शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 21:31 IST

तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा व करुणेचा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मार्गाचा अवलंब केला. या महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती करता येईल, असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे आचार्य लोकेश मुनीजी यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देआचार्य लोकेश मुनीजी : आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा व करुणेचा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या मार्गाचा अवलंब केला. या महापुरुषांच्या विचारांवर चालल्यानेच सुदृढ समाजाची निर्मिती करता येईल, असे प्रतिपादन अहिंसा विश्व भारतीचे आचार्य लोकेश मुनीजी यांनी येथे व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेत धर्मातील सामाजिक शांती व समता या विषयावर ते बोलत होते. आचार्य लोकेश मुनी म्हणाले, मोक्षाचा मार्ग सांगणारे अनेक आहेत. पण मुक्तीचा मार्ग दाखवणारे जीवनच सार्थक आहे. विश्वशांतीच्या पूर्वी मनाची शांती महत्त्वाची आहे. व्यक्ती शांतीचा शोधासाठी मंदिर, हिमालयात जाऊन येतात. आता तर अंतरिक्षामध्येही घर बांधण्यासाठी प्लॉटचे बुकिंग केले जात आहे. हे सर्व शांततेच्या शोधासाठी सुरू आहे. परंतु कुणीही आपल्या मनात ती शोधत नाही. आपले मन शांत नसेल तर व्यक्ती शांत राहूच शकत नाही. त्यामुळे मनाची शांती हीच सर्वात महत्त्वाची आहे. तथागत गौतम बुद्धाने नेमका हाच संदेश दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दीक्षाभूमीवरून जगात जावा शांतीचा संदेश - अब्दुल फलाहीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दीक्षाभूमीवरून बुद्धाचा शांती व करुणेचा संदेश पुनर्जिवित केला, त्या दीक्षाभूमीवरून तो जगभरात पोहाचावा, असे आवाहन मुस्लीम समजाचे विचारवंत अब्दुल फलाही यांनी केले. इस्लाम याचा अर्थ शांती होय. इस्लाम धर्म हा शांतीचा धर्म आहे. परंतु समाजात काही असमाजिक तत्त्व असे आहेत. जे समाजात कटुता निर्माण करतात. त्यांना रोखून शांतीचा संदेश पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जगभरातील बौद्ध विचारवंतांनी मांडली समतेची संकल्पनापरिषदेच्या एका सत्रात जगभरातील बौद्ध विचारवंतांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची संकल्पना विषद करीत तथागत गौतम बुद्धांचा धम्म समजावून सांगितला. थायलंडच्या डॉ. सिरीकोतन मनिरीन, राजकुमारी मारिया अमोर, राकुमारी सिसोवॉट, गगन मलीक यांच्यासह महाबोधी सोसायटी श्रीलंकेचे अध्यक्ष बानागल उपत्तीस्स नायक थेरो, बांग्लादेश येथील भंते बानाश्री महाथेरा संघनायका आदींनी समतेची संकल्पना विषद केली. तसेच थायलंड कंबोडिया येथील कलावंतांनी आपापल्या देशातील कलाही सादर केली.उद्या परिषदेतसकाळी ७ वाजता बुद्ध वंदनासकाळी ९.३० वाजता डॉ. आंबेडकर मानवीय अधिकारांचे पुरस्कर्ते व आधुनिक भारताचे शिल्पकार यावर खा. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान.सकाळी १०.१५ वाजता म्यानमार येथील कलावंतांचे नृत्य सादरीकरणसकाळी १०.४५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार व मार्गदर्शनदुपारी १२ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमदुपारी २ वाजता पाली तथा जागतिक भाषांमधील बौद्ध धम्माचे मानवतावादी तत्त्वज्ञानदुपारी ४ वाजता बौद्ध राष्ट्रांच्या प्रगतीत बुद्ध धम्माचे योगदान यावर मार्गदर्शनसायंकाळी ७.३० वाजता अहिंसक अंगुलीमाल नाटक (दीक्षाभूमीवर)   

टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वnagpurनागपूर