शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
3
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
4
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
5
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
6
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
7
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
8
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
9
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
10
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
11
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
12
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
13
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
14
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
15
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
16
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
17
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
18
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
19
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
20
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांमध्ये ‘व्हिजन’ निर्माण व्हावे : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:21 IST

आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

ठळक मुद्दे‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या उपस्थितीत ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बिहारचे कृषिमंत्री प्रेमकुमार, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खा.कृपाल तुमाने, खा.विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, ‘अ‍ॅग्रोव्हिजन’च्या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. चार वर्षांअगोदर शेतकरी आत्महत्या हा मोठा चिंतेचा मुद्दा होता. मात्र मागील चार वर्षांत महाराष्ट्र व विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळेच येथील शेतकऱ्यांची स्थिती सुधारत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले. 
म्हणून वाढले उत्तर प्रदेशमधील अपराधउत्तर प्रदेशमध्ये मागील १५० वर्षांपासून उसाला ‘कॅश क्रॉप’ मानण्यात येते. मात्र मागील १०-१५ वर्षातील राज्यातील तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे साखर उत्पादकांना फटका बसला व मोठ्या प्रमाणात साखर कारखाने बंद पडले. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अपराध वाढले, दंगे वाढले आणि लोक पलायन करायला लागले, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. आमच्या शासनकाळात आम्ही १२१ साखर कारखाने सुरू केले आहेत. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार कोटींचे वाटपदेखील केले असल्याचे त्यांनी सांगितले. 
सहा जिल्हे ‘डिझेलमुक्त’ करणार : गडकरीयावेळी नितीन गडकरी यांनी विदर्भ व महाराष्ट्रातील शेतीमध्ये होत असलेले बदल व प्रगतीवर भाष्य केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडण्याची गरज आहे. तणसापासून जैवइंधन निर्मिती होऊ शकते व यावर ‘ट्रॅक्टर’देखील चालविले जाऊ शकते. 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत तीन वर्षांत सर्व ‘ट्रॅक्टर’ डिझेल नव्हे तर जैवइंधनावर चालतील. यामुळे रोजगाराचीदेखील निर्मिती होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. आज मुंबईत तांदळापेक्षा भांडे घासण्याची माती महाग आहे. ऊस सोडून इतर पिकांमुळे हवा तसा नफा मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसायांकडेदेखील वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असेदेखील गडकरी म्हणाले. 

पाऊस कमी, पण उत्पादन कमी होणार नाही : मुख्यमंत्रीराज्य शासनाने मागील चार वर्षांत सिंचनक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे भूजल पातळीदेखील वाढली आहे. २०१३-१४ मध्ये १२४ टक्के पाऊस झाला होता. तेव्हा १३७ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. २०१७-१८ मध्ये सरासरीच्या ८४ टक्केच पाऊस झाला. तरीदेखील उत्पादन १८० लाख मेट्रिक टन इतके होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीyogi adityanathयोगी आदित्यनाथ