शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विदेशातही गाय मारणे मानतात पाप

By admin | Updated: October 25, 2015 03:04 IST

गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर देशातील राजकारण ढवळून निघाले असून गोहत्याबंदीचा विषय चर्चेत आहे.

गोहत्याबंदीचे सरसंघचालकांकडून समर्थन : संस्कृतीमध्ये बदल नकोनागपूर : गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर देशातील राजकारण ढवळून निघाले असून गोहत्याबंदीचा विषय चर्चेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गोहत्याबंदीचे समर्थनच केले आहे. अफ्रिकेतील देशांमध्ये हलाखीच्या परिस्थितीत गायीचे रक्त प्राशन करण्यात येते, परंतु त्या बदल्यात तिचे पोषण करण्यात येते. गायीला मारणे तेथेही पाप समजले जाते अशा शब्दांत त्यांनी गोहत्याबंदीच्या मुद्यावर भाष्य केले. नागपुरातील आर. एस. धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘आयसीसीएस’च्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज्) संयुक्त विद्यमाने ‘प्राचीन भारतीय संस्कृतीचे जगातील प्रतिध्वनी’ या विषयावर शनिवारपासून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून डॉ. भागवत बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा हे उपस्थित होते. भारताला पुरातन संस्कृती लाभली आहे. परंपरा बदलल्या तरी चालतील परंतु संस्कृती बदलायला नको. भारताच्या संस्कृतीत वैश्विक दृष्टी आहे अन् जगाला आज तिची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्यानंतर देशातील संस्कृतीचा प्रसार होणे अपेक्षित होते. परंतु व्यक्तिवाद आणि कुटुंबवादावर जास्त भर देण्यात आला व देशाच्या संस्कृतीचे पोषण झालेच नाही. अगदी देशातील स्वातंत्र्यसंग्रामात लढणाऱ्या व्यक्तींवर ‘नेहरू मेमोरिअल’च्या माध्यमातून प्रकाश टाकला तरी भगवीकरणाचा आरोप होतो. संस्कृतीची व्याख्या आपल्या देशात करणे कठीणच आहे, असे महेश शर्मा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यांवर अनावश्यक टीका करण्यात येत आहे. मोदी हे जगभरात भारताच्या शक्तीस्थळांचा प्रसार करत असून खऱ्या अर्थाने ते भारतीय संस्कृतीचे दूत आहेत. भारताबाहेरही भारतीय संस्कृती जपणारे अनेकजण राहतात. पर्यटनाच्या माध्यमातून, नागरी विमानवाहतुकीच्या पंखाचा उपयोग करून घेत, साऱ्या जगभर समृद्ध आणि व्यापक भारतीय संस्कृती पोहोचवणे हे आपले महत्त्वाचे ध्येय आहे, असे डॉ. महेश शर्मा यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या निमिताने संकलित शोधनिबंधांच्या ग्रंथाचे आणि अभ्यासक्रमांच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या परिषदेत आयोजित दहा सत्रांमध्ये भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विचारप्रणालीविषयक शोधनिबंधाचे सादरीकरण केले जाईल. यावेळी धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र जोशी, सचिव दत्ताजी टेकाडे, ‘आयसीसीएस’चे अध्यक्ष अरुण चिंचमलातपुरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या नायर व संयोजक डॉ. मंजुश्री सरदेशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.भागवतांचे ‘गरुडा’स्त्रदेशात प्राचीन संस्कृतीचे प्रतीक असलेली नावे देण्यावर विवाद होतो त्याबद्दल डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी भाष्य केले. इंडोनेशियामध्ये आघाडीची विमानकंपनी ‘गरुडा-इंडोनेशिया’ हिला पुराणांमधील गरुडाचे स्थान लक्षात घेऊन नाव देण्यात आले आहे. परंतु आपल्या देशात अशी नावे देण्याचा प्रयत्न झाला तर मात्र गोंधळाला सुरुवात होते, असे ते म्हणाले. त्यांचा रोख केंद्रातील विरोधी पक्ष व डाव्या विचारसरणीच्या पक्षांवर होता. डॉ. महेश शर्मा यांनीदेखील सरसंघचालकांचीच री ओढत असे प्रयत्न झाले तर भगवीकरणाचे आरोप होतात असे वक्तव्य केले. परंतु जर नवीन प्रकल्पांना अशी भारतीय संस्कृतीशी जुळलेली नावे देण्याचा प्रस्ताव आला तर त्यांचा सकारात्मकपणे विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.