शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नागपुरातील कोविड हॉस्पिटल्स अर्ध्याहून जास्त रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 07:00 IST

¯Covid, Nagpur News नागपुरातील अर्ध्याहून जास्त कोविड हॉस्पिटल रिकामे आहेत. परिणामी, काही खासगी हॉस्पिटलने कोविडच्या खाटा कमी करण्याच्या तर काहींनी खासगी कोविड हॉस्पिटल बंद करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.

ठळक मुद्देविना रुग्ण कोविड हॉस्पिटल चालविणे कठीण शासकीय रुग्णालयात १,७४५ तर खासगीमध्ये ९४६ ऑक्सिजन बेड रिकामे

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. शासकीय कोविड हॉस्पिटल व हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या १,७४५ खाटा रिकाम्या आहेत. अतिदक्षता विभागामधील (आयसीयू) ५२८ खाटेवर रुग्ण नाहीत. खासगीमध्येही अशीच स्थिती आहे. ९४६ ऑक्सिजन बेड व ४३८ आयसीयूच्या खाटा रिकाम्या आहेत. अर्ध्याहून जास्त कोविड हॉस्पिटल रिकामे आहेत. यावर होणारा रोजचा खर्चही निघत नसल्याने हॉस्पिटल चालविणे कठीण झाले आहे. परिणामी, काही खासगी हॉस्पिटलने कोविडच्या खाटा कमी करण्याच्या तर काहींनी खासगी कोविड हॉस्पिटल बंद करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.कोरोनाच्या प्रादुभार्वाला आठ महिन्यांचा कालावधी झाला आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने वेग घेतला. सप्टेंबर महिन्यात बाधितांच्या व मृत्यूच्या संख्येने अनेक जुने विक्रम मोडीत काढले. भयावह आकडेवारी समोर येऊ लागल्याने दहशतीचे वातावरण होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे. २,३४३ वर गेलेली रुग्णसंख्या सध्या ५०० ते ६००च्या दरम्यान आली. तर मृत्यूची संख्या ६४ वर गेली असताना सध्या ती २० ते ३०च्या दरम्यान आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यांच्या रुग्णसेवेत असलेल्या पायाभूत सोयी व मनुष्यबळावर होणारा खर्च मात्र कायम आहे. तसेच या खाटांचा इतर रुग्णांना लाभही मिळेनासा झाला आहे.३० खाटांसाठी रोज ५ लाखांवर खर्च३० खाटांचा खासगी कोविड हॉस्पिटलचा दररोजचा खर्च ५ ते ६ लाखांचा आहे. खाटांच्या तुलनेत काही ठिकाणी सध्या दहाही रुग्ण उपचाराला नाहीत. रोजच्या खचार्चा भुर्दंड सहन करावा लागत आहे.प्रशासनाच्या निर्देशानुसार कोविड हॉस्पिटल तयार केले. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या वेतनात वाढ करावी लागली. वेगळी यंत्रणा व सोयी उभ्या कराव्या लागल्या. आता सध्याच्या स्थितीत फार कमी रुग्ण आहेत. त्या तुलनेत रोजचा खर्चही निघत नाही आहे.-डॉ. अनुप मरारसमन्वयक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनधोका टळलेला नाही...मागील १०-१५ दिवसांत रुग्ण व मृत्यूची संख्या नक्कीच कमी झाली आहे. परंतु धोका टळला असे म्हणता येणार नाही. यामुळे शासकीय किंवा कोविड हॉस्पिटलमधील खाटा कमी करणे किंवा बंद करणे योग्य होणार नाही. यावर शासन निर्णय घेईल. पुढील दिवस सण, उत्सवाचे आहेत. यामुळे प्रत्येकाने मास्क घालणे, सॅनिटायझेशनचा वापर करणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.-जलज शर्माअतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस