शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
6
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
7
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
8
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
9
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
10
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
11
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
12
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
13
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
14
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
15
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
16
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
17
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
18
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
19
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
20
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

शेतकऱ्यांमध्ये ‘व्हिजन’ निर्माण व्हावे : योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 22:21 IST

आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

ठळक मुद्दे‘व्हीव्हीआयपी’ नेत्यांच्या उपस्थितीत ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशाला जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनवायचे असेल तर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच मूलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांमध्ये योग्य ‘व्हिजन’ तयार व्हावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. शुक्रवारी रेशीमबाग मैदान येथे ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, बिहारचे कृषिमंत्री प्रेमकुमार, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खा.कृपाल तुमाने, खा.विकास महात्मे, खा.रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, ‘अ‍ॅग्रोव्हिजन’च्या सल्लागार समितीचे प्रमुख डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. चार वर्षांअगोदर शेतकरी आत्महत्या हा मोठा चिंतेचा मुद्दा होता. मात्र मागील चार वर्षांत महाराष्ट्र व विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळेच येथील शेतकऱ्यांची स्थिती सुधारत आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर रमेश मानकर यांनी आभार मानले. 
म्हणून वाढले उत्तर प्रदेशमधील अपराधउत्तर प्रदेशमध्ये मागील १५० वर्षांपासून उसाला ‘कॅश क्रॉप’ मानण्यात येते. मात्र मागील १०-१५ वर्षातील राज्यातील तत्कालीन सरकारच्या उदासीनतेमुळे साखर उत्पादकांना फटका बसला व मोठ्या प्रमाणात साखर कारखाने बंद पडले. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये अपराध वाढले, दंगे वाढले आणि लोक पलायन करायला लागले, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. आमच्या शासनकाळात आम्ही १२१ साखर कारखाने सुरू केले आहेत. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ५० हजार कोटींचे वाटपदेखील केले असल्याचे त्यांनी सांगितले. 
सहा जिल्हे ‘डिझेलमुक्त’ करणार : गडकरीयावेळी नितीन गडकरी यांनी विदर्भ व महाराष्ट्रातील शेतीमध्ये होत असलेले बदल व प्रगतीवर भाष्य केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत जोडण्याची गरज आहे. तणसापासून जैवइंधन निर्मिती होऊ शकते व यावर ‘ट्रॅक्टर’देखील चालविले जाऊ शकते. 

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, वर्धा, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांत तीन वर्षांत सर्व ‘ट्रॅक्टर’ डिझेल नव्हे तर जैवइंधनावर चालतील. यामुळे रोजगाराचीदेखील निर्मिती होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. आज मुंबईत तांदळापेक्षा भांडे घासण्याची माती महाग आहे. ऊस सोडून इतर पिकांमुळे हवा तसा नफा मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसायांकडेदेखील वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असेदेखील गडकरी म्हणाले. 

पाऊस कमी, पण उत्पादन कमी होणार नाही : मुख्यमंत्रीराज्य शासनाने मागील चार वर्षांत सिंचनक्षमता वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे भूजल पातळीदेखील वाढली आहे. २०१३-१४ मध्ये १२४ टक्के पाऊस झाला होता. तेव्हा १३७ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले होते. २०१७-१८ मध्ये सरासरीच्या ८४ टक्केच पाऊस झाला. तरीदेखील उत्पादन १८० लाख मेट्रिक टन इतके होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीyogi adityanathयोगी आदित्यनाथ