शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नागपुरातील कोविड हॉस्पिटल्स अर्ध्याहून जास्त रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 07:00 IST

¯Covid, Nagpur News नागपुरातील अर्ध्याहून जास्त कोविड हॉस्पिटल रिकामे आहेत. परिणामी, काही खासगी हॉस्पिटलने कोविडच्या खाटा कमी करण्याच्या तर काहींनी खासगी कोविड हॉस्पिटल बंद करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.

ठळक मुद्देविना रुग्ण कोविड हॉस्पिटल चालविणे कठीण शासकीय रुग्णालयात १,७४५ तर खासगीमध्ये ९४६ ऑक्सिजन बेड रिकामे

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट आली आहे. शासकीय कोविड हॉस्पिटल व हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या १,७४५ खाटा रिकाम्या आहेत. अतिदक्षता विभागामधील (आयसीयू) ५२८ खाटेवर रुग्ण नाहीत. खासगीमध्येही अशीच स्थिती आहे. ९४६ ऑक्सिजन बेड व ४३८ आयसीयूच्या खाटा रिकाम्या आहेत. अर्ध्याहून जास्त कोविड हॉस्पिटल रिकामे आहेत. यावर होणारा रोजचा खर्चही निघत नसल्याने हॉस्पिटल चालविणे कठीण झाले आहे. परिणामी, काही खासगी हॉस्पिटलने कोविडच्या खाटा कमी करण्याच्या तर काहींनी खासगी कोविड हॉस्पिटल बंद करण्याची मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.कोरोनाच्या प्रादुभार्वाला आठ महिन्यांचा कालावधी झाला आहे. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने वेग घेतला. सप्टेंबर महिन्यात बाधितांच्या व मृत्यूच्या संख्येने अनेक जुने विक्रम मोडीत काढले. भयावह आकडेवारी समोर येऊ लागल्याने दहशतीचे वातावरण होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात रुग्णसंख्या हळूहळू कमी व्हायला लागली आहे. २,३४३ वर गेलेली रुग्णसंख्या सध्या ५०० ते ६००च्या दरम्यान आली. तर मृत्यूची संख्या ६४ वर गेली असताना सध्या ती २० ते ३०च्या दरम्यान आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने त्यांच्या रुग्णसेवेत असलेल्या पायाभूत सोयी व मनुष्यबळावर होणारा खर्च मात्र कायम आहे. तसेच या खाटांचा इतर रुग्णांना लाभही मिळेनासा झाला आहे.३० खाटांसाठी रोज ५ लाखांवर खर्च३० खाटांचा खासगी कोविड हॉस्पिटलचा दररोजचा खर्च ५ ते ६ लाखांचा आहे. खाटांच्या तुलनेत काही ठिकाणी सध्या दहाही रुग्ण उपचाराला नाहीत. रोजच्या खचार्चा भुर्दंड सहन करावा लागत आहे.प्रशासनाच्या निर्देशानुसार कोविड हॉस्पिटल तयार केले. या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या वेतनात वाढ करावी लागली. वेगळी यंत्रणा व सोयी उभ्या कराव्या लागल्या. आता सध्याच्या स्थितीत फार कमी रुग्ण आहेत. त्या तुलनेत रोजचा खर्चही निघत नाही आहे.-डॉ. अनुप मरारसमन्वयक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनधोका टळलेला नाही...मागील १०-१५ दिवसांत रुग्ण व मृत्यूची संख्या नक्कीच कमी झाली आहे. परंतु धोका टळला असे म्हणता येणार नाही. यामुळे शासकीय किंवा कोविड हॉस्पिटलमधील खाटा कमी करणे किंवा बंद करणे योग्य होणार नाही. यावर शासन निर्णय घेईल. पुढील दिवस सण, उत्सवाचे आहेत. यामुळे प्रत्येकाने मास्क घालणे, सॅनिटायझेशनचा वापर करणे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे.-जलज शर्माअतिरिक्त आयुक्त, महानगरपालिका

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस