शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांवर टीका ही ‘एहसान फरामोशी’ : सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:53 IST

विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

ठळक मुद्देखासदार महोत्सवात मांडला स्वातंत्रवीराचा झंझावाती प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्याचा कर जगाला सावरतो तो सावरकर. विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या खासदार महोत्सवात गुरुवारी ‘सावरकर एक झंझावात’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. सावरकरांचा झंझावाती जीवनप्रवास श्रोत्यांपुढे मांडताना शेवडे पुढे म्हणाले, आताच्या युवा पिढीला सगळेच इन्स्टंट हवे आहे. परंतु सावरकरांना एका वाक्यात सांगणे फार कठीण आहे. म्हणूनच तरुणाईला अद्याप सावरकर समजलेले नाहीत. महाविद्यालय व शाळेत केवळ अक्षर ओळख होते. जगाच्या बाजारातच व्यवहार कळतो. सावरकर ओळखायचे असतील तर केवळ पुस्तकातून ते कळणार नाहीत. त्यासाठी आधी त्यांचा त्याग, बलिदान, देशप्रेमाची भावना समजून घ्यावी लागेल. सावरकर म्हणजे, प्रज्ञा आणि प्रतिभेचे विलक्षण संगम होते. त्यांचे १२ खंडातील काव्य हे विद्रोहातून जन्माला आले. सावरकर हे एका देहात वसलेले विविध अवतार होते. त्यात कवी, नेता, सैनिक अशा सर्वांचा समावेश होता. त्यांनी देशहितासाठीच अभिनव भारतची स्थापना केली आणि तिचा कार्य उद्देश संपल्यावर १९५५ साली ही संघटना विसर्जितही केली. या उलट या देशातील एका महात्म्याने स्वातंत्र्यानंतर एका पक्षाला विसर्जित करण्याचा सल्ला देऊनही तो पक्ष मात्र आजही राजकारण करतोय, अशा शब्दात शेवडेंनी काँग्रेसचाही समाचार घेऊन टाकला. व्याख्यानाच्या प्रारंभी आ. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे व जयप्रकाश गुप्ता यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्यानाच्या मध्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रोत्यांमध्ये बसून या वैचारिक मेजवानीचा आस्वाद घेतला. याच कार्यक्रमात शिवछत्र ढोलताशा पथकाचे वादनही झाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर