शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीला चालवतेय क्रिमिनल ‘मॅनेजमेंट सिस्टीम’

By admin | Updated: April 27, 2015 02:25 IST

उपराजधानीत गेल्या अनेक दिवसांपासून ‘क्रिमिनल मॅनेजमेंट सिस्टिम’ चालत आहे. पोलीस, गुन्हेगार, नेता आणि तथाकथित समाजसेवक या व्यवस्थेत सहभागी आहेत.

जगदीश जोशी नागपूरउपराजधानीत गेल्या अनेक दिवसांपासून ‘क्रिमिनल मॅनेजमेंट सिस्टिम’ चालत आहे. पोलीस, गुन्हेगार, नेता आणि तथाकथित समाजसेवक या व्यवस्थेत सहभागी आहेत. त्यांच्यात एक अतुट संबंध निर्माण झाले असून, त्यामुळे शहरात गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळत आहे. परिणामी गुन्ह्याचे खरे कारण पुढे येत नाही. खरे सूत्रधारही त्यामुळेच सहीसलामत राहतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या खुनांच्या घटनासुद्धा याच ‘सिस्टीम’च्या यशस्वीतेची साक्ष देत आहेत. सर्वप्रथम २ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाजवळ झालेल्या घुग्घुस येथील कोल माफिया सगीर सिद्दीकी याच्या खुनाचीच घटना घेता येईल. सगीरला एका भूमाफियाच्या वाहनातच गोळी मारण्यात आली होती. उपचारादरम्यान ८ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी सगीरसोबत कारमध्ये गुन्हेगार जाकीर खान, शक्ती मनपिया, आशिष पारोचो बसले होते. तेव्हा सगीर कार चालवीत होता. गोळी लागल्यामुळे कार एका वकिलाच्या कार्यालयात घुसली होती. त्यामुळे पोलीस या घटनेला अगोदर अपघातच समजत होते. सगीरच्या साथीदारांनीसुद्धा हा एक अपघात असल्याचाच देखावा केला होता. डॉक्टरांनी गोळी लागल्याचे सांगितल्यावर पोलीस कामाला लागले आणि तिघांनाही ताब्यात घेतले. शक्तीने चुकून गोळी चालल्याची कबुली दिली. त्याने घटनेच्या पूर्वी तो स्वत: असाध्य आजाराने ग्रस्त असल्याचे दस्तऐवज तयार करून घेतले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याच गोष्टीवर विश्वास ठेवून या प्रकरणामागील सत्य शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. पोलिसांनी आरोपींची शस्त्रे लपविणारा विकास ऊर्फ पप्पू डागोर याला अटक केली. पोलीसांनी त्याच्याकडूनही माहिती काढण्याचा प्रयत्न केला नाही, कारण पोलीस एका ठरलेल्या योजनेनुसारच काम करीत होते. सगीरच्या खुनामुळे अनेकांची चांदी झाली होती. त्यांची मदत करणे पोलिसांसाठी फायद्याचा सौदा होता. या सौद्यामुळेच साडेचार महिन्यानंतरही हाजी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. सूत्रानुसार खून केल्यानंतर तत्काळ चंद्रपूरच्या कोळसा माफियांनी पोलिसांच्या तपासाची दिशासुद्धा ठरवून दिली होती. कोळशाच्या तस्करीत सगीरचे अनेक वर्षांपासून त्याचा प्रतिस्पर्धी समीर आणि हाजी यांच्याशी वैमनस्य सुरू होते. सगीरला दर महिन्याला एक कोटी रुपयाची कमाई होत होती. ही गोष्ट त्याच्या प्रेयसीनेसुद्धा पोलिसांसमोर कबूल केली होती. दुसरे प्रकरण १३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासाजवळ झालेल्या रितेश बैसवारे याच्या हत्येचे आहे. रितेशचा सकाळी ९.३० वाजता जिमला जाताना धरमपेठ चौकातच खून करण्यात आला होता. त्याला योजनाबद्ध पद्धतीने संपविण्यात आले होते. अंबाझरी पोलिसांनी अश्विन तुर्केल, निखील डागोर आणि त्याच्या एका साथीदाराला आरोपी केले होते. घटनास्थळावरच्या सीसीटीव्हीमध्ये सात ते आठ हल्लेखोर असल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली असल्याने पोलिसांनी त्यालाही खोटे ठरविले. जेव्हा आरोपीला शोधण्याचे नाटक केले जात होते त्यावेळी त्यांचा संदेशवाहक नेता पोलिसांसोबत दिवस-रात्र होता. तो नेता आरोपींना लहानसहान घडामोडींची माहिती देत होता. त्यांच्या योजनेनुसारच एफआयआरमध्ये नोंद असलेल्या आरोपींनी तत्काळ समर्पणसुद्धा केले होते. रितेश बैसवारे हत्याकांडात पोलीस आणि गुन्हेगारांचे संगनमत असल्याची गोष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला सोपविण्यात आला होता. गुन्हे शाखेकडे आरोपींची संख्या नऊ आहे. त्यांनी संबंधित नेत्यांचे बयानसुद्धा नोंदविले आहे. तिसरे प्रकरण सीताबर्डीतील इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये झालेल्या व्यापारी भारत खटवानी यांच्या खुनाचे आहे. ७ मार्च रोजी दुपारी खटवानी यांच्या दुकानात घुसून त्यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. या खुनाचे सूत्रधार शेख शरीफने गणेशपेठच्या गुजरवाडीतील गुन्हेगारांना खटवानीच्या खुनाची सुपारी दिली होती. हा गुन्हेगार पोलीस आणि आपल्या गॉडफादरच्या मदतीने अनेक वर्षांपासून गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहे. शरीफने खुनासाठी केवळ पाच हजार रुपये ‘अ‍ॅडव्हान्स’ दिले होते. पोलीस घटनेनंतर ’इलेक्ट्रानिक्स सर्व्हिलन्स’वर भर देतात, याची शरीफला माहिती होती.त्यामुळे काम सोपविल्यानंतर त्याने ‘सुपारी किलर्स’शी संपर्क तोडून टाकला. तो घटनेपूर्वी आपल्या विश्वासू साथीदारांसोबत धार्मिक यात्रेला रवाना झाला. आपल्यावर संशय आला तरी आपण बाहेर असल्याने काही होणार नाही, याचा त्याला विश्वास होता. शरीफच्या योजनेनुसार सुपारी किलर्सने सुद्धा खुनानंतर शहर सोडले. उपचारादरम्यान खटवानी मरण पावले. पोलीसही धास्तीत आले. दरम्यान शरीफ गँग मददगार पोलीस कर्मचारी आणि गँगस्टरच्या मदतीने या प्रकरणातून स्वत: वाचण्याची योजना आखू लागले.यातच त्यांच्या मददगार पोलीस कर्मचाऱ्यांनी योजनाबद्ध पद्धतीने त्यांना समर्पण करायला लावले. खुनाच्या १२ दिवसानंतर गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला. गुन्हे शाखेने गुन्हेगारांची मुळे कापण्यासाठी शरीफ गँगच्या १४ सदस्यांच्या विरुद्ध मरोका अंतर्गत गुन्हा दाखल केला.