शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोठे उद्योग येण्यासाठी प्रारूप तयार करा : पालकमंत्री नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:10 IST

उच्चशिक्षित तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग उभारावे लागतील.यादृष्टीने प्रारूप तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देविकासकामांचा घेतला आढावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर हे विदर्भातील उपराजधानीचे शहर आहे. अभियांत्रिकी व अन्य व्यावसायिक शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यात मोठे उद्योग उभारावे लागतील.यादृष्टीने प्रारूप तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.ऊर्जामंत्री व पालकमंत्री नितीन राऊत यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांचा गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आढावा घेतला. मुंबई- पुण्याव्यतिरिक्त विदर्भात मोठे उद्योग यावे म्हणून उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. तसेच यासाठी अ‍ॅडव्हान्टेज विदर्भसारख्या उद्योग परिषदा घेण्याचा शासनाचा मानस आहे.सर्वसाधारण योजनेचा जिल्ह्याचा ८७६ कोटी रुपयांचा मंजूर आराखडा असून आतापर्यत ६७ टक्के खर्च झाला आहे तर अनुसूचित जाती -जमाती योजनेत ५० टक्के खर्च झाला असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी नारिंगे यांनी यावेळी दिली. ५० टक्क्याहून कमी निधी खर्च झालेल्या विभागांच्या कामाची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी घेतली. यावेळी रस्ते विकास व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी निधी विहीत पध्दतीने व वेळेत खर्च करण्याचे निर्देश त्यांनी दिले.जनतेच्या अडचणी सोडविण्यावर भर देणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या विकास कामाबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे. शहराच्या किंवा जिल्ह्याच्या विकासाच्या महत्त्वाच्या बाबी शासनाकडे प्रलंबित असल्यास त्याचाही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, नागपूर सुधार प्रन्यासचे अप्पर आयुक्त हेमंत पवार यासह विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत केलेल्या सूचना

  •  महत्त्वाचे उद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी, शहरातील घनव्यवस्थापन, सार्वजनिक स्थळांचे सौदर्यीकरण तसेच शहरातील वाहनांची वाढती संख्या व त्यादृष्टीने पार्किगची व्यवस्था करण्यावर भर द्यायला हवा.
  •  जिल्हा उद्योग कार्यालयाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या योजनांचाही धावता आढावा त्यांनी यावेळी घेतला. कौशल्य विकास, उद्योग विभाग यांनी संयुक्तपणे काम करून रोजगारांच्या संधी व प्रशिक्षण युवकांना द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
  •  वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभागाने काम करावे. तसेच स्मार्ट सिटीबाबत लवकरच वेगळी बैठक घेण्यात येईल.
टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतnagpurनागपूर