शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘चार भिंतीच्या आड’ होणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा; गृहमंत्र्यांचा फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2021 21:15 IST

Nagpur News ‘चार भिंतींच्या आड’ होणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा. महिला, मुलींच्या अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांकडे रूटिन अँगलने बघू नका.असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देनागपूर-गडचिरोली-अमरावती परिक्षेत्रात आढावा बैठका संवेदनशीलपणे प्रकरणं हाताळण्याचे निर्देश

नरेश डोंगरे

नागपूर : ‘चार भिंतींच्या आड’ होणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करा. काय अडचणी आहेत त्या सांगा, पाहिजे त्या सुविधा पुरवू, मात्र महिला, मुलींच्या अत्याचारासंदर्भातील गुन्ह्यांकडे रूटिन अँगलने बघू नका. ठोस ॲक्शन प्लॅन तयार करा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विदर्भातील तीन परिक्षेत्र तसेच दोन पोलीस आयुक्तालयात कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

गृहमंत्री वळसे पाटील गुरुवारी रात्री नागपुरात आले. शुक्रवारी सकाळी त्यांनी नागपूर तसेच गडचिरोली परिक्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तर सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून गुन्ह्याचा आढावा घेतला. शनिवारी सकाळी अमरावती गाठत त्यांनी अमरावती परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून गुन्ह्यांचा आढावा तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती जाणून घेतली. चारही बैठकांमध्ये सादर केलेल्या गुन्ह्यांच्या तुलनात्मक आकडेवारीवर टिप्पणी करताना आकड्यांचा खेळ माझ्यासमोर नको, अशी जाणीव त्यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. दोन्ही दिवसांच्या बैठकांमध्ये महिला -मुलींवरील अत्याचारांच्या प्रकरणांवरच त्यांचा फोकस होता. अशा गुन्ह्यांच्या संबंधाने राज्य सरकार कमालीचे संवेदनशील असल्याचे विदर्भातील पोलीस अधिकाऱ्यांच्या ध्यानात आणून दिले.

अनेक अत्याचार प्रकरणांतील आरोपी पीडितेच्या ओळखीचे, संपर्कातील किंवा नात्यातील असतात. हे वास्तव अधोरेखित झाल्यानंतर ‘चार भिंतीच्या आड’ होणारे गुन्हे म्हणून त्याकडे बरेचदा डोळेझाक केली जाते. यापुढे असे झाले तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचा गर्भित इशारा त्यांनी दोन्ही ठिकाणच्या बैठकांमध्ये अत्यंत शांतपणे संबंधित अधिकाऱ्यांना दिला. अत्याचार चार भिंतीआडचा असो की बाहेरचा, तो रोखता कसा येईल, यासंबंधाने नुसती चर्चा नको. गंभीर विचार करा. त्यासाठी स्ट्रॅटेजी अथवा ॲक्शन प्लॅन तयार करा. पाहिजे तर महिलांशी संबंधित गुन्ह्यांसाठी एक स्वतंत्र पोलीस ठाणेच निर्माण करा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना म्हटले. गुन्हे घडणारच नाहीत यासाठी सतर्कता बाळगा आणि गुन्हे घडले तर संवेदनशीलपणे त्याचा तपास करा, असा सल्ला देऊन त्यांनी महिला-मुलींशी संबंधित अत्याचार प्रकरणात चालढकल करणाऱ्या कोणत्याच अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, असा गर्भित इशाराही दिला.

एसडीपीओ, पीएसआयची कमतरता

नागपुरात विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार तर अमरावतीत विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना आणि पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्याशी चर्चा करताना या दोन दिवसांत गृहमंत्री वळसे पाटील यांनी काय अडचणी आहेत, कोणत्या सुविधा हव्यात हेदेखील जाणून घेतले. चारही बैठकात एसडीपीओ तसेच पीएसआयची कमतरता अधोरेखित झाली. ही रिक्त पदे लवकरच भरल्या जाणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.

-----

----

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटील