शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांवर टीका ही ‘एहसान फरामोशी’ : सच्चिदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:53 IST

विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले.

ठळक मुद्देखासदार महोत्सवात मांडला स्वातंत्रवीराचा झंझावाती प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्याचा कर जगाला सावरतो तो सावरकर. विनायक दामोदर सावरकर नावाचे हे वादळ या देशाच्या कल्याणासाठीच जन्माला आले होते. परंतु आज जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात तेव्हा दु:ख होते आणि त्याहीपेक्षा जास्त दु:ख तेव्हा होते जेव्हा या देशभक्तावरच्या टीकेला उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. याला ‘एहसान फरामोशी’ म्हणतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सच्चिदानंद शेवडे यांनी केले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या खासदार महोत्सवात गुरुवारी ‘सावरकर एक झंझावात’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. सावरकरांचा झंझावाती जीवनप्रवास श्रोत्यांपुढे मांडताना शेवडे पुढे म्हणाले, आताच्या युवा पिढीला सगळेच इन्स्टंट हवे आहे. परंतु सावरकरांना एका वाक्यात सांगणे फार कठीण आहे. म्हणूनच तरुणाईला अद्याप सावरकर समजलेले नाहीत. महाविद्यालय व शाळेत केवळ अक्षर ओळख होते. जगाच्या बाजारातच व्यवहार कळतो. सावरकर ओळखायचे असतील तर केवळ पुस्तकातून ते कळणार नाहीत. त्यासाठी आधी त्यांचा त्याग, बलिदान, देशप्रेमाची भावना समजून घ्यावी लागेल. सावरकर म्हणजे, प्रज्ञा आणि प्रतिभेचे विलक्षण संगम होते. त्यांचे १२ खंडातील काव्य हे विद्रोहातून जन्माला आले. सावरकर हे एका देहात वसलेले विविध अवतार होते. त्यात कवी, नेता, सैनिक अशा सर्वांचा समावेश होता. त्यांनी देशहितासाठीच अभिनव भारतची स्थापना केली आणि तिचा कार्य उद्देश संपल्यावर १९५५ साली ही संघटना विसर्जितही केली. या उलट या देशातील एका महात्म्याने स्वातंत्र्यानंतर एका पक्षाला विसर्जित करण्याचा सल्ला देऊनही तो पक्ष मात्र आजही राजकारण करतोय, अशा शब्दात शेवडेंनी काँग्रेसचाही समाचार घेऊन टाकला. व्याख्यानाच्या प्रारंभी आ. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, माजी खासदार दत्ता मेघे व जयप्रकाश गुप्ता यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करण्यात आले. व्याख्यानाच्या मध्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रोत्यांमध्ये बसून या वैचारिक मेजवानीचा आस्वाद घेतला. याच कार्यक्रमात शिवछत्र ढोलताशा पथकाचे वादनही झाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर