शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नागपुरात चाललेय तरी काय ! दोन दिवसांआड एक खून, दररोज ३० गुन्हे

By योगेश पांडे | Updated: January 13, 2023 14:46 IST

पोलिसांना गुन्हेगारांच्या वाकुल्या : संवेदनशील भागांतील गस्त घटली, गुन्हेगार परत ‘ॲक्टिव्ह’

नागपूर : २०२२ मध्ये हत्येच्या घटना कमी झाल्याची आकडेवारी सादर करत पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतःची पाठ थोपटली होती. मात्र, २०२३ मध्ये पहिल्या १२ दिवसांतच पाच हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याशिवाय वर्षाच्या पहिल्या दहा दिवसांतच एकूण गुन्ह्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सरासरी एका दिवसाआड एक हत्या तर प्रत्येक दिवशी ३० गुन्हे झाल्याचे वास्तव आहे. शहरात गुन्हेगार परत ‘ॲक्टिव्ह’ झाले असून खुलेआम गुन्हे करत पोलिस यंत्रणेला आव्हानच दिले जात आहे.

पोलिसांच्याच आकडेवारीनुसार २०२२ साली ७ हजार ७९६ गुन्हे दाखल झाले होते. याचाच अर्थ दर दिवसाला सरासरी २१ गुन्हे नोंदविण्यात आले. मात्र, २०२३ मध्ये पहिल्या दहा दिवसांतच जवळपास ३०० गुन्हे नोंदविले गेले व दर दिवसाची सरासरी ३० गुन्हे इतकी आहे. २०२२ मध्ये ६५ हत्या झाल्या होत्या. सरासरी दर पाच ते सहा दिवसाला एक हत्या झाली होती. मात्र, या वर्षी पहिल्या १२ दिवसांतच सहा हत्यांची नोंद झाली असून दर दोन दिवसांत एक हत्या झाली आहे. ही आकडेवारीच नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

नवीन वर्षांत एक जानेवारीला पाचपावली पोलिस ठाण्यातून हत्येचे सत्र सुरू झाले. यानंतर सक्करदरा, कळमना, हिंगणा, अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटना घडल्या आहेत. कळमना घटना वगळता इतर सर्व घटनांमध्ये मयत किंवा आरोपी व्यावसायिक गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून खुनाच्या घटना घडणे हे चिंतेचे कारण आहे. मेडिकलमध्ये सैतानी बापाने आपटून मारलेल्या बाळाचा मृत्यू झाल्यावर हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

झाडाझडती बंद झाली का ?

शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून ‘क्राइम कंट्रोल’साठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून हवे तसे सहकार्य मिळत नसल्याची चर्चा आहे. अनेक गुन्हेदेखील वेळेवर नोंदविण्यात येत नसून योग्य आकडेवारी वेळेत पोलिस यंत्रणेत ‘फिड’देखील होत नाही. गुन्हेगारी नियंत्रणाचा दावा केला जात असला तरी गुन्हेगार मात्र अनियंत्रित असल्याचे वास्तव यातून उघड होत आहे. गुन्हेगार बिनधास्त रस्त्याने घातक शस्त्रे घेऊन फिरत असताना पोलिसांना ते का दिसत नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शहरातील संवेदनशील भागातील गस्त कमी झाल्याची नागरिकांचीच ओरड आहे, तर पॅरोलवरून सुटून आलेल्या गुन्हेगारांवर हवा तसा ‘वॉच’ नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • २०२२ : दररोज सरासरी २१ गुन्हे, पाच-सहा दिवसांआड हत्या
  • २०२३ : दहा दिवसांत दररोज सरासरी ३० गुन्हे, दोन दिवसांआड हत्या
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर