शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

नागपूर जिल्ह्यात १६,३५१ हेक्टर क्षेत्रातील पीक व फळांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:34 IST

गारपीट व वादळी पावसामुळे शेत पिकाखालील क्षेत्र तसेच संत्रा, मोसंबी या फळ पिकांचे काटोल, कळमेश्वर, नरखेड आदी सहा तालुक्यात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानुसार १६ हजार ३५१.६२ हेक्टर (आर) क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये २० हजार ३१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाधित क्षेत्रामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

ठळक मुद्देअवकाळी पाऊस व गारपीट : चार दिवसात सर्वेक्षण पूर्ण२० हजार ३१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेशनुकसानीचा अहवाल शासनाला सादरगहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गारपीट व वादळी पावसामुळे शेत पिकाखालील क्षेत्र तसेच संत्रा, मोसंबी या फळ पिकांचे काटोल, कळमेश्वर, नरखेड आदी सहा तालुक्यात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानुसार १६ हजार ३५१.६२ हेक्टर (आर) क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये २० हजार ३१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाधित क्षेत्रामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी, केळी आदी फळे तसेच गहू, हरभरा व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनातर्फे बाधित क्षेत्रातील नुकसानीचे सर्वेक्षण चार दिवसात पूर्ण करून नुकसान झालेल्या संपूर्ण बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान शेती व फळ पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीसंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तर संत्रा, मोसंबी, केळी व इतर पिकांचे काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर व पारशिवनी आदी तालुक्यातील नुकसानीचा समावेश आहे. बाधित शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईसाठी २४ कोटी ८५ लक्ष रुपये निधी लागणार आहे.गारपिटीमुळे गहू, हरभरा व भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित झालेल्या तालुक्यांमध्ये काटोल तालुक्यातील ६ हजार ८८.३१ हेक्टर शेत पिकांचा समावेश असून, ७ हजार ३४७ बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ८ कोटी २१ लक्ष रुपयाचे अनुदान लागणार आहे. नरखेड तालुक्यातील २ हजार १९७ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, बाधित ३ हजार २७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसान भरपाईसाठी २ कोटी ९६१ लक्ष रुपयाचा निधी लागणार आहे. कळमेश्वर तालुक्यातील १ हजार ८३.५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, बाधितांमध्ये १ हजार ३३६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.नुकसानभरपाईसाठी १ कोटी ४६१ लक्ष रुपये, सावनेर २९७.३० हेक्टर आर, ३९५ शेतकरी नुकसान ४० लाख, पारशिवनी ३० हेक्टर ५३ शेतकरी, रामटेक ५५ हेक्टर आर १३० शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. कोरडवाहू पिकाखालील बाधित क्षेत्रामध्ये एकूण १५९.६९, आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या बाधित क्षेत्रामध्ये ९ हजार ७५१.११ हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकाखाली बाधित क्षेत्रामध्ये ६ हजार ४३०.८२ हेक्टर आर अशा एकूण १६ हजार ३५१.६२ हेक्टर आर बाधित क्षेत्राचा समावेश आहे.गारपिटीमुळे व वादळी पावसामुळे शेती व फळ पिकांचा ३३ ते ५० टक्के व ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे व त्यानुसार नुकसानीसंदर्भातील अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.संत्रा व मोसंबी फळांचे नुकसानवादळी पाऊस व गारपिटीमुळे पाच तालुक्यातील संत्रा, मोसंबी, केळी व इतर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक काटोल तालुक्यातील २ हजार ७०० हेक्टर आर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसानीचा समावेश असून ३ हजार ६७ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे.नरखेड तालुक्यातील १ हजार ८१९ हेक्टर आर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान झाले असून २ हजार ४१७ बाधित शेतकरी आहेत. नुकसानभरपाईसाठी ३ कोटी २७ लाख रुपये. कळमेश्वर तालुक्यातील १ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान झाले असून १ हजार ९०९ शेतकरी बाधित आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्राकरिता ३ कोटी २०लक्ष रुपये निधी लागणार आहे.सावनेर तालुक्यातील १२४ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले असून १३३ शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. तसेच पारशिवनी तालुक्यातील ४ हेक्टर आर क्षेत्रामध्ये नुकसान झाले असून पाच शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

टॅग्स :Hailstormगारपीटagricultureशेती