शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 21:31 IST

तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा व करुणेचा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मार्गाचा अवलंब केला. या महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती करता येईल, असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे आचार्य लोकेश मुनीजी यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देआचार्य लोकेश मुनीजी : आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा व करुणेचा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मार्गाचा अवलंब केला. या महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती करता येईल, असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे आचार्य लोकेश मुनीजी यांनी येथे व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेत धर्मातील सामाजिक शांती व समता या विषयावर ते बोलत होते. आचार्य लोकेश मुनी म्हणाले, मोक्षाचा मार्ग सांगणारे अनेक आहेत. पण मुक्तीचा मार्ग दाखवणारे जीवनच सार्थक आहे. विश्वशांतीच्या पूर्वी मनाची शांती महत्त्वाची आहे. व्यक्ती शांतीचा शोधासाठी मंदिर, हिमालयात जाऊन येतात. आता तर अंतरिक्षामध्येही घर बांधण्यासाठी प्लॉटचे बुकिंग केले जात आहे. हे सर्व शांततेच्या शोधासाठी सुरू आहे. परंतु कुणीही आपल्या मनात ती शोधत नाही. आपले मन शांत नसेल तर व्यक्ती शांत राहूच शकत नाही. त्यामुळे मनाची शांती हीच सर्वात महत्त्वाची आहे. तथागत गौतम बुद्धाने नेमका हाच संदेश दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दीक्षाभूमीवरून जगात जावा शांतीचा संदेश - अब्दुल फलाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दीक्षाभूमीवरून बुद्धाचा शांती व करुणेचा संदेश पुनर्जिवित केला, त्या दीक्षाभूमीवरून तो जगभरात पोहाचावा, असे आवाहन मुस्लीम समजाचे विचारवंत अब्दुल फलाही यांनी केले. इस्लाम याचा अर्थ शांती होय. इस्लाम धर्म हा शांतीचा धर्म आहे. परंतु समाजात काही असमाजिक तत्त्व असे आहेत. जे समाजात कटुता निर्माण करतात. त्यांना रोखून शांतीचा संदेश पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जगभरातील बौद्ध विचारवंतांनी मांडली समतेची संकल्पनापरिषदेच्या एका सत्रात जगभरातील बौद्ध विचारवंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची संकल्पना विषद करीत तथागत गौतम बुद्धांचा धम्म समजावून सांगितला. थायलंडच्या डॉ. सिरीकोतन मनिरीन, राजकुमारी मारिया अमोर, राकुमारी सिसोवॉट, गगन मलीक यांच्यासह महाबोधी सोसायटी श्रीलंकेचे अध्यक्ष बानागल उपत्तीस्स नायक थेरो, बांग्लादेश येथील भंते बानाश्री महाथेरा संघनायका आदींनी समतेची संकल्पना विषद केली. तसेच थायलंड कंबोडिया येथील कलावंतांनी आपापल्या देशातील कलाही सादर केली.उद्या परिषदेतसकाळी ७ वाजता बुद्ध वंदनासकाळी ९.३० वाजता डॉ. आंबेडकर मानवीय अधिकारांचे पुरस्कर्ते व आधुनिक भारताचे शिल्पकार यावर खा. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान.सकाळी १०.१५ वाजता म्यानमार येथील कलावंतांचे नृत्य सादरीकरणसकाळी १०.४५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व मार्गदर्शनदुपारी १२ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमदुपारी २ वाजता पाली तथा जागतिक भाषांमधील बौद्ध धम्माचे मानवतावादी तत्त्वज्ञानदुपारी ४ वाजता बौद्ध राष्ट्रांच्या प्रगतीत बुद्ध धम्माचे योगदान यावर मार्गदर्शनसायंकाळी ७.३० वाजता अहिंसक अंगुलीमाल नाटक (दीक्षाभूमीवर)   

टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वnagpurनागपूर