शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

जनतेत विश्वास आणि गुन्हेगारात दहशत निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:22 IST

लोकात जाऊन मिसळा, जनतेत विश्वास आणि गुन्हेगारात दहशत निर्माण करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज शहरातील ठाणेदारांना दिले. नागपुरात रुजू झाल्यानंतर डॉ. उपाध्याय यांनी शुक्रवारी पहिली क्राईम मिटींग घेतली.

ठळक मुद्देक्राईम मिटींग : ठाणेदारांना पोलीस आयुक्तांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकात जाऊन मिसळा, जनतेत विश्वास आणि गुन्हेगारात दहशत निर्माण करा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज शहरातील ठाणेदारांना दिले. नागपुरात रुजू झाल्यानंतर डॉ. उपाध्याय यांनी शुक्रवारी पहिली क्राईम मिटींग घेतली.एनकॉप्समध्ये झालेल्या या बैठकीत शहरातील ३० पोलीस ठाण्यांचे ठाणेदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. डॉ. उपाध्याय यांनी त्यांना संबोधित करताना कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले. गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांवर मेहेरनजर ठेवणाऱ्यांना कोणत्याच परिस्थितीत माफी मिळणार नाही, असा इशारा दिला.नागरिक सोबत असले की पोलिसांना त्यांचे कर्तव्य बजावणे सहज सोपे होते. त्यामुळे नागरिकांचा विश्वास जिंकण्यावर त्यांनी खास भर दिला. नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांच्यात जावे लागेल. त्यांना मदत करावी लागेल. त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्या लागतील तरच नागरिक पोलिसांवर विश्वास करतील. हे एकदा झाले की गुन्हेगारी नियंत्रण करणे फारच सोपे होईल. गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण करा. सराईत गुन्हेगारांना कोणत्याच स्थितीत सोडू नका, त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि त्यांच्या मूळ जागी, कारागृहात डांबा, असेही आदेश त्यांनी ठाणेदारांना दिले. एखादा पूर्वाश्रमीचा गुन्हेगार समाजाच्या प्रवाहात सहभागी होऊन कामधंदा करीत असेल. चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला विनाकारण त्रास देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. शहरातील काही पोलीस ठाण्याच्या कामकाजावर तसेच दोष सिद्धतेचे प्रमाण नगण्य असल्याच्या मुद्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे कोणत्या भागात किती अवैध धंदे आहेत, किती गुन्हेगार सक्रिय आहेत, त्यावर लक्ष ठेवून दक्षपणे काम करण्यास त्यांनी ठाणेदारांना सांगितले. ज्या ठाण्यातील कामगिरी चांगली दिसली नाही, त्या संबंधित ठाणेदारांना त्याचा ‘अहवाल’ मागितला जाईल, असे सांगून त्यांनी भलत्या कामात गुंतलेल्यांना एकप्रकारे इशाराही दिला.फूट पेट्रोलिंगवर भररस्त्यावर वाहनांनी फिरण्याऐवजी वस्त्यावस्त्यात पायी फिरा (फूट पेट्रोलिंग) असा सल्ला देताना त्यांनी ठाणेदारांना त्यामागचे फायदेही सांगितले. रस्त्याने चालताना पोलीस दिसले की गुन्हेगार दुरूनच पळून जातील. नागरिक, विशेषत: महिला-मुली बिनधोकपणे रस्त्यावर वावरतील आणि नागरिकांमध्ये सुरक्षेचा विश्वास निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवरही त्यांनी भाष्य केले. शहरातील वाहतूक व्यवस्था चांगली करण्याची आमची जबाबदारी आहे. वाहनचालकांना विनाकारण आपल्याकडून त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही डॉ. उपाध्याय यांनी दिला. डॉ. उपाध्याय यांनी शहरात विविध पदावर यापूर्वी काम केलेले आहे. त्यांना नागपुरातील गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्थेसह येथील विविध क्षेत्राचा आणि घडामोडीचाही चांगला अभ्यास आहे. त्यांची ही पहिलीच क्राईम मिटींग असल्यामुळे अनेक ठाणेदार होमवर्क करूनच बैठकीला गेले होते.

 

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयnagpurनागपूर