शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

शेतकऱ्यांमध्ये ‘व्हिजन’ निर्माण व्हावे : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:21 IST

आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

ठळक मुद्दे‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या उपस्थितीत ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बिहारचे कृषिमंत्री प्रेमकुमार, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खा.कृपाल तुमाने, खा.विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, ‘अ‍ॅग्रोव्हिजन’च्या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. चार वर्षांअगोदर शेतकरी आत्महत्या हा मोठा चिंतेचा मुद्दा होता. मात्र मागील चार वर्षांत महाराष्ट्र व विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळेच येथील शेतकऱ्यांची स्थिती सुधारत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले. 
म्हणून वाढले उत्तर प्रदेशमधील अपराधउत्तर प्रदेशमध्ये मागील १५० वर्षांपासून उसाला ‘कॅश क्रॉप’ मानण्यात येते. मात्र मागील १०-१५ वर्षातील राज्यातील तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे साखर उत्पादकांना फटका बसला व मोठ्या प्रमाणात साखर कारखाने बंद पडले. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अपराध वाढले, दंगे वाढले आणि लोक पलायन करायला लागले, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. आमच्या शासनकाळात आम्ही १२१ साखर कारखाने सुरू केले आहेत. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार कोटींचे वाटपदेखील केले असल्याचे त्यांनी सांगितले. 
सहा जिल्हे ‘डिझेलमुक्त’ करणार : गडकरीयावेळी नितीन गडकरी यांनी विदर्भ व महाराष्ट्रातील शेतीमध्ये होत असलेले बदल व प्रगतीवर भाष्य केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडण्याची गरज आहे. तणसापासून जैवइंधन निर्मिती होऊ शकते व यावर ‘ट्रॅक्टर’देखील चालविले जाऊ शकते. 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत तीन वर्षांत सर्व ‘ट्रॅक्टर’ डिझेल नव्हे तर जैवइंधनावर चालतील. यामुळे रोजगाराचीदेखील निर्मिती होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. आज मुंबईत तांदळापेक्षा भांडे घासण्याची माती महाग आहे. ऊस सोडून इतर पिकांमुळे हवा तसा नफा मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसायांकडेदेखील वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असेदेखील गडकरी म्हणाले. 

पाऊस कमी, पण उत्पादन कमी होणार नाही : मुख्यमंत्रीराज्य शासनाने मागील चार वर्षांत सिंचनक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे भूजल पातळीदेखील वाढली आहे. २०१३-१४ मध्ये १२४ टक्के पाऊस झाला होता. तेव्हा १३७ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. २०१७-१८ मध्ये सरासरीच्या ८४ टक्केच पाऊस झाला. तरीदेखील उत्पादन १८० लाख मेट्रिक टन इतके होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीyogi adityanathयोगी आदित्यनाथ