शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चाललेय तरी काय ! दोन दिवसांआड एक खून, दररोज ३० गुन्हे

By योगेश पांडे | Updated: January 13, 2023 14:46 IST

पोलिसांना गुन्हेगारांच्या वाकुल्या : संवेदनशील भागांतील गस्त घटली, गुन्हेगार परत ‘ॲक्टिव्ह’

नागपूर : २०२२ मध्ये हत्येच्या घटना कमी झाल्याची आकडेवारी सादर करत पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतःची पाठ थोपटली होती. मात्र, २०२३ मध्ये पहिल्या १२ दिवसांतच पाच हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याशिवाय वर्षाच्या पहिल्या दहा दिवसांतच एकूण गुन्ह्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सरासरी एका दिवसाआड एक हत्या तर प्रत्येक दिवशी ३० गुन्हे झाल्याचे वास्तव आहे. शहरात गुन्हेगार परत ‘ॲक्टिव्ह’ झाले असून खुलेआम गुन्हे करत पोलिस यंत्रणेला आव्हानच दिले जात आहे.

पोलिसांच्याच आकडेवारीनुसार २०२२ साली ७ हजार ७९६ गुन्हे दाखल झाले होते. याचाच अर्थ दर दिवसाला सरासरी २१ गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, २०२३ मध्ये पहिल्या दहा दिवसांतच जवळपास ३०० गुन्हे नोंदविले गेले व दर दिवसाची सरासरी ३० गुन्हे इतकी आहे. २०२२ मध्ये ६५ हत्या झाल्या होत्या. सरासरी दर पाच ते सहा दिवसाला एक हत्या झाली होती. मात्र, या वर्षी पहिल्या १२ दिवसांतच सहा हत्यांची नोंद झाली असून दर दोन दिवसांत एक हत्या झाली आहे. ही आकडेवारीच नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

नवीन वर्षांत एक जानेवारीला पाचपावली पोलिस ठाण्यातून हत्येचे सत्र सुरू झाले. यानंतर सक्करदरा, कळमना, हिंगणा, अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या आहेत. कळमना घटना वगळता इतर सर्व घटनांमध्ये मयत किंवा आरोपी व्यावसायिक गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून खुनाच्या घटना घडणे हे चिंतेचे कारण आहे. मेडिकलमध्ये सैतानी बापाने आपटून मारलेल्या बाळाचा मृत्यू झाल्यावर हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

झाडाझडती बंद झाली का ?

शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून ‘क्राइम कंट्रोल’साठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून हवे तसे सहकार्य मिळत नसल्याची चर्चा आहे. अनेक गुन्हेदेखील वेळेवर नोंदविण्यात येत नसून योग्य आकडेवारी वेळेत पोलिस यंत्रणेत ‘फिड’देखील होत नाही. गुन्हेगारी नियंत्रणाचा दावा केला जात असला तरी गुन्हेगार मात्र अनियंत्रित असल्याचे वास्तव यातून उघड होत आहे. गुन्हेगार बिनधास्त रस्त्याने घातक शस्त्रे घेऊन फिरत असताना पोलिसांना ते का दिसत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहरातील संवेदनशील भागातील गस्त कमी झाल्याची नागरिकांचीच ओरड आहे, तर पॅरोलवरून सुटून आलेल्या गुन्हेगारांवर हवा तसा ‘वॉच’ नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • २०२२ : दररोज सरासरी २१ गुन्हे, पाच-सहा दिवसांआड हत्या
  • २०२३ : दहा दिवसांत दररोज सरासरी ३० गुन्हे, दोन दिवसांआड हत्या
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर