शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांमध्ये ‘व्हिजन’ निर्माण व्हावे : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:21 IST

आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

ठळक मुद्दे‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या उपस्थितीत ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बिहारचे कृषिमंत्री प्रेमकुमार, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खा.कृपाल तुमाने, खा.विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, ‘अ‍ॅग्रोव्हिजन’च्या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. चार वर्षांअगोदर शेतकरी आत्महत्या हा मोठा चिंतेचा मुद्दा होता. मात्र मागील चार वर्षांत महाराष्ट्र व विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळेच येथील शेतकऱ्यांची स्थिती सुधारत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले. 
म्हणून वाढले उत्तर प्रदेशमधील अपराधउत्तर प्रदेशमध्ये मागील १५० वर्षांपासून उसाला ‘कॅश क्रॉप’ मानण्यात येते. मात्र मागील १०-१५ वर्षातील राज्यातील तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे साखर उत्पादकांना फटका बसला व मोठ्या प्रमाणात साखर कारखाने बंद पडले. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अपराध वाढले, दंगे वाढले आणि लोक पलायन करायला लागले, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. आमच्या शासनकाळात आम्ही १२१ साखर कारखाने सुरू केले आहेत. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार कोटींचे वाटपदेखील केले असल्याचे त्यांनी सांगितले. 
सहा जिल्हे ‘डिझेलमुक्त’ करणार : गडकरीयावेळी नितीन गडकरी यांनी विदर्भ व महाराष्ट्रातील शेतीमध्ये होत असलेले बदल व प्रगतीवर भाष्य केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडण्याची गरज आहे. तणसापासून जैवइंधन निर्मिती होऊ शकते व यावर ‘ट्रॅक्टर’देखील चालविले जाऊ शकते. 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत तीन वर्षांत सर्व ‘ट्रॅक्टर’ डिझेल नव्हे तर जैवइंधनावर चालतील. यामुळे रोजगाराचीदेखील निर्मिती होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. आज मुंबईत तांदळापेक्षा भांडे घासण्याची माती महाग आहे. ऊस सोडून इतर पिकांमुळे हवा तसा नफा मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसायांकडेदेखील वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असेदेखील गडकरी म्हणाले. 

पाऊस कमी, पण उत्पादन कमी होणार नाही : मुख्यमंत्रीराज्य शासनाने मागील चार वर्षांत सिंचनक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे भूजल पातळीदेखील वाढली आहे. २०१३-१४ मध्ये १२४ टक्के पाऊस झाला होता. तेव्हा १३७ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. २०१७-१८ मध्ये सरासरीच्या ८४ टक्केच पाऊस झाला. तरीदेखील उत्पादन १८० लाख मेट्रिक टन इतके होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीyogi adityanathयोगी आदित्यनाथ