शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुख्यमंत्र्यांविरुद्धचा फौजदारी खटला रद्द

By admin | Updated: December 27, 2014 02:57 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर आरोपींविरुद्धचा २३ वर्षे जुन्या वादासंदर्भातील फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे.

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर आरोपींविरुद्धचा २३ वर्षे जुन्या वादासंदर्भातील फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला आहे. इतर आरोपींमध्ये हृदयकुमार बाबुलाल पराते (गिरीपेठ), मदनलाल बाबुलाल पराते (गिरीपेठ), प्रवीण रोमाधारी दुबे (काचिपुरा), दीपक जयसिंग हिरणवार (धरमपेठ), विनित बाबुलाल पराते (गिरीपेठ)व दीपेश मदनलाल पराते (गिरीपेठ)यांचा समावेश आहे.७ जून १९९१ रोजी पराते कम्पाऊंड परिसरातील विशिष्ट बांधकाम पाडण्यावरून आरोपींमध्ये वाद झाला होता. यावरून त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी नोंदविल्या होत्या. हृदयनाथ पराते यांच्या तक्रारीवरून प्रवीण दुबे, देवेंद्र फडणवीस व दीपक हिरणवार यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम १४७, १४८, १४९, २९४, ४४८, ३२४, ३३६ व ४२७, तर दीपक हिरणवार यांच्या तक्रारीवरून मदनलाल पराते, हृदयकुमार पराते, विनित पराते व दीपेश पराते यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, २९४, ५०६ (बी), ४२७, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी जेएमएफसी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून प्रलंबित होता. काळाच्या ओघात आरोपींनी आपसी तडजोडीने वाद मिटविला. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात दोन फौजदारी अर्ज दाखल करून खटला रद्द करण्याची विनंती केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी ‘नरिंदरसिंग वि. पंजाब शासन’ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता अर्जदारांची विनंती मान्य केली. २३ वर्षे जुने प्रकरण असतानाही त्यात विशेष प्रगती झालेली नाही. अर्जदारांच्या वस्त्या एकमेकांना लागून आहेत. शांतता व सद्भाव कायम ठेवण्यासाठी त्यांनी वाद संपविण्याचा निर्णय घेतला आहे, असे न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे. हृदयकुमार पराते, मदनलाल पराते, प्रवीण दुबे व दीपेश पराते न्यायालयात व्यक्तीश: हजर झाले होते.(प्रतिनिधी)