शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नागपूर जिल्ह्यात १६,३५१ हेक्टर क्षेत्रातील पीक व फळांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:34 IST

गारपीट व वादळी पावसामुळे शेत पिकाखालील क्षेत्र तसेच संत्रा, मोसंबी या फळ पिकांचे काटोल, कळमेश्वर, नरखेड आदी सहा तालुक्यात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानुसार १६ हजार ३५१.६२ हेक्टर (आर) क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये २० हजार ३१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाधित क्षेत्रामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

ठळक मुद्देअवकाळी पाऊस व गारपीट : चार दिवसात सर्वेक्षण पूर्ण२० हजार ३१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेशनुकसानीचा अहवाल शासनाला सादरगहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा, मोसंबी आदींचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गारपीट व वादळी पावसामुळे शेत पिकाखालील क्षेत्र तसेच संत्रा, मोसंबी या फळ पिकांचे काटोल, कळमेश्वर, नरखेड आदी सहा तालुक्यात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानुसार १६ हजार ३५१.६२ हेक्टर (आर) क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये २० हजार ३१८ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. बाधित क्षेत्रामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.गारपीट व अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी, केळी आदी फळे तसेच गहू, हरभरा व भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनातर्फे बाधित क्षेत्रातील नुकसानीचे सर्वेक्षण चार दिवसात पूर्ण करून नुकसान झालेल्या संपूर्ण बाधित क्षेत्राचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीमुळे ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान शेती व फळ पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीसंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कळमेश्वर, सावनेर, काटोल, नरखेड, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील गहू, हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. तर संत्रा, मोसंबी, केळी व इतर पिकांचे काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर व पारशिवनी आदी तालुक्यातील नुकसानीचा समावेश आहे. बाधित शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाईसाठी २४ कोटी ८५ लक्ष रुपये निधी लागणार आहे.गारपिटीमुळे गहू, हरभरा व भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित झालेल्या तालुक्यांमध्ये काटोल तालुक्यातील ६ हजार ८८.३१ हेक्टर शेत पिकांचा समावेश असून, ७ हजार ३४७ बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी ८ कोटी २१ लक्ष रुपयाचे अनुदान लागणार आहे. नरखेड तालुक्यातील २ हजार १९७ हेक्टर आर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून, बाधित ३ हजार २७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. नुकसान भरपाईसाठी २ कोटी ९६१ लक्ष रुपयाचा निधी लागणार आहे. कळमेश्वर तालुक्यातील १ हजार ८३.५० हेक्टर पिकांचे नुकसान झाले असून, बाधितांमध्ये १ हजार ३३६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.नुकसानभरपाईसाठी १ कोटी ४६१ लक्ष रुपये, सावनेर २९७.३० हेक्टर आर, ३९५ शेतकरी नुकसान ४० लाख, पारशिवनी ३० हेक्टर ५३ शेतकरी, रामटेक ५५ हेक्टर आर १३० शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. कोरडवाहू पिकाखालील बाधित क्षेत्रामध्ये एकूण १५९.६९, आश्वासित सिंचनाखालील पिकांच्या बाधित क्षेत्रामध्ये ९ हजार ७५१.११ हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकाखाली बाधित क्षेत्रामध्ये ६ हजार ४३०.८२ हेक्टर आर अशा एकूण १६ हजार ३५१.६२ हेक्टर आर बाधित क्षेत्राचा समावेश आहे.गारपिटीमुळे व वादळी पावसामुळे शेती व फळ पिकांचा ३३ ते ५० टक्के व ५० टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे व त्यानुसार नुकसानीसंदर्भातील अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.संत्रा व मोसंबी फळांचे नुकसानवादळी पाऊस व गारपिटीमुळे पाच तालुक्यातील संत्रा, मोसंबी, केळी व इतर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक काटोल तालुक्यातील २ हजार ७०० हेक्टर आर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसानीचा समावेश असून ३ हजार ६७ बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे.नरखेड तालुक्यातील १ हजार ८१९ हेक्टर आर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान झाले असून २ हजार ४१७ बाधित शेतकरी आहेत. नुकसानभरपाईसाठी ३ कोटी २७ लाख रुपये. कळमेश्वर तालुक्यातील १ हजार ७८३ हेक्टर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान झाले असून १ हजार ९०९ शेतकरी बाधित आहेत. नुकसान झालेल्या क्षेत्राकरिता ३ कोटी २०लक्ष रुपये निधी लागणार आहे.सावनेर तालुक्यातील १२४ हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले असून १३३ शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे. तसेच पारशिवनी तालुक्यातील ४ हेक्टर आर क्षेत्रामध्ये नुकसान झाले असून पाच शेतकऱ्यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.

टॅग्स :Hailstormगारपीटagricultureशेती