शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

मुख्यमंत्र्यांविरुद्धचा फौजदारी खटला रद्द

By admin | Updated: December 27, 2014 02:57 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर आरोपींविरुद्धचा २३ वर्षे जुन्या वादासंदर्भातील फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर आरोपींविरुद्धचा २३ वर्षे जुन्या वादासंदर्भातील फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे. इतर आरोपींमध्ये हृदयकुमार बाबुलाल पराते (गिरीपेठ), मदनलाल बाबुलाल पराते (गिरीपेठ), प्रवीण रोमाधारी दुबे (काचिपुरा), दीपक जयसिंग हिरणवार (धरमपेठ), विनित बाबुलाल पराते (गिरीपेठ)व दीपेश मदनलाल पराते (गिरीपेठ)यांचा समावेश आहे.७ जून १९९१ रोजी पराते कम्पाऊंड परिसरातील विशिष्ट बांधकाम पाडण्यावरून आरोपींमध्ये वाद झाला होता. यावरून त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी नोंदविल्या होत्या. हृदयनाथ पराते यांच्या तक्रारीवरून प्रवीण दुबे, देवेंद्र फडणवीस व दीपक हिरणवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, २९४, ४४८, ३२४, ३३६ व ४२७, तर दीपक हिरणवार यांच्या तक्रारीवरून मदनलाल पराते, हृदयकुमार पराते, विनित पराते व दीपेश पराते यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, २९४, ५०६ (बी), ४२७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून प्रलंबित होता. काळाच्या ओघात आरोपींनी आपसी तडजोडीने वाद मिटविला. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात दोन फौजदारी अर्ज दाखल करून खटला रद्द करण्याची विनंती केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी ‘नरिंदरसिंग वि. पंजाब शासन’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता अर्जदारांची विनंती मान्य केली. २३ वर्षे जुने प्रकरण असतानाही त्यात विशेष प्रगती झालेली नाही. अर्जदारांच्या वस्त्या एकमेकांना लागून आहेत. शांतता व सद्भाव कायम ठेवण्यासाठी त्यांनी वाद संपविण्याचा निर्णय घेतला आहे, असे न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे. हृदयकुमार पराते, मदनलाल पराते, प्रवीण दुबे व दीपेश पराते न्यायालयात व्यक्तीश: हजर झाले होते.(प्रतिनिधी)