ह्यात७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 19:19 IST

गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात टोळधाडीने दहशत पसरविली आहे. कृषी विभागाकडे प्राप्त प्राथमिक अहवालानुसार टोळधाडीने जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावात ७३ हेक्टरवरील भाजीपाला, संत्रा, मोसंबीसारख्या फळ पिकांचे नुकसान केले आहे. खरीपाचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला असताना, टोळधाडीची धडकी शेतकऱ्यांना बसली आहे.आधीच कोरोनाच्या विषाणूने हैराण झालेल्या शेतकऱ्यांसाठी टोळातील कीटक संकटात भर टाकणारे ठरणार आहेत. नाकतोड्याच्या आकारातील लाखोंच्या संख्येने असलेले किडे गावकऱ्यांना दिसल्याने एकच खळबळ उडाली. टोळधाड मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करीत असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे आव्हान निर्माण झाले. कृषी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकºयांनी फवारणी केली, तिथे नुकसान दिसून येत नाही. टोळधाड आल्यानंतर टीन वाजविले, धूर केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होते. विभागाकडे प्राप्त नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार या टोळधाडीने भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदी फळ पिकांचे नुकसान केले असल्याचे कृषी विभागाचे म्हणने आहे. काटोल, कळमेश्वर या तालुक्यांमधील गावांत ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केल्याचे प्राथमिक अहवालावरून दिसून येत आहे. या टोळधाडीला नष्ट करण्यासाठी रात्रीच्या वेळी त्यांचे थवे थांबल्यावर त्यांच्यावर कृषी विभागाकडून फवारणी करण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी