शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
3
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
4
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
5
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
6
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
7
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
8
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
9
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
11
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
12
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
13
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
14
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
15
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
16
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
18
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
19
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
20
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

यंदाची नागपुरातील फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 9:17 PM

दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. त्यानंतरही नागपुरात विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली. यंदा नागपूर जिल्ह्यात फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची झाल्याचा अंदाज घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्दे१५ ते २० टक्के महाग : ग्राहकांची उत्साहात खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. त्यानंतरही नागपुरात विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली. यंदा नागपूर जिल्ह्यात फटाक्यांची दिवाळी १०० कोटींची झाल्याचा अंदाज घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.विक्रेत्यांना परवाना मिळण्यास उशीरपर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे फटाका विक्रीत घट होण्याची शक्यता प्रारंभी वर्तविली जात होती. दिवाळीच्या पाच दिवसांपूर्वी ग्राहक बाजारात फिरकले नव्हते. पण लक्ष्मीपूजनाच्या दोन दिवसांपूर्वी ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली. पोलिसांनीही दिवाळीच्या काहीच दिवसांपूर्वी फटाके विक्रीला परवाना दिल्यामुळे अनेकांना दुकाने थाटण्यात अडचणी आल्या. किरकोळ विक्रेत्यांना परवाना मिळाल्यानंतरच ठोक खरेदीला प्रारंभ केला. रेशीमबाग, तुळशीबाग येथील फटाके विक्रेते सय्यदभाई म्हणाले, परवाना उशिरा मिळाला तरीही फटाके विक्रीवर काहीही परिणाम झाला नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही ग्राहकांनी उत्साहात खरेदी केली.कच्चा माल महागलाफटाके निर्मितीसाठी बेरियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट, अल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्चा मालाचा वापर केला जातो. यंदा यापैकी अनेक गोष्टीच्या कि मतीमध्ये लक्षणीय अशी वाढ झाली. शिवाय कामगारांची वाढलेली मजुरी तसेच डिझेल-पेट्रोलच्या किमतीतील सततच्या वाढीमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च या सर्व बाबींमुळे फटाके उत्पादकांना फटाक्यांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता, असे उत्पादक ललित कारटवटकर यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अन् पर्यावरण प्रेमींची जनजागृतीवाढत्या प्रदूषणाचे कारण देत रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा मनाई आदेश आणि पर्यावरण प्रेमींच्या जनजागृतीचा परिणाम विक्रीवर झाल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. फटाक्यांमध्ये अनार, सुतळी बॉम्ब, चक्री, फुलझडी यांची सर्वाधिक विक्री होते. यंदा मोठ्या आवाजाच्या फटाक्यांऐवजी नागरिकांनी फॅन्सी, विना आवाजाचे, रंगांची उधळण करणाऱ्या कमी आवाजाच्या फटाक्यांना प्राधान्य दिल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या चार वर्षांपासून उत्पादक कंपन्यांनी मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचे उत्पादन कमी केले आहे. फटाक्यांवर देवीदेवतांची चित्रेही वापरणे या कंपन्यांनी बंद केले आहे. एकंदरीत न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि नागरिकांमध्ये झालेली जागृती यामुळे फटाक्यांच्या विक्रीत पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :DiwaliदिवाळीCrackersफटाके